संतापजनक; नात्याला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना; बापाचा स्वतःच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर लैंगिक आत्याचाराच्या घटना वाढत असुन तुळजापूर येथुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आलेल्या ४० वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असुन त्यानंतर हि गोष्ट कोणाला सांगू नये यासाठी त्या नराधमाने पत्नी आणि मुलीला जिवे मारण्याचीही धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. […]

अधिक वाचा..

आमदार माऊली कटके यांच्या दुर्लक्षाने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तहसील कार्यालयाच्या आवारात आमदाबाद-मलठण या खराब रस्त्याच्या कामाबाबत आणि कोंढण ओढयाच्या पुलाच्या चुकीच्या कामाविषयी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आणि उपोषण आंदोलन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या शांततापूर्ण आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र या आंदोलनाकडे शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे संतापाची […]

अधिक वाचा..

निमोणेकरांनी जपली माणुसकी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या थोरात यांच्या कुटुंबियांना लाखोंची आर्थिक मदत

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथील हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब रंगनाथ थोरात यांचा करडे (ता. शिरुर) येथे (दि ८) जुन रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखाच्या प्रसंगी निमोणे ग्रामस्थांसह अनेक नातेवाईकांनी थोरात कुटुंबीयांना धीर दिला. तसेच निमोणे गावातील काही सोशल मिडिया ग्रुपच्या माध्यमातुन ग्रामस्थांनी या कुटुंबाला आर्थिक […]

अधिक वाचा..

तुळशीची पाने रोज चावून खा! अनेक आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोगी

आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते. तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने […]

अधिक वाचा..

शरीरात उष्णता अधिक आहे तर हे घरगुती उपाय अवश्य करा

अनेकांना शरीरात उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं काही समस्या उद्भवतात. डोळ्यांची आग, छातीत जळजळ, अंगावर उष्णतेचे फोड अशा समस्या येतात. अनेकांच्या अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतुमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळणे, अंगावर उष्णतेचे फोड येणं अशा तक्रारी जाणवतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे […]

अधिक वाचा..

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते, कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे, तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते. नितळ त्वचा, चमकदार केस, निरोगी नखे: व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्या प्रत्येक कामात मदत मिळेल. कटूपणा ऐवजी गोड बोलून कामे साध्य होतात हे लक्षात ठेवा. तुम्हाला ही कला शिकून घ्यायला हवी फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळणार नाही त्यामुळे तुमचा मूड खराब होईल. संध्याकाळपर्यंत रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्रीचा वेळ प्रियजनांसोबत भेटी होतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आर्थिक स्थिती ठिक आहे पण […]

अधिक वाचा..

मोदी व फडणवीस अधर्मी, जनतेला दिलेली आश्वासनं विरसले, नरेंद्र मोदी योगी नाही तर सत्ताभोगी

अहमदाबाद विमान अपघातामुळे काँग्रेसचे मतचोरी विरोधातील मशाल मोर्चे १५ जून पर्यंत स्थगित मुंबई: नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून पंतप्रधानपदावर आहेत पण ११ वर्षात त्यांनी जनतेल्या दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीची जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, महागड्या […]

अधिक वाचा..

मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश मुंबई: मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्टीच्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मातंग समाजाच्या मागण्यासंदर्भात बैठक […]

अधिक वाचा..

मळगंगा कुंड मृत्यू प्रकरण; पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नातेवाईकांची परवड, संतप्त नागरिकांची पोलिस प्रशासनावर टिका

शिरूर (अरुणकुमार मोटे): मळगंगा कुंडात पडून २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली असतानाही, पोलिस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृतदेह तब्बल अनेक तास कुंडातच पडून राहिलाआहे. नगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेच्या वादात पारनेर पोलिस व शिरूर पोलिसांनी जबाबदारी झटकत कारवाईस टाळाटाळ केल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शिवा दाराभाऊ ठाकरे (वय २८ वर्षे) […]

अधिक वाचा..