vaishnavi-jamkar-lonikand

लोणीकंद येथील ‘वैष्णवी’ने सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच संपवलं जीवन…

पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यात युवतीने आपलं जीवन संपवल्यामुळे लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे. वैष्णवी जामकर असे आत्महत्या केलेल्या विवाहीत युवतीचे नाव आहे. सासरच्या लोकांकडून, छळ करत पैशाची मागणी करण्यात येत असल्याने वैष्णवीने घरातच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, मुलीच्या कुटुंबीयांकडून दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये सासू-सासरा […]

अधिक वाचा..
shirkrapur-malthan-road

शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा…

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) शिरूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ते मलठण दरम्यान सुरू असलेल्या रस्ता नुतनीकरणाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने तसेच कामादरम्यान उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या नुतनीकरणासाठी सध्या मोठ्या प्रमाणात मातीचा वापर […]

अधिक वाचा..

महिंद्रा येणार संभाजीनगरला! १५० एकर जागेची पाहणी

छत्रपती संभाजीनगर: ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी Mahindra & Mahindra छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा औद्योगिक प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने अतिरिक्त शेंद्रा अर्थात जयपूर एमआयडीसी परिसरातील सुमारे १५० एकर जागेची नुकतीच पाहणी केली असून ही जागा कंपनीला पसंत पडल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेंद्रा–जयपूर एमआयडीसीमध्ये ऑटोमोबाईल उत्पादनाशी संबंधित मोठा प्रकल्प […]

अधिक वाचा..

मुलींना १००% तर मुलांना ५०% फी माफी; नियम मोडणाऱ्या कॉलेजांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय लागू केला आहे. या निर्णयानुसार मुलींना १०० टक्के शिक्षण शुल्क माफी तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना ५० टक्के शुल्क माफी देण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत याबाबत माहिती देताना स्पष्ट इशारा दिला की, शासनाच्या निर्णयानंतरही जर एखादे […]

अधिक वाचा..

कारकूड वस्ती शाळेत ‘आठवडा बाजार व आनंद मेळावा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारकूड वस्ती ता. शिरूर येथे विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षणाचा अनुभव मिळावा या उद्देशाने ‘आठवडा बाजार व आनंद मेळावा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला पालक, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील व्यवहाराचे धडे मिळावेत आणि शिक्षण अधिक आनंददायी व्हावे, या हेतूने शाळेच्या प्रांगणात […]

अधिक वाचा..

२०३० पर्यंत घरगुती वीजदर २६% ने कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: पूर्वी वीजेचे दर दरवर्षी सुमारे ९ टक्क्यांनी वाढत होते. मात्र आता २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षी वीजदर १.२ टक्क्यांनी कमी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी शनिवारी दिली. त्यामुळे २०३० पर्यंत घरगुती वीजदरात २६ टक्के तर औद्योगिक वीजदरात ९ टक्क्यांची घट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरजवळील अतिरिक्त बुटीबोरी […]

अधिक वाचा..

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल; आज दुपारी ४ वाजता वेळापत्रक जाहीर

मुंबई: देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून आज दुपारी ४ वाजता Election Commission of India पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. वृत्तानुसार, West Bengal, Kerala, Tamil Nadu आणि Assam या राज्यांसह केंद्रशासित प्रदेश Puducherry येथे होणाऱ्या विधानसभा […]

अधिक वाचा..

राज्यात पाच वर्षांत ६७५ बिबट्यांचा मृत्यू; पुणे विभागात सर्वाधिक

पुणे: राज्यात गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक कारणे, रस्ते अपघात, विहिरीत पडणे, विजेचा धक्का तसेच शिकारीमुळे तब्बल ६७५ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मृत्यूंपैकी सर्वाधिक १८१ बिबट्यांचे मृत्यू पुणे वन विभागात झाले असून नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. वन विभागाकडून विविध उपाययोजना राबवूनही बिबट्यांचे मृत्यू तसेच बिबट्यांमुळे होणारी मनुष्यहानी कमी करण्यात अपेक्षित […]

अधिक वाचा..

पत्रकार कल्याण महामंडळाचा घोळ; मंजूर निर्णय कुठे गायब?

‘आर्थिक विकास महामंडळ’ की पत्रकारांचा प्रश्न भरकटवण्याचा प्रयत्न? मुंबई: महाराष्ट्रात पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचा दावा असतानाही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे हा निर्णय नेमका कुठे आणि कसा अडकला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रकार आणि माध्यमकर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या शीतल हरीष करदेकर यांनी जुलै २०२४ मध्ये […]

अधिक वाचा..

सीईटी परीक्षांना २४ मार्चपासून सुरुवात; १७ मेपर्यंत टप्प्याटप्प्याने परीक्षा

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांना लवकरच सुरुवात होत आहे. विविध सात अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांच्या अंतिम तारखा जाहीर करण्यात आल्या असून येत्या २४ मार्चपासून परीक्षांचा प्रारंभ होणार आहे. उच्चशिक्षण विभागाच्या एलएलबी (तीन व पाच वर्षे), बी.एड. (जनरल व स्पेशल) व बी.एड. (ईएलसीटी), बी.पी.एड., एम.एड., […]

अधिक वाचा..