लवकरच एसटीचे रिटेल (किरकोळ ) इंधन विक्रीत पदार्पण; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त व्यावसायिक भागीदारीतून प्रकल्प कार्यान्वित होणार मुंबई: उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागिदारी तुन एसटी महामंडळ राज्यभरात स्वतः च्य जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक […]

अधिक वाचा..

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन

भाजपा युती सरकार बेशरम व लाचार, कोकाटेंचा राजीनामा न घेता क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; हर्षवर्धन सपकाळ मुंबई: राज्यातील भाजपा युती सरकार हे बेशरम व लाचार असून विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा सोडून क्रीडा मंत्रालय देऊन उचित सन्मानच केला आहे. आता रमी या खेळाला ऑलिंम्पिक दर्जा देतील व तो खेळणाऱ्याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानितही […]

अधिक वाचा..

गोकुळाष्टमी निमित्त राज्यातील १.५० लाख गोविंदांना विमा संरक्षण

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या मागणीला यश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद मुंबई: गोकुळाष्टमी अर्थात दहिहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारोात युवक-युवती “गोविंदा” म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. मात्र गेल्या काही वर्षांत सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी अनेक अपघात […]

अधिक वाचा..

शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच, यवतमाळमध्ये उबाठाला खिंडार

पश्चिम विदर्भातील १० हजार कार्यकर्त्यांचा लवकरच जम्बो पक्ष प्रवेश ठाणे: शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच असून यवतमाळमधील नेर नगपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने यवतमाळ जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार पडले आहे. गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला शिवसेना […]

अधिक वाचा..

सायकलचा आधार, भविष्याला आकार; पुणे जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

ग्रामीण विद्यार्थिनींसाठी दिलासा ठरणारी ‘सायकल बँक’ योजना सुरू शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा परिषदशिक्षण विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींसाठी ‘सायकल बँक’हा अभिनव आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. “सायकलचा आधार, भविष्याला आकार” या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ८ वी ते […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये महिला व तीन वर्षांचा मुलगा बेपत्ता; पतीने दिली शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार

शिरूर ( अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील शिवरत्न सोसायटी, शिक्षक कॉलनी येथून एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह कोणतीही पूर्वसूचना न देता घर सोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास सुरु आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा मंगेश जौंजाळ (वय २६) व तिचा मुलगा सम्यक मंगेश […]

अधिक वाचा..

महसूल सप्ताहात जनतेसाठी उपयुक्त उपक्रमांची रेलचेल – शिरूर तहसील प्रशासनाचा पुढाकार

शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर तालुका प्रशासनाच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, या कालावधीत विविध लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवणे, माहिती उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाबद्दल जनजागृती करणे हा आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी पुणे यांच्या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना एक वर्षाची कर्जमाफी देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक: संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातील एकटविलेल्या सर्व सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावर शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच पुढील दहा वर्षांत शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकारच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील सर्व सामाजिक संघटनांनी […]

अधिक वाचा..

रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार

मुंबई: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी समुहाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. टाटा समुह नेहमीच आपल्या तत्वांवर चालत आला आहे. त्यांनी कधीही आपल्या भूमिकेशी तडजोड केली नाही. पण, आता रतन टाटा यांचा एक निर्णय त्यांचीच पुढची पिढी बदलू शकते. टाटा ग्रुपच्या होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अलिकडेच टाटा […]

अधिक वाचा..

त्यांना मी कधीच मनापासून माफ करणार नाही अस नरेंद्र मोदी का म्हणाले होते

मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोटात प्रकरणात माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष कोर्टाने १७ वर्षांनंतर हा महत्वाचा निकाल दिला. या खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा या २०१९ मध्ये भोपाळमधून खासदार म्हणून निवडून आल्या, मात्र त्यांना काही दिवसांतच पंतप्रधान मोदींच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. “मी त्यांना […]

अधिक वाचा..