‘विनोबा’ डिजिटल व्यासपीठाचा राज्यभर विस्तार; ३१ लाख विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ

एससीईआरटी–ओएलएफ सामंजस्य करार; एआय-आधारित मूल्यमापन, शिक्षक सक्षमीकरण आणि पालक सहभागाला चालना मुंबई: राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी राज्य शासनाने ‘विनोबा’ या डिजिटल शैक्षणिक व्यासपीठाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (ओएलएफ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील […]

अधिक वाचा..

केंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे; राज्याने केंद्राशी समन्वय साधावा; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील काही शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या मुद्द्यावर विधानपरिषदेत गुरुवारी चर्चा झाली. प्रश्न क्रमांक ९३३८ अंतर्गत सदस्य सुधाकर अडबाले यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यावेळी शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील शाळांनाही राज्यातील नियमांचे पालन बंधनकारक असावे, अशी मागणी केली. डॉ. […]

अधिक वाचा..

राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करा; आयुष्मान योजनेचा विस्तार करा; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि खासगी रुग्णालयांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची मागणी विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत अर्धा तास चर्चेदरम्यान केली. तांबे यांनी सांगितले की, शासकीय रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता, औषधांचा […]

अधिक वाचा..

शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि Google for Education⁠ यांच्यात उद्देशपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पुढील दीड वर्षांत राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात गुगल […]

अधिक वाचा..

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: “नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ शकते. समाजामध्ये नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.जागतिक नेत्रदान दिनानिमित्त १० जून रोजी राज्यभर नेत्रदान जनजागृती उपक्रम आणि नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. […]

अधिक वाचा..

राज्यात ३६ जिल्ह्यांत सुरू होणार सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे; प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणार जिल्ह्यातच मार्गदर्शन

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP), शिष्यवृत्ती योजना आणि विविध प्रवेश प्रक्रियांबाबत अचूक माहिती व योग्य मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिली. मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत […]

अधिक वाचा..

बकरी ईदपूर्वी राज्यभर गोवंश वाहतुकीवर विशेष मोहीम; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

मुंबई: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गोमातेची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार २५ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. […]

अधिक वाचा..

आरक्षण, बेरोजगारी आणि आंदोलनांवरून राज्यात पुन्हा चर्चा

३० मेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमांत तीव्र प्रतिक्रिया मुंबई: महाराष्ट्रात मराठा आरक्षण, ‘सगेसोयरे’ अंमलबजावणी आणि गुणवंत आरक्षित उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील समावेशाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे. १५ मे २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी ३० मे रोजी पुन्हा आंदोलन करण्याची […]

अधिक वाचा..

भरती प्रक्रियेतील नव्या सुधारणांवरून राज्यात वाद; सामाजिक प्रतिनिधित्व धोक्यात येण्याची भीती

मुंबई: राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या “भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा” धोरणावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. विविध सामाजिक संघटना, अभ्यासक आणि बहुजन प्रतिनिधींनी या सुधारणांमुळे प्रशासनातील सामाजिक प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त केली आहे. सरकारकडून प्रशासन अधिक कार्यक्षम, वेगवान आणि एकसंध करण्यासाठी भरती प्रक्रियेत बदल सुचविण्यात आले आहेत. त्यामध्ये काही संवर्गांचे विलिनीकरण, संयुक्त गट […]

अधिक वाचा..

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग घटनांमुळे राज्यभर संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर प्रकरणासह पुणे जिल्ह्यातील भोर, चाकण, नसरापूर या भागांतील घटनांनी समाजमन हादरले आहे. अल्पवयीनांवरील गुन्ह्यांमध्ये काही प्रकरणांमध्ये आरोपी हे ओळखीचे किंवा नातेवाईक असल्याचे समोर आल्याने सुरक्षिततेबाबत नव्याने […]

अधिक वाचा..