सावधान! एकाच जागी जास्त वेळ बसणं ठरू शकतं घातक, लवकर मृत्यूचा धोका…

जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्याने होतात हे आजार हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. चयापचय कमी होऊ शकतो. टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. तणाव आणि चिंता वाढते. हाडे आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात. काय करावे.. काम करताना नियमित ब्रेक घ्या उठून दर तासाला किमान 5-10 मिनिटे फिरा. दररोज लहान व्यायाम करा, जसे की स्ट्रेचिंग किंवा चालणे. डेस्क जॉब […]

अधिक वाचा..

कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालून हमीभावाने कापूस खरेदी करा…

मुंबई: कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या अधोगतीला जबाबदार भाजपा युतीला घरचा रस्ता दाखवा अन्यथा…

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात आल्यापासून मागील १० वर्षात महाराष्ट्राची पिछेहाट होत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप नव्हता तर वस्तुस्थिती आहे यावर केंद्रातील भाजपा सरकारनेच शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेच हा अहवाल दिला असून राज्यातील शिंदे भाजपाचे गुजरात धार्जिणे सरकार व केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिके मुळेच महाराष्ट्राची अधोगती झाल्याचा घणाघाती हल्लाबोल […]

अधिक वाचा..

महावितरणच्या माध्यमातुन विरोधकांचा सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न; शेखर पाचुंदकर

शिरुर (तेजस फडके) मंचर येथील २८ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या सभेला मोठ्या प्रमाणावर लोकांनी उपस्थिती दाखवली म्हणुन विजप्रवाह खंडित करुन विरोधकांकडुन महावितरणच्या माध्यमातुन सणासुदीला आमच्या लोकांवर सुड उगवायचा प्रयत्न होतोय अशी शंका उपस्थित करत महावितरणच्या माध्यमातुन सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम विरोधक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंबेगाव-शिरुरचे तालुकाध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी […]

अधिक वाचा..
ashok pawar

शिरुरकरांना शरद पवारांनी सांगितली सन १९८० ची ‘ती’ आठवण

शिरुर (तेजस फडके) शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही कार्यकर्ते दिवाळीनिमित्त शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी काही जुन्या आठवणींना उजाळा देताना पवार म्हणाले सन १९८० साली निवडणुक झाली. त्यावेळी माझ्या नेतृत्वाखाली ५८ आमदार निवडुन आले. त्यामुळे मी विरोधी पक्ष नेता झालो आणि विरोधी पक्षाचं काम करायला लागलो. पण आठ दिवसांसाठी मी काही […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर घोडगंगा कारखाना नक्कीच चालु करु; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) काही लोकांनी मत मागताना राष्ट्रवादीच्या नावावर मत मागितली. मात्र त्यानंतर सत्ता आल्यावर आपल्या पक्षाच्या चिन्हासह काही लोकांनी पलायन केल. राष्ट्रवादी पक्ष ज्यावेळेस फुटला तेव्हा महाराष्ट्र राज्यातुन जे पाच सहा आमदार आमच्या पाठीमागे मजबुतीन उभे राहिले. त्यात अशोक पवारांचं नाव आवर्जुन घ्यावं लागेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार […]

अधिक वाचा..

कारखान्याचे कर्मचारी तुम्हाला निवडणुकीसाठी वापरायचे असल्याने तुम्ही कारखाना सुरु केला नाही

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्यातील दरवर्षी साखर कारखाने २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर पर्यंत सुरु होतात. फार उशीर झाला तर ५ नोव्हेंबर दरम्यान कारखाने चालु होतात. भीमाशंकर साखर कारखाना दरवर्षी ऑक्टोबरच्या शेवटी सुरु होतो. परंतु तुम्हाला निवडणुकीसाठी कारखान्याचे कर्मचाऱ्यांची गरज असल्यामुळे तुम्ही कारखाना अजुनही सुरु केला नाही असा गंभीर आरोप नाव न घेता देवदत्त निकम […]

अधिक वाचा..
sharad-pawar-devdatta-nikam

आमदार पळवण्यात आंबेगावचे कारभारी सहभागी: शरद पवार

बारामती (प्रतिनिधी): “मोठ्या विश्वासाने मी त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मात्र त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला, असं कधी घडेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.” पक्षफुटीच्या वेळेस आपले ५४ पैकी ४४ आमदार पळवले आणि ते पळवण्यात आंबेगावचे आमदारही सहभागी होते’ अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांच्यावर […]

अधिक वाचा..

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांकरिता केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

ठाणे: विधानसभा मतदारसंघ 134 भिवंडी (ग्रामीण), 135 शहापूर, 136 भिवंडी (पश्चिम), 137 भिवंडी (पूर्व) व 138 कल्याण (पश्चिम) या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री.रविंदर सिंधू (IRS) हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. श्री.सिंधू हे विश्रामगृह पडघा, बोरिवली तर्फे, राहुर व शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. […]

अधिक वाचा..

राज्यात 18 ते 19 वयोगटातील तर वयाची शंभरी पार केलेले किती मतदार आहेत बघा…

मुंबई: राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील एकूण 22 लाख 22 हजार 704 तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले 47 हजार 392 मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली […]

अधिक वाचा..