अजितदादांचा विमान अपघात घातपातच? रोहित पवारांचा ठाम आरोप; शरद पवारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

मुंबई: उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. हा अपघात घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त करत तज्ज्ञ समितीमार्फत स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार Rohit Pawar यांनी ठामपणे केली आहे. मुंबईत तिसरी पत्रकार परिषद; प्रेझेंटेशनद्वारे मांडले मुद्दे रोहित पवार यांनी मुंबईत तिसरी पत्रकार परिषद घेत […]

अधिक वाचा..

ब्रह्मी गावात महिलांचा एकमुखी कौल; दारूविक्री परवाना रद्द करण्याची ठाम मागणी

वाशिम: वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मी (ता. वाशिम) येथे देशी व विदेशी दारूविक्रीच्या मंजूर अनुज्ञप्ती रद्द करण्यासाठी सोमवारी (दि. ९) केवळ महिलांसाठी विशेष मतदान घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पार पडली. या मतदानात गावातील तरुणी, विवाहित तसेच ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि दारूविक्री बंद करण्याच्या बाजूने ठाम कौल दिला. निकाल जाहीर […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत; योग्य आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्तीत वाढ

हिवाळ्याच्या दिवसांत मानवी शरीराची पचनशक्ती इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक सक्षम असते. त्यामुळे या काळात घेतलेला आहार शरीराला चांगल्या प्रकारे लागतो. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी हिवाळी आहाराला विशेष महत्त्व आहे, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. हिवाळ्यात शरीराला ऊब देणारे पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. तीळ आणि गूळ हे उष्ण गुणधर्माचे असून गुळात लोहाचे प्रमाण […]

अधिक वाचा..

सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना दिला खडे बोल, एमसीए सदस्यसंख्या वाढवण्याबाबत तीव्र नाराजी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना सुप्रीम कोर्टाने तीव्र खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) मधील सदस्यसंख्या वाढवण्याच्या बेकायदेशीर प्रयत्नांबाबत न्यायालयाने गंभीर नाराजी व्यक्त केली. केदार जाधव यांच्या याचिकेनुसार, रोहित पवारांनी MCAची सदस्यसंख्या 154 वरून 571 वर नेली, ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्य, कर्मचारी आणि इतर राजकीय व शैक्षणिक व्यक्तींचा समावेश होता. या […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री! मनोज जरांगे पाटलांचा मोठा इशारा; त्या ‘गिधाडांवर लक्ष ठेवा’…

मुंबई: आज सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी शपथविधी पार पडली. राज्यपालांच्या हस्ते राजभवनात त्यांनी पदाची शपथ घेतली. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत त्यांना गटनेता म्हणूनही निवडण्यात आले होते. शपथविधीनंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, “सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, […]

अधिक वाचा..

बारामतीचा वाघ अजूनही समर्थ आहे! अजित दादांच्या निधनानंतर शरद पवार रणांगणात

बारामती: अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, या धक्क्याचा सर्वात खोल परिणाम पवार कुटुंबावर आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर झाल्याचे दिसून येत आहे. राजकारणात कायम खंबीर आणि संयमी राहिलेले शरद पवार यांच्यासाठी हे नुकसान केवळ राजकीय नव्हे, तर अत्यंत वैयक्तिक असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार हे शरद पवारांचे […]

अधिक वाचा..

दूध न पिताही हाडे होतील मजबूत, कॅल्शियमची पॉवर असलेले हे 7 पदार्थ आजपासूनच खा

थंडीत हाडे किंवा सांध्यात तीव्र वेदना होत असतात. केवळ साठीला आलेले लोक नव्हे तर हल्ली तरुणांमध्ये देखील सांधेदुखी दिसत आहे. ज्याचे सर्वात मोठे कारण कॅल्शियमची कमतरता हे आहे. लोक बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन तर घेत असतात. परंतू कॅल्शियमकडे त्यांचे साफ दुर्लक्ष असते. आरामदायी जीवनशैलीने सकाळचे कोवळे ऊन्हात फिरणे होत नसल्याने डी जीवनसत्वाची देखील शरीरात कमतरता होते.त्यामुळे […]

अधिक वाचा..

लहानग्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आजच्या अधिवेशनात कठोर पाऊले उचलली गेली नाही तर…

नागपूर: महाराष्ट्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून करण्यात आलेल्या हत्येतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात या अधिवेशनात कठोर पाऊले उचलली गेली नाही तर आपण त्या लहानग्या मुलीला न्याय देऊ शकणार नाही अशा शब्दात आमदार सना मलिक-शेख यांनी सभागृहात खंत व्यक्त केली. नाशिक जिल्हयातील मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरणावर […]

अधिक वाचा..

थंडीत न चुकता या ४ अवयवांना करा तुपानं मालिश, तब्येत होईल हट्टीकट्टी मजबूत 

साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. साजूक तुपात ओमेगा-३,ओमेगा-९ हे फॅटी अ‍ॅसिड,अ, के आणि ई ही महत्त्वाची जीवनसत्त्वं असतात. यासाठीच रोजच्या आहारात साजूक तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी बाराही महिने साजूक तूप पोटात जाणं आवश्यक असतं. पण थंडीत साजूक तुपाचं महत्त्व आणखीनच वाढतं. शरीराला स्निग्धता मिळण्यासाठी, शरीराचं पोषण होण्यासाठी हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

प्रताप सरनाईक यांच्या कणखर भूमिकेमुळे एसटी महामंडळाचे १२ कोटी रुपये वाचणार

मुंबई: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दाखवलेला व्यवसायिक दृष्टिकोन आणि योग्य वेळी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे एसटी महामंडळाची दरवर्षी तब्बल १२ कोटी रुपयांची बचत होणार आहे. येत्या १ ऑगस्ट पासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरात (Discount rate) प्रति लिटर ३० […]

अधिक वाचा..