आष्टीला मोठी न्यायिक भेट! दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला न्यायिक सुविधेची मोठी भेट मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून बीड जिल्ह्यातील नागरिक, वकील संघटना आणि सामाजिक संस्थांनी उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र अधिक आनंदी, समृद्ध, प्रगतिशील होवो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विघ्नहर्ता गणरायाचरणी साकडे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मुंबई: “श्रीगणरायांच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्र अधिक आनंदी, समृद्ध आणि प्रगतिशील होवो,” अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी केली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी गणेश भक्तांसह राज्यातील सर्व जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. “संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ धार्मिक वा सांस्कृतिक पर्व राहिलेला नाही, तर तो लोकसहभाग, […]

अधिक वाचा..

मनोज जरांगेंना धक्का; आझाद मैदानात उपोषण करण्यास हायकोर्टाची मनाई

मुंबई: मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाने मंगळवारी मनाई केली. तसेच नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी द्यावी, असे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांची डोकेदुखी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या गावचे आरोग्य केंद्र ठरतंय ‘मृत्यू केंद्र’ ; बेजबाबदार डॉक्टरांवर ग्रामस्थांचा संताप 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सेवा वैदयकिय अधिकारी उपलब्ध नसल्याने अक्षरशः ठप्प झाली आहे. धक्कादायक म्हणजे नागरिकांना तक्रारीसाठी तेथे तक्रार पुस्तिका व हालचाल रजिस्टर उपलब्धच नाही.येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांचा जीव धोक्यात घालून ‘फक्त पगारखाऊ नोकरशहा’ म्हणून वागत असल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दोन डॉक्टरांची नेमणूक असूनही ते केंद्राच्या […]

अधिक वाचा..

पावसाळा आणि सर्दी खोकला

पावसाळा सुरु झाला की आपल्याला आल्हाददायी वाटतेच, कारण उकाड्यापासून काहीशी सुटका झालेली असते. पण या वातावरणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना घसा खवखवणे, सर्दी, डोकेदुखी, ताप अशा समस्या सुरु होतात. कालांतराने याचे रुपांतर संसर्गजन्य आजारात होते. अचानक उद्भवलेल्या या समस्या वातावरणातील बदलाने झाल्याचे आपल्या सगळ्यांनाच समजते. यामध्ये पावसात भिजणे, दमट हवामान, अस्वच्छ पाणी, बाहेरचे अन्न खाल्ल्याने होणाऱ्या […]

अधिक वाचा..

तळपायांची सतत आग होते का मग जाणून घ्या कारणे आणि उपाय

अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र ही समस्या सातत्याने उद्भविणारी आणि गंभीर असते. अशा वेळी ही समस्या उद्भविण्यामागे नेमके काय कारण असू शकेल याचे निदान करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करून घेऊन त्यानुसार […]

अधिक वाचा..

पाठदुखीची कारणे आणि ती कशी टाळायची

पाठदुखीचा त्रास सर्वात सामान्य आरोग्य समस्या आहे. पहिल्या पाठदुखीचा परिणाम कोणत्याही वयोगटातील लोकांवर होऊ शकतो. सुदैवाने, अशी काही सोपी तंत्रे आहेत, जी आपण पाठीच्या दुखण्याचे सामान्य कारण टाळण्यासाठी वापरू शकता. या लेखामध्ये ते तंत्रे सांगितली आहे आणि त्याद्वारे आपण सध्या अनुभवत असलेल्या पाठदुखीचा त्रास देखील कमी कसा करता येईल हे समजून घेऊ शकता. पाठदुखीची कारणे […]

अधिक वाचा..

बीड जिल्ह्यातील शिरूर-गेवराई तालुक्यांना जलसंपन्नतेची भेट…

सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतराला मंत्रिमंडळाची मान्यता; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला यश मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव, ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर कासार) व टाकळगाव (ता. गेवराई) येथील कोल्हापूर पद्धतीच्या तिन्ही बंधाऱ्यांचा विस्तार करून त्यांचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील […]

अधिक वाचा..

हाडात जमलेले युरिक एसिड 4 उपाय वापरून असे बाहेर काढा

आजकाल चुकीचा आहार आणि वाईट लाईफस्टाईलने युरिक एसिडच्या समस्या वेगाने वाढत आहे. वाढत्या वयानुसार युरिक एसिडची समस्या सर्वसामान्य मानली जाते. परंतू आता तरुणांनाही युरिक एसिडची पातळी वाढल्याने सांधेदुखी सुरु झाली आहे.याला जबाबदार राहणीमान, अयोग्य आहार आणि बैठे कामाने व्यायामाचा अभाव. शरीरात एकदा का युरिक एसिड वाढले की सांध्यात दुखणे, संधीवात होणे अशा समस्या होतात. यास […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षण रॅलीमुळे शहागड तुळजापूर पैठण शेवगाव वाहतूकित बदल नागरिकांनी घ्यावी नोंद

संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा बांधव मोठ्या संख्येने २७ व २८ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटी येथून मुंबईकडे जाणार आहे. या रॅलीमध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड व *छत्रपती संभाजीनगर* जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर चारचाकी व दुचाकी वाहनांसह सहभागी होणार असल्याने शहागड – तुळजापूर – पैठण – शेवगाव मार्गावरिल […]

अधिक वाचा..