पदविका प्रवेशाला विक्रमी प्रतिसाद; १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

मुंबई: राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १ लाख ३ हजार ११५ विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. हा मागील दहा वर्षांतील सर्वोच्च आकडा असून, प्रवेशाची टक्केवारी तब्बल ९३ टक्क्यांवर पोहोचली आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून प्रवेशाची अंतिममुदत १४ ऑगस्टवरून दि. ४ सप्टेंबर २०२५ […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे जाणीव शैक्षणिक १ संकल्पना ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच श्री गुरुदेव दत्त विद्यालय येथे जाणीव शैक्षणिक १ संकल्पना ट्रस्ट यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी वह्या व खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे प्रमुख प्रणेते ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष रवींद्र ढगे,आपटी असून, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ढगे आणि सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गव्हाणे यांच्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील बिबट प्रवण भागात विद्यार्थ्यांची जनजागृती; सहजीवनाचा संदेश देत वनविभागाचा उपक्रम

शिरूर(अरुणकुमार मोटे): “बिबट हा शत्रू नाही, जंगलाचा अविभाज्य घटक आहे” या संदेशासह शिरूर वनविभागाने बिबट प्रवण भागातील टाकळीहाजी, पिंपरखेड, चांडोह, जांबुत येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होता. माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे प्रोजेक्ट मॅनेजर महेंद्र ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात तेथील मुलांना, पालकांना बिबट्याच्या जीवनशैली, स्वभाव, सवयी तसेच मानव–बिबट संघर्ष कमी करण्यासाठी घ्यावयाच्या […]

अधिक वाचा..

मुंबई, हिंदू सण ‘रक्षाबंधन’ दिवशी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे; अ‍ॅड. अमोल मातेले

मुंबई: भारतीय परंपरेतील बंधुत्वाचे प्रतीक आणि पवित्र हिंदू सण – रक्षाबंधन यावर्षी ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जात आहे. त्याच दिवशी “ज्युनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट” ही महत्त्वाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे. रक्षाबंधन हा सण बहिणी आणि भावामधील अतूट प्रेम, विश्वास व सुरक्षा यांचे प्रतीक आहे. वर्षभर बहिण […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील सर्वच शाळांना ऑगस्ट महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या व त्याची कारण काय

मुंबई: ऑगस्ट महिना सुरू होण्याआधीच राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुढील ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. श्रावण हा महिना अध्यात्मिक साधनेचा काळ असतो. हा असा महिना आहे ज्या महिन्यात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते. या महिन्यात […]

अधिक वाचा..

या वर्षीपासून इयत्ता चौथी, पाचवी, सातवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची होणार शिष्यवृत्तीची परीक्षा

सोलापूर: चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता चौथी, पाचवी आणि सातवी, आठवी या चार वर्गांसाठी घेण्यात येणार आहे. तर पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त चौथी व सातवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. प्राथमिक शिक्षक संघटनांच्या या मागणीला शालेय शिक्षण विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. आतापर्यंत चौथी व सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मात्र, २०१६ […]

अधिक वाचा..

१० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती, असा करा अर्ज

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १०वी आणि १२वीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालांसोबतच, राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या एका विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, १०वी किंवा १२वीच्या परीक्षेत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे निकाल […]

अधिक वाचा..

विद्यार्थी हितासाठी बी.ई./बी.टेक व एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता बी.ई./बी.टेक तसेच एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज मागविण्यात आले होते. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक ११ जुलै २०२५ होती. आता मुदतवाढ देऊन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनी विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी अर्जाची पडताळणी करून घ्यावी

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. मंत्री श्री.पाटील म्हणाले, नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज पडताळणी प्रक्रिया निश्चित कालावधीत […]

अधिक वाचा..

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी मूळ प्रमाणपत्रे आता अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर करण्याची सवलत मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीन दिवस मुदतवाढ आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विविध आरक्षण प्रवर्गांतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना EWS/NCL/CVC/TVC बाबतची मूळ प्रमाणपत्रे अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर करण्याची सवलत देण्याचा […]

अधिक वाचा..