मसाल्याच्या डब्यातील ही पिवळी सोनसळी पावडर फक्त पाण्यात मिसळून प्या

हळदीचा वापर प्रामुख्याने भारतीय घरांमध्ये होतो. याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्याचा फायदा निश्चितच आरोग्याला होतो. त्यात अँटि ऑक्सिडंट्स, अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हळदीतील गुणधर्मामुळे बॅड कोलेस्टेरॉल, अपचन, ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी हळदीचे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. […]

अधिक वाचा..

किडनी स्टोनचा खूपच त्रास होतोय दररोज किती प्रमाणात पाणी प्याव

शरीराच्या महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणून किडनी ओळखली जाते. शरीरात साचलेली घाण याच किडनीच्या मदतीने बाहेर पडत असते. त्यामुळे जर तुम्ही किडनी निरोगी ठेवली तर तुमचं आरोग्य उत्तम राहतं. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक अवयवाचे कार्य योग्य प्रकारे होणे अत्यंत आवश्यक आहे. किडनी रक्त फिल्टर करण्याचे काम करते. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर; पाण्याच्या प्रश्नावर निवडणुक पण पाण्याची जबाबदारी कोण घेणार…? शेतकऱ्यांचा राजकीय नेत्यांना थेट इशारा…?

पाबळ (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची आणि शास्ताबाद या गावांचा ज्वलंत पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन ‘पाण्याच्या प्रश्नावर मतं घ्यायची, पण पाणी द्यायची जबाबदारी कुणाची…? असा थेट आणि आक्रमक सवाल शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना केला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाबळसह बारा गावांचा पाणीप्रश्न गाजवला जातो. मात्र निवडणुक संपताच […]

अधिक वाचा..

रोज सकाळी प्या शेवग्याच्या पानांचे पाणी तुमच्या शरीराला मिळतील ‘हे’ 7 आश्चर्यकारक फायदे

शेवग्याची शेंग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असे अनेक पोषक घटक असतात जे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात. म्हणून शेवग्याची शेंग सुपरफूड मानली जाते. तर शेवग्याच्या शेंगप्रमाणेच या वनस्पतीची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यवर्धक आहे. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या पानांचे पाणी प्यायल्यास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शेवग्याचे पाणी आरोग्यासाठी अनेक प्रकारे […]

अधिक वाचा..

तुम्हीही एका दमात पाणी घटाघट पिता का? ही वाईट सवय बिघडवते शरीरातील पाण्याचं संतुलन

पाणी म्हणजे शरीराचा प्राण. पण तुम्हाला ठाऊक आहे का, पाणी प्यायल्यानंतर ते शरीराला तत्काळ शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी मदत करत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाणी शरीरात गेल्यानंतर लगेच कामाला लागतं, मात्र ते पेशींपर्यंत पोहोचण्यासाठी आणि संपूर्ण शरीराला ताजेतवाने करण्यासाठी एक ठराविक वेळ घेतं. पाणी शरीरात कसं शोषलं जात पाणी प्यायल्यानंतर साधारण ५ ते १० मिनिटांत […]

अधिक वाचा..

तुम्ही निरोगी आहात, हे कसं ओळखाल

काही लोक सतत आजारी पडतात. यासाठी अनेकदा ते डॉक्टरांकडे जातात, पण त्याचा कधीही फायदा होत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. आपण काही कारणे जाणून घेऊया. या कारणांमुळे तुम्ही निरोगी आहात का? हे जाणून घेण्यास सोप्प होणार. 1) आहार योग्य आहे का  आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी […]

अधिक वाचा..

शरीरात पाणी कमी झाल्यावर कोणते अवयव दुखतात, एका दिवसात किती पाणी प्याव

शरीरातील पाण्याची कमतरता आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकते. म्हणूनच हेल्थ एक्स्पर्ट्स नेहमी शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा सल्ला देतात. पाणी कमी झाल्यास शरीरातील काही अवयवांमध्ये वेदना देखील जाणवतात. निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अन्यथा आरोग्य बिघडू शकतं. पोटदुखी  जे लोक दिवसभर पुरेसं पाणी पित नाहीत, त्यांना पोटात वेदना जाणवू शकतात. शरीरातील […]

अधिक वाचा..

पाणी जीव वाचवू शकतं, तसं जिवावर बेतूही शकतं, जास्त पाणी प्यायल्याने होतं ‘असं’ नुकसान

पाणी हे जीवन आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याशिवाय जगणं अशक्य आहे. पाण्याने केवळ तहान भागते असं नाही तर पाण्यातून शरीराला अनेक महत्वाचे मिनरल्स मिळतात जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने शरीर डायड्रेट राहतं, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण कोणत्याही गोष्टी अति करणं महागात पडत असतं. ते पाण्याबाबतही लागू पडतं. […]

अधिक वाचा..
shirur-rain

शिरूर तालुक्यात सोळा तास उलटूनही पावसाचा कहर कायम; पिकं पाण्याखाली…

शिरूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यात गेल्या सोळा तासांपासून मुसळधार पावसाचा कहर कायम असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील मेहनतीचे स्वप्न अक्षरशः पाण्यात वाहून गेले आहे. रविवारी (ता. १४) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचबरोबर बाजरी, मका, पाले भाज्या, फळबागा, नवीन ऊस लागवड या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. कांद्याची […]

अधिक वाचा..
Bhima river

शिरूर तालुक्यात गणपती विसर्जनादरम्यान भीषण घटना, युवक भीमा नदीत बुडाला…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे हद्दीतील भीमाशेत येथे गणपती विसर्जनाचा उत्साह असतानाच दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी (ता. ६) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विसर्जनासाठी गेलेला भीमराव लक्ष्मण चेरले (वय 30, रा. शिर्शी, ता. कंधार, जि. नांदेड, सध्या रा. भीमाशेत, तळेगाव ढमढेरे) हा युवक भीमा नदीत बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या […]

अधिक वाचा..