शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि Google for Education⁠ यांच्यात उद्देशपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पुढील दीड वर्षांत राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात गुगल […]

अधिक वाचा..

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: “नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ शकते. समाजामध्ये नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.जागतिक नेत्रदान दिनानिमित्त १० जून रोजी राज्यभर नेत्रदान जनजागृती उपक्रम आणि नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. […]

अधिक वाचा..

राज्यात ३६ जिल्ह्यांत सुरू होणार सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे; प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणार जिल्ह्यातच मार्गदर्शन

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP), शिष्यवृत्ती योजना आणि विविध प्रवेश प्रक्रियांबाबत अचूक माहिती व योग्य मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिली. मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत […]

अधिक वाचा..

बकरी ईदपूर्वी राज्यभर गोवंश वाहतुकीवर विशेष मोहीम; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

मुंबई: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गोमातेची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार २५ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. […]

अधिक वाचा..

आरक्षण, बेरोजगारी आणि आंदोलनांवरून राज्यात पुन्हा चर्चा

३० मेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमांत तीव्र प्रतिक्रिया मुंबई: महाराष्ट्रात मराठा आरक्षण, ‘सगेसोयरे’ अंमलबजावणी आणि गुणवंत आरक्षित उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील समावेशाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे. १५ मे २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी ३० मे रोजी पुन्हा आंदोलन करण्याची […]

अधिक वाचा..

भरती प्रक्रियेतील नव्या सुधारणांवरून राज्यात वाद; सामाजिक प्रतिनिधित्व धोक्यात येण्याची भीती

मुंबई: राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या “भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा” धोरणावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. विविध सामाजिक संघटना, अभ्यासक आणि बहुजन प्रतिनिधींनी या सुधारणांमुळे प्रशासनातील सामाजिक प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त केली आहे. सरकारकडून प्रशासन अधिक कार्यक्षम, वेगवान आणि एकसंध करण्यासाठी भरती प्रक्रियेत बदल सुचविण्यात आले आहेत. त्यामध्ये काही संवर्गांचे विलिनीकरण, संयुक्त गट […]

अधिक वाचा..

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग घटनांमुळे राज्यभर संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर प्रकरणासह पुणे जिल्ह्यातील भोर, चाकण, नसरापूर या भागांतील घटनांनी समाजमन हादरले आहे. अल्पवयीनांवरील गुन्ह्यांमध्ये काही प्रकरणांमध्ये आरोपी हे ओळखीचे किंवा नातेवाईक असल्याचे समोर आल्याने सुरक्षिततेबाबत नव्याने […]

अधिक वाचा..

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात येणार असून कुटुंबातील भौतिक सुविधांची माहिती ३३ प्रश्नांच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने स्वतःची माहिती भरण्याची ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ मे ते १५ मे […]

अधिक वाचा..

सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल करण्यासाठी कटिबद्ध; पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थानावर नेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री देसाई बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाला वेग; राज्यभर ७ हजार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली असून, जिल्हाध्यक्षांपासून ग्रामपातळीपर्यंत मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी दिली. दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या बैठकीत जिल्हा व तालुका पातळीवरील नेतृत्वावर सविस्तर चर्चा झाली. पारदर्शक पद्धतीने जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात आली […]

अधिक वाचा..