अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच भावाचाही मृत्यू

साखरखेर्डा: येथील शशिकला रामकृष्ण सुरळकर (वय ८०) यांचे ११ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता रोकडोबा हनुमान मंदिरामागील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांसह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. यवतमाळ येथे वास्तव्यास असलेले त्यांचे धाकटे बंधू राम नामदेव ढोबळे हेही बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी साखरखेर्डा येथे आले होते. […]

अधिक वाचा..

भाजपला धक्का! माजी आमदार जीवन दैश यांचा राजीनामा; ‘पक्षात नैतिकता उरली नाही’ असा आरोप

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जीवन प्रदीप दैश यांनी शुक्रवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर करत पक्षावर नैतिकता ढासळल्याचा गंभीर आरोप केला.तीन वेळा आमदार राहिलेले दैश यांनी दोन दिवसांपूर्वी एका घोटाळ्यात आरोपी असलेल्या माजी खासदार रवींद्र कुमार यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याचा तीव्र विरोध दर्शवला होता. […]

अधिक वाचा..

राजस्थानात आमदारसंख्या वाढणार? 2028 निवडणुकीपूर्वी 200 वरून 270 जागांची चर्चा जोरात

जयपूर: देशात सध्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू असताना राजस्थानच्या राजकारणातही अचानक वेग आला आहे. राज्याची पुढील विधानसभा निवडणूक 2028 मध्ये होणार असली तरी विधानसभेतील आमदारसंख्या वाढवण्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष Vasudev Devnani यांच्या एका वक्तव्यानंतर ही चर्चा सुरू झाली. त्यांनी विधानसभेत 280 सदस्य बसू शकतील असा […]

अधिक वाचा..

CSW-70 च्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणासाठी जागतिक चर्चासत्र; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: संयुक्त राष्ट्रांच्या Commission on the Status of Women (CSW-70) या जागतिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर “SDGs and Mitigation of VAW: Weaving Ways for Empowerment” या विषयावर १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता विशेष समांतर (Parallel Event) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती तथा स्त्री-आधार केंद्र, पुणे यांच्या मानद अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या […]

अधिक वाचा..

युद्धजन्य पार्श्वभूमीवर शिरूरमध्ये एलपीजी-इंधन साठ्याचा आढावा; टंचाई नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण

शिरूर (अरुणकुमार मोटे): जगभरातील विविध भागांत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन शिरूर महसूल प्रशासनाने एलपीजी गॅस व इंधन साठ्याचा आढावा घेतला. शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पुरवठा नायब तहसीलदार सदाशिव व्हणमाने यांनी तहसील कार्यालयात तालुक्यातील एलपीजी गॅस वितरक, पुरवठा विभागाचे अधिकारी आणि प्रशासनातील संबंधित यंत्रणांची तातडीची बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. बैठकीत […]

अधिक वाचा..

गेली कुठे बाळासाहेबांची शिवसेना? जनतेच्या प्रश्नांवर रणरागिणी का शांत

गॅस तुटवड्याने जनतेची तडफड; बाळासाहेबांच्या शिवसेनेची आठवण पुन्हा जागी मुंबई: राज्यात सध्या घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल, मेस, घरगुती स्वयंपाक व्यवस्था अडचणीत आली आहे. काही भागात काळाबाजारही वाढल्याच्या तक्रारी समोर येत असून नागरिकांना मातीच्या चुली किंवा लाकडावर स्वयंपाक करण्याची वेळ येत असल्याचे […]

अधिक वाचा..

पाणीपट्टी वसुलीत कडक, पण स्वच्छ पाण्यात ढिलाई? जल विभागावर सवाल

दूषित पाण्यावर मुंबईकरांचा जीव धोक्यात; तात्काळ उपाय न केल्यास आंदोलन; ॲड. अमोल मातेले मुंबई: मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना दूषित, दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाच्या कारभारावर तीव्र […]

अधिक वाचा..

फुलगाव सैनिकी शाळा प्रकरणात उपसभापती नीलम गोऱ्हे यांची दखल; रस्ता कामाला स्थगितीचे निर्देश

पुणे: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तत्काळ दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामास त्वरित स्थगिती देऊन अधिकृत संयुक्त मोजणी करूनच पुढील निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. फुलगाव येथील लोकसेवा […]

अधिक वाचा..

जनगणनेत ओबीसींसाठी वेगळा रकाना द्या; विजय वडेट्टीवार

मुंबई: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी वेगळा रकाना नसल्याने ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्याची मागणी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केली. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाजाची लोकसंख्या सुमारे ५० टक्के असताना महाज्योतीसारख्या संस्थांना […]

अधिक वाचा..

एलपीजी दरवाढ तात्काळ रद्द करा; गॅस धोरणावर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन करावे; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: एलपीजी गॅसच्या दरात ६० रुपयांची वाढ करून केंद्रातील भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटले आहे. युद्धाचे कारण पुढे करून जनतेची लूट करण्याऐवजी ही दरवाढ तात्काळ रद्द करावी, तसेच एलपीजी गॅस संदर्भातील स्पष्ट धोरण पंतप्रधानांनी संसदेत जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. गॅस दरवाढ व गॅस […]

अधिक वाचा..