३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार…

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत आज महत्त्वाची विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. गंभीर गुन्हेगारी आरोपांमध्ये अटक झाल्यास किंवा ताब्यात घेतल्यास पंतप्रधानांपासून ते राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि जम्मू आणि काश्मीरसह केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना पदच्युत करण्याची तरतूद या विधयेकांद्वारे केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी बुधवारी संसदेत तीन विधेयके मांडली जाणार असल्याची माहिती समोर आली […]

अधिक वाचा..

बेस्टच्या निवडणुकीत पराभव का झाला? ठाकरे गटाच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मुंबई: मुंबईतील बहुचर्चित बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. त्यानंतर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील 7 जागांवर विजय मिळवला. पण या निवडणुकीत मनसे-शिवसेना उत्कर्ष पॅनेल यांना […]

अधिक वाचा..

संततधार पावसामुळे शिरूर, शिक्रापूर महावितरणकडून शेतकरी व वीजग्राहकांना काळजी घेण्याचे आवाहन

शिरूर (अरुणकुमार मोटे): गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यात संततधार पावसाचा जोर कायम आहे. यामुळे शेतामध्ये व रस्त्यांवर लघुदाब व उच्चदाब वीज वाहिनीच्या तारा तुटून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच झाडे पडून वीज वाहिन्यांवर येण्याचेही प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीत शेतकरी व नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. शिरूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता […]

अधिक वाचा..

त्या खुणामागचे गुढ उकलण्याचे शिरूर पोलिसांपुढे आव्हान 

शिरूर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय ५0) यांचा कवठेयेमाई हद्दीतील गांजेवाडी, गणेशनगर परिसरात मृतदेह (दि. २०) रोजी उसाच्या शेतात सापडला होता. त्यांची टू व्हीलर गाडी ही त्याच परिसरात आढळल्याने त्यांचा मृतदेह थोड्या अंतरावरच मिळून आला होता. ते (दि. १९) पासून घराबाहेर गेले होते ते रात्री घरी न आल्याने त्यांच्या मुलांनी […]

अधिक वाचा..

ठाकरे ब्रँडचा पराभव, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल ठरलाय. ९ वर्षांपासून सत्तेत असताना आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतरही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. प्रसाद लाड यांचे ७ तर शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक १४ जागांवर विजय मिळवला. मुंबईमध्ये ‘ठाकरे ब्रँड’चा २१-० असा धुव्वा उडाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची […]

अधिक वाचा..

विद्यार्थी स्कुल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करावी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई: शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या पालकांना राज्य शासनाकडून दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. परिवहन आयुक्त […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी मुंबई मनपासाठी कंबर कसली; पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकांचा धडाका सुरू…

मुंबई: मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक आज समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली. मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर नवाब मलिक यांनी पक्षासाठी कंबर कसली आहे. पहिली बैठक व्यवस्थापन समितीची घेतल्यानंतर आज विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल, महिला, […]

अधिक वाचा..

युवक काँग्रेसचे संघटन महाराष्ट्रभर उभे करा; हर्षवर्धन सपकाळ

ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सत्ताधारी वाद निर्माण करत आहेत मुंबई: काँग्रेस पक्षातून काही लोक गेले पण ही सुद्धा नवीन नेतृत्वाला संधीच आहे. विधानसभेच्या २८८ जागां आहेत आण यावेळी काँग्रेसचे १६ आमदार निवडून आलेले आहेत. आता २७२ जागांवर नेतृत्व करण्याची संधी युवक काँग्रेसला आहे. लोकांच्या प्रश्नांवर संघर्ष करा. काँग्रेस विचार सर्वांना बरोबर घेऊन जाणारा […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम; पुरस्थितीत नदी-नाले पार करत आरोपीला पकडले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिसांच्या एका धाडसी मोहिमेत अपहरण झालेली एक एक अल्पवयीन मुलगी सुखरुप सापडली असुन मुख्य आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण कारवाईत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या महिला हवालदार विद्या बनकर यांनी दाखवलेली चिकाटी आणि धाडस विशेष कौतुकास्पद ठरले आहे. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे नोव्हेंबर २०२४ मध्ये एका अल्पवयीन […]

अधिक वाचा..

घोड धरणातुन २० हजार क्युसेसने नदीपात्रात विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा…

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सध्या धरणातुन नदीपात्रात एकुण २० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत असल्याची माहिती घोड पाटबंधारे विभागाचे उप अभियंता महेश शिंदे यांनी दिली. तसेच नागरिकांनी अनावश्यकपणे […]

अधिक वाचा..