एसटी च्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उस्फूर्त प्रतिसाद; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिजिटल सेवांच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे ‘NCMC स्मार्ट कार्ड’ उपक्रम होय. सवलत धारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नोंदणीची संख्या आता 1 लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ही […]

अधिक वाचा..

ठाण्यातून राष्ट्रवादीचा पलटवार! रोहित पवारांचे राजकारण ‘घृणास्पद’; आनंद परांजपे

ठाणे: अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनावरून आमदार रोहित पवार राजकारण करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी रोहित पवारांचे वर्तन “अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद” असल्याचे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील […]

अधिक वाचा..

अजित पवार विमान अपघात! महिनाभरानंतरही गूढ कायम; अमोल मिटकरींचे घातपाताचे गंभीर आरोप

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला असताना तपासाचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध दावे-प्रतिदावे होत असून प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या परिसरात माध्यमांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी अपघात सूनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली. विमान रडारवरून अचानक गायब झाले, लँडिंग गिअरमध्ये छेडछाड […]

अधिक वाचा..

जेलमध्ये वाल्मिक कराड, बाहेर मुलाची ‘बोलणार’ पोस्ट; बीडमध्ये चर्चेचा स्फोट

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उसळलेला संताप अजूनही ओसरलेला नाही. राज्यभर आंदोलनं, आरोपींना अटक करण्यासाठी सरकारवर दबाव आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. या हत्याकांडात नाव आलेले वाल्मिक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, त्यांच्या मुलगा सुशील कराड याने सोशल मीडियावर टाकलेली एक ओळ […]

अधिक वाचा..

ग्रामपंचायतींवर जुन्या सरपंचांच्या नियुक्तीला ब्रेक; मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला स्थगिती

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारासंदर्भात महत्त्वाचा अंतरिम दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वादग्रस्त निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पुन्हा जुन्याच सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयावर खंडपीठाने गंभीर आक्षेप नोंदवला. पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही नवीन प्रशासक नियुक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणावर […]

अधिक वाचा..

वाघ्या–मुरळी परंपरेवर आधारित ‘फुला’ १७ एप्रिलपासून प्रदर्शित

मुंबई: मराठी मातीतल्या पारंपरिक वाघ्या–मुरळी लोकपरंपरेवर आधारित ‘फुला’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेतील स्त्री कलाकारांचा संघर्ष, वेदना आणि जिद्द मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. यावेळी […]

अधिक वाचा..

प्लास्टिक फुलांवर कठोर कारवाईचा इशारा; डेकोरेटर्स आणि हॉल व्यवस्थापनांनाही शिक्षा!

मुंबई: राज्यात नैसर्गिकरीत्या विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर पूर्वीपासूनच बंदी लागू असताना, ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) काढण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. नव्या निर्णयानुसार केवळ प्लास्टिक फुलांचे उत्पादन आणि विक्रीच नव्हे, तर सजावटीसाठी त्यांचा वापर करणाऱ्या डेकोरेटर्सनाही शिक्षेस पात्र ठरवण्यात […]

अधिक वाचा..

परीक्षा केंद्रावरील शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी गैरवर्तन, निलंबनाची कारवाई

संभाजीनगर: राज्यभरात दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका परीक्षा केंद्रावर गार्डिंगसाठी नियुक्त शिक्षकाने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीशी अयोग्य वर्तन करत तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर त्याने वारंवार फोन करून तिला मानसिक त्रास […]

अधिक वाचा..

उच्च व तंत्रशिक्षणातही ‘पवित्र’सारखी भरती प्रक्रिया? मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सकारात्मक संकेत

मुंबई: शालेय शिक्षण विभागातील ‘पवित्र’ पोर्टलप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षण विभागातही पारदर्शक पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट केले. राज्यातील शासनमान्य विद्यापीठे व महाविद्यालयांमधील पदभरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टलसारखी केंद्रीकृत यंत्रणा निर्माण करण्यात येणार का, असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. त्यास उत्तर देताना मंत्री […]

अधिक वाचा..

बहाद्दरांनो, बस्स करा! सुनेत्रा पवारांविषयीच्या वक्तव्यांवर संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी सुरू असलेल्या सार्वजनिक चर्चांवर आणि काही नेत्यांच्या वर्तनावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “प्रोटोकॉलसोबत स्त्रीसन्मान अत्यावश्यक” असा ठाम सूर समर्थकांकडून उमटताना दिसत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय घडामोडी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. या अपघाताबाबत संशय उपस्थित […]

अधिक वाचा..