पंढरपूरच्या भूमीतून शिंदेंचा विकास मंत्र; भालके यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरणांना नवा ट्विस्ट

पंढरपूर: “विकासाचा वारकरी आणि धाडसी निर्णय घेणारा जननेता” अशी ओळख अधिक ठळक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या पावन भूमीतून जनतेशी थेट संवाद साधत विकास, हिंदुत्व आणि जनसेवेचा ठाम संदेश दिला. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या गजरात झालेल्या या विराट मेळाव्यात भगीरथ भालके यांच्या शिवसेना प्रवेशाने राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली, तर शिंदे यांच्या आक्रमक आणि […]

अधिक वाचा..

आशाताई यांच्या निधनाने संगीतविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत; जयकुमार रावल

मुंबई: ज्येष्ठ गायिका स्व.आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्व.आशाताई यांच्या रूपाने भारतीय संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.   आशाताई भोसले यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या […]

अधिक वाचा..
crime

शिरूर तालुक्यातील पोलिस चौकीजवळ काय सुरू आहे? हे पोलिसांना माहितच नव्हतं; अखेर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर मटका अड्डा सुरू होता. पण, पोलिसांना याबद्दल काहीच माहित नव्हते. अखेर पोलिस चौकीजवळ असलेल्या या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. कोरेगाव भीमा येथील वढू रस्त्यालगत असलेल्या खुशबू पान शॉपसमोर, एका हॉटेलच्या शेडमध्ये ‘कल्याण’ नावाचा मटका बेधडकपणे […]

अधिक वाचा..
shirur-tehsil-office

शिरूरमध्ये गुन्हेगारीचा सुळसुळाट; निलेश वाळुंज यांचा १५ एप्रिलपासून बेमुदत सत्याग्रह…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. विशेषतः शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आशीर्वादाने […]

अधिक वाचा..

भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द करा; नसीम खान

मुंबई युवक काँग्रेसच्या न्याय सत्याग्रहाला माजी मंत्री आरिफ नसीम खान यांची उपस्थिती मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील करून भारताचा स्वाभिमान, अस्मिता गहाण ठेवली आहे. या ट्रेड डिलमुळे भारताचे मोठे नुसकान होणार असून भारतातील कृषी क्षेत्र व आपला अन्नदाता पुर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द झाली पाहिजे, अशी […]

अधिक वाचा..

उबाठा गटात ‘संशय कल्लोळ’चा प्रयोग; खासदारांकडून रोज निष्ठेची परीक्षा; डॉ. ज्योती वाघमारे

मुंबई: शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर जोरदार टीका करत पक्षातील वातावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खासदारांमधील असंतोष दडपण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. उबाठा गटात सध्या ‘संशय कल्लोळ’ नाटकाचा प्रयोग सुरू असल्यासारखी परिस्थिती असून, खासदारांना दररोज निष्ठा सिद्ध करण्यासाठी आणाभाका घ्याव्या लागत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. […]

अधिक वाचा..

फुले द्विशताब्दी वर्षासाठी राज्यभर वर्षभर उपक्रम; शालेय शिक्षण विभागाचा व्यापक आराखडा जाहीर

मुंबई: महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त सन 2027 हे द्विशताब्दी वर्ष राज्यभर विविध उपक्रमांनी साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत सर्व शाळांमध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी व्यापक कृती आराखडा जाहीर केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे […]

अधिक वाचा..

शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती; ‘एक वही एक पेन’ अभियानाचे आवाहन

मुंबई: समाजातील आर्थिक दुर्बल तसेच आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी कार्यरत महामानव प्रतिष्ठान आणि ‘एक वही एक पेन’ अभियानाच्या वतीने यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शैक्षणिक उपक्रमांद्वारे साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महिनाभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाणार आहे. महापुरुषांच्या जयंती, महापरिनिर्वाण दिन, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती तसेच विविध मान्यवरांच्या वाढदिवसांवर मोठ्या प्रमाणात […]

अधिक वाचा..
crime

शिरुरमध्ये किरकोळ कारणावरुन एका मुलासह आईवर जीवघेणा हल्ला

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील करंजुलेनगर येथे अत्यंत किरकोळ कारणावरुन सुरु झालेला वाद थेट मारामारीत परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोखंडी खुट्या ठोकण्याच्या कारणावरुन संतापलेल्या तिघांनी एका तरुणासह त्याच्या आईवर विटा आणि हातोडीने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अमोल बाळासाहेब करंजुले (वय २९, रा. करंजुलेनगर, ता. शिरुर) या युवकाने […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दोन टोळ्यांतील ४ सराईत गुन्हेगार जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर आणि वेल्हे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या दोन वेगवेगळ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ४ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तीन जबरी चोरीचे (Robbery) गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्हीचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी […]

अधिक वाचा..