दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 92.09 टक्के, मुलींची बाजी

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अपयशी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भरदिवसा मेंढपाळावर जीवघेणा हल्ला

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील वाघाळे गाव एकदा गुन्हेगारीच्या घटनेने हादरले असुन भरदिवसा एका ज्येष्ठ मेंढपाळावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नारायण पंडु शिंगाडे (वय ६५, रा. शिंगाडवाडी, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ‘एम डी’ ड्रग प्रकरणात मोठ्या ‘माशां’वर कारवाई कधी…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुका सध्या एमडी ड्रगच्या विळख्यात अडकत चालल्याचे चित्र दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे. पोलिसांनी लहान-मोठ्या पेडलर्सना अटक करून लाखो-कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला. मात्र या संपुर्ण रॅकेटमागील खरे सुत्रधार अजुनही मोकाट असल्याची सध्या सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. “पोलिसांच्या हाताशी लागले ते फक्त प्यादे असुन या खेळातील ‘किंग’ कोण…?” असा संतप्त सवाल […]

अधिक वाचा..

घरगुती उपायांचे आरोग्यदायी फायदे आणि मर्यादा जाणून घ्या

आम्लपित्तावर आवळा फार गुणकारक आहे. आवळ्याच्या रसात जिरे आणि खडीसाखर घालून सकाळसंध्याकाळ दिवसातून दोन वेळा घ्यावा. आठपंधरा दिवसांत आम्लपित्त थांबते. ताजा आवळा नसताना पूडसुद्धा चालते. आवळा भाजून खाल्ल्याने खोकल्यास लगेच आराम पडतो. अंगावर पित्त उठत असेल तर… कुटलेला ओवा आणि गूळ एकत्र करून तो आल्याच्या रसातून घेतल्यास हा विकार बरा होतो. पोटातल्या उष्णतेवर धने उपयुक्त […]

अधिक वाचा..

ऑफिसात खुर्चीवर बसून मान-पाठ-कंबर दुखते या ५ सोप्या गोष्टी करा

आपल्यापैकी बरेचजण ऑफिसमध्ये बैठे काम करतात. बैठे काम म्हटलं की तासंतास खुर्चीवर एकाच जागी बसून काम करणे आले. दिवसभरातील काही तास सलग एकाच जागी बसून शरीराची हालचाल न करता काम केल्यास त्याचा त्रास होतो. ऑफिसमध्ये एकाच जागी खुर्चीवर बसून राहिल्याने पाठ आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना होणे यांसारख्या समस्या सतावतात. खुर्चीवर चुकीची बसण्याची पद्धत, हालचालींचा […]

अधिक वाचा..

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून, राज्य विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज असल्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सांगितले. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष To Lam यांच्या एकदिवसीय मुंबई दौऱ्यानिमित्त आयोजित इंडिया-व्हिएतनाम बिझनेस फोरममध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी व्हिएतनामी उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री फडणवीस […]

अधिक वाचा..

वादळामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; सर्वजण सुखरूप

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हेलिकॉप्टरला आज दुपारी ठाणे ग्रामीण परिसरातील खराब हवामान आणि वादळाचा फटका बसला. मात्र, पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर मागे वळवून जुहू येथील पवनहंस हेलिपॅडवर सुरक्षित लँडिंग केले. या घटनेत कुणालाही कोणतीही इजा झाली नसून शिंदे यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री शिंदे हे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील लग्नसमारंभासाठी […]

अधिक वाचा..

होमगार्ड जवानांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर महाआंदोलन

मुंबई: पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना नियमित काम आणि वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बसव प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार, दि. ११ मे रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे महाआंदोलन करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन […]

अधिक वाचा..

फेरीवाला प्रश्नावर उच्च न्यायालयाचे कडक निर्देश

५ आठवड्यांत ९९ हजार फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याचे आदेश मुंबई: मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला कडक शब्दांत फटकारले असून, न्यायालयाने संरक्षित ९९ हजार फेरीवाल्यांना पाच आठवड्यांत ओळखपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने बुधवारी झालेल्या सुनावणीत “तीच तीच कारणे देताय, हे म्हणजे पालथ्या […]

अधिक वाचा..

फडणवीसांच्या नव्या पुण्यात गुन्हेगारी वाढली; मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

पुण्यातील वाढत्या अत्याचार, ड्रग्ज, कोयता गँग आणि भूमिगत रस्ता प्रकल्पातील भ्रष्टाचारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जोरदार टीका पुणे: “देवेंद्र फडणवीस हे ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ असल्याचे पोस्टर्स शहरभर लावले जात आहेत, मात्र त्यांच्या काळात पुण्यात महिलांवरील अत्याचार, ड्रग्जचा विळखा, कोयता गँग आणि गुंडगिरी वाढली आहे,” असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […]

अधिक वाचा..