घसादुखी पासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय 

घसा दुखणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की सामान्य सर्दी, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियाचा संसर्ग, ऍलर्जी, धूम्रपान, जास्त मद्यपान किंवा घशाची जळजळ. खोकला, ताप, डोकेदुखी आणि कान दुखणे. यासारख्या इतर समस्या सोबत घशात दुखणे देखील असू शकते. घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स बघूया. 1) कोमट पाण्याने गुळणी: कोमट […]

अधिक वाचा..

तोंडाच्या दुर्गंधामुळे त्रस्त आहात तर ‘या’ घरगुती टिप्स करा फॉलो 

तोंडातून दुर्गंधी येणे किंवा श्वासाचा वास येणे यामागे प्रामुख्याने अस्वच्छता आणि बॅक्टेरियांचा संसर्ग हे सर्वात मोठे कारण असते. आपण जे अन्न खातो, त्याचे सूक्ष्म कण दातांच्या फटीत, हिरड्यांच्या कडेला आणि जिभेच्या मागील भागावर अडकून राहतात. जर नियमितपणे दात घासले नाहीत किंवा फ्लॉसिंग केले नाही, तर हे अन्नाचे कण सडू लागतात आणि तिथे बॅक्टेरियांची वाढ होते. […]

अधिक वाचा..

जास्त पाणी पिणे धोकादायक

आज काल भरपूर पाणी प्या असा सल्ला दिला जातो, त्यात किडनी स्टोन चा त्रास असणाऱ्या लोकांचा तर जास्त पाणी पिण्यावर अधिक जोर असतो. परंतु जास्त पाणी पीने देखील आरोग्यास हानिकारक आहे. शरीरात 70% पाणी असते, त्यामुळे दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पित राहावे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते, पण जास्त पाणी प्यायल्याने ओवरहाइड्रेशनचा त्रास होऊ शकतो. […]

अधिक वाचा..

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याबाबत सरकारला ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रस्ता उभारण्यात आलेल्या ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा होऊनही तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा मुद्दा विधानपरिषद सदस्य हेमंत पाटील यांनी लक्षवेधी द्वारे विधान परिषदेत उपस्थित केला होता.“हा पुतळा नेमक्या किती दिवसांत उभारला जाणार?” असा प्रश्न त्यांनी सरकारकडे केला.यावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना […]

अधिक वाचा..

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या प्रश्नांवर बेमुदत उपोषणाचा सहावा दिवस

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राहणारे नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर गेल्या सहा दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कल्याण च्या प्रमुख बाजारात आणि नागरिकांना गरज असल्या ठिकाणी मोफत सार्वजनिक सौचालय व मुतारी उभारण्यात यावी, रुक्मिणी बाई दवाखाना नागरिकांसाठी सुसज्ज करावेत ज्यानी […]

अधिक वाचा..

त्या आमदाराला दिली जीवे मारण्याची धमकी; १० कोटींच्या खंडणीसाठी आंतरराष्ट्रीय कॉल

मुंबई: अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित आमदारांना तात्काळ कडक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. वडेट्टीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, १७ […]

अधिक वाचा..

शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारकडून पोलीस बळाचा वापर, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्ती लाटण्याचा घाट

मुंबई: गेल्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची स्थिती मांडली. विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानीचा पाढा वाचताना वडेट्टीवार म्हणाले की नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर ,नांदेड ,परभणी भागात वादळी […]

अधिक वाचा..

संत गाडगे महाराज यांचा जीवन संदेश आचरणात आणणे काळाची गरज; महापौर रितू तावडे

मुंबई: संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, गोरगरीब रुग्णांची सेवा आणि निवारा या सेवाकार्यांवर दिलेला भर आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. त्यांचा जीवन संदेश प्रत्येकाने आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी केले. संत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स – […]

अधिक वाचा..

भेदभाव आणि द्वेषाच्या वातावरणात सौंदळा गावाने एकता, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला

अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे मुंबई: सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श […]

अधिक वाचा..

मुंबई प्रेस क्लब चे उपाध्यक्ष रजनीश काकडे यांचे निधन; पत्रकारितेतील संवेदनशील दृष्टी हरपली

मुंबई: मुंबई प्रेस क्लब चे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ छायाचित्रकार पत्रकार रजनीश काकडे (वय ५५) यांच्या दुःखद निधनाने पत्रकारिताविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने माध्यम क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रजनीश काकडे हे केवळ अनुभवी छायाचित्रकार नव्हते, तर अनेक पिढ्यांतील तरुण छायाचित्र पत्रकारांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक होते. आपल्या कॅमेऱ्यातून त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण क्षण […]

अधिक वाचा..