जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा विश्वास केवळ आश्वासनांनी मिळत नाही; तो सातत्यपूर्ण काम, लोकहिताची भूमिका आणि विकासाभिमुख निर्णयांमधून निर्माण होतो. अनेक समर्थकांच्या मते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळणारा वाढता जनाधार हा त्यांच्या कार्यशैलीवरील आणि विकासाभिमुख दृष्टिकोनावरील जनविश्वासाचीच पावती आहे. महाराष्ट्र हा परिवर्तन, […]

अधिक वाचा..

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाच्या कालव्याला अनधिकृतपणे भगदाड पाडून पाइपलाइनद्वारे सायपन पद्धतीने पाणी वळवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे सिंचनाच्या पाणीपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शासनाच्या सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे १ लाख […]

अधिक वाचा..

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी: राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या संशयित प्रशांत वाडिले याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. शासनाच्या तिजोरीला तब्बल 160 कोटी रुपयांचा फटका बसविणाऱ्या या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी आर्थिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली असून, बनावट […]

अधिक वाचा..

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांनी दूध खरेदी करताना अधिक सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे. भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी पाम ऑईल, स्किम मिल्क पावडर, विविध रसायने, साबण, शॅम्पू आणि डिटर्जंटचा वापर होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कृत्रिम गायीचे […]

अधिक वाचा..

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने महाराष्ट्राच्या उद्योग, कृषी आणि निर्यात क्षेत्रासाठी जागतिक बाजारपेठेची नवी दारे खुली झाली आहेत. या करारामुळे राज्यात गुंतवणूक, रोजगार आणि निर्यातीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत आयोजित भारत-यूके व्यापक आर्थिक व व्यापार करार अंमलबजावणी […]

अधिक वाचा..

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : ‘सेफ फूड – सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल ₹2.93 कोटी किमतीचा संशयित खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यतेलाचे रिपॅकिंग केल्याचे आढळून आल्यानंतर बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स (पैठण) आणि बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रा. लि. (छत्रपती संभाजीनगर) या दोन कंपन्यांचे परवाने […]

अधिक वाचा..

शिंदोडीत डाळिंबाच्या बागेवर चोरट्यांचा डल्ला; ८० हजारांच्या डाळिबांची चोरी 

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून अज्ञात चोरट्याने तब्बल ८०० किलो ‘सुपर भगवा’ जातीची डाळिंबे चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीला गेलेल्या डाळिंबांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये असून, या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजाराम भानुदास ओव्हाळ (वय ४२, रा. शिंदोडी, […]

अधिक वाचा..

ओपन विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! फीमध्ये 50% ते 100% सवलत; जाणून घ्या पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रिया

मुंबई: उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची फी सवलत योजना उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंतर्गत खुल्या (Open) तसेच एसईबीसी (SEBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना उत्पन्न आणि अभ्यासक्रमानुसार 50 ते 100 टक्क्यांपर्यंत फी सवलतीचा लाभ मिळू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 […]

अधिक वाचा..

दुबार पेरणीचा संपूर्ण खर्च शासन उचलणार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या किंवा पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दुबार पेरणीसाठी लागणारा संपूर्ण खर्च आता जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या निर्णयानुसार, बियाणे न उगवल्यास किंवा पीक पूर्णपणे वाया गेल्यास पात्र शेतकऱ्यांना शासनामार्फत नवीन बियाणे उपलब्ध […]

अधिक वाचा..

कच्छी समाजाशी जिव्हाळ्याचे नाते कायम; ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: कच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोणशिरे’ गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी समाजाशी असलेले कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करत ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणारा हा उपक्रम गेली १९ वर्षे सुरू असून, प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहत असल्याचे […]

अधिक वाचा..