१०० रुपयांत मिळणार अकरावीत प्रवेश

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘हा’ हेल्पलाईन क्रमांक; जाणून घ्या, संपूर्ण माहिती… संभाजीनगर: राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात केंद्रीकृत प्रवेश प्रणाली लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे विद्यार्थी, पालकांचा वेळ, श्रम व पैसा यामध्ये बचत होणार आहे. ऑनलाईन नोंदणी कालावधी: १९ मे ते २८ मे २०२५ फीस: फक्त ₹१०० […]

अधिक वाचा..
balrangbhumi-karandi

करंदी गावात बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा तर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन…

शिक्रापूर : देशसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करत आणि जवानांना पाठिंबा देण्यासाठी करंदी (ता. शिरूर) येथे बालरंगभूमी परिषदेतर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात गावातील शाळेतील बालकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सकाळी 8 ते 10 या वेळेत ही रॅली ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू होऊन गावातून हनुमान मंदिरापर्यंत उत्साही वातावरणात काढण्यात आली. रॅलीदरम्यान “जय जवान – […]

अधिक वाचा..

जातीनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा, जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा

मुंबई: ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी या तत्वानुसार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. भाजपाने सातत्याने या मागणीला विरोध केला पण नाईलाजाने भाजपा सरकारने ती मान्य केली. जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून तेलंगणा व कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..

राज्यास्तरीय बाजार समित्यांचे सक्षमीकरण करताना शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे

मुंबई: राष्ट्रीय नामांकित बाजार अनुषंगाने राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचे हित जपले गेले पाहिजे. बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. बाजार समिती सदस्य जनप्रतिनिधींमधून निवडून येतात. शेतकऱ्यांचे, समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधीत्व करतात. या सदस्यांचे अधिकार कायम ठेवण्यातच शेतकरी व समाजाचे हित आहे. यातूनच बाजार समित्या अधिक कार्यक्षम, बळकट होतील. बाजार समित्यांसदर्भातील निर्णय घेत […]

अधिक वाचा..

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या स्मार्ट बस येणार; प्रताप सरनाईक

मुंबई: भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या ” स्मार्ट बसेस ” घेण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. नव्या ३ हजार बसेस खरेदी च्या अनुषंगाने बोलावलेल्या बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला एस.टी. महामंडळाचे […]

अधिक वाचा..

अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार; नीलम गोऱ्हे 

चौंडी: विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या मा. डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी दिनांक १५ मे रोजी सकाळी ११:३० वाजता चौंडी (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. या प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “चौंडी येथील हे भव्य स्मारक ग्रामस्थ व शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून उभारण्यात आले असून, अहिल्याबाईंचं […]

अधिक वाचा..

ग्रामीण रुग्णालय शिरूरमध्ये दंतचिकित्सकांची सेवा अडथळ्यात

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांची तातडीने उपाययोजनांची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): सर्वसामान्य ग्रामीण जनतेच्या आरोग्यसेवेचा केंद्रबिंदू असलेल्या शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेमण्यात आलेल्या दंतचिकित्सकांना आवश्यक उपचार साधनसामग्री उपलब्ध नसल्यामुळे सेवा सुरळीतपणे सुरू करता येत नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. ही बाब समजल्यानंतर याची गंभीर दखल घेत “सामाजिक कार्यकर्ते व व्हिसल ब्लोअर निलेश मंंदा यशवंत […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषदेसमोरील १७ एकर शासकीय जागा हस्तांतरणासाठी सकारात्मक पाऊल

महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा निर्णय घेण्यासाठी काल मुंबई येथील मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचा केंद्रबिंदू होता शिरूर नगरपरिषदेसमोरील सुमारे १७ एकर शासकीय जागेचे नगरपरिषदेकडे हस्तांतरण. ही जागा पूर्वी शिरूर नगरपरिषदेकडे होती, मात्र काही प्रशासनिक कारणांमुळे ती […]

अधिक वाचा..

काळ्या द्राक्षांचे 10 फायदे

आत्ताचा मोसम हा द्राक्ष्यांचा आहे, आणि द्राक्ष ही तब्येतीसाठी चांगली असतात. डायबिटीस, ब्लड प्रेशर यासारख्या आजारांवर काळ्या द्राक्षांचं नियमित सेवन नियंत्रण ठेवू शकतं. पाहूया काळ्या द्राक्षाचे नेमके काय फायदे आहेत ते. 1) डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, सात जण ताब्यात

८४ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील काचेआळी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर तीनपत्ती जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ८४,२६० रुपयांचा रोख रक्कम, विविध कंपनीचे मोबाईल फोन्स व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १४ मे रोजी रात्री साडेसात वाजता करण्यात आली […]

अधिक वाचा..