जानेवारी ते डिसेंबर २०२६ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना (वॉर्ड रचना) कार्यक्रम ग्रामविकास विभागाने अधिकृतपणे जाहीर केला आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामविकास विभाग यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी हा कार्यक्रम प्रसिद्ध केला असून, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १० नुसार संपूर्ण प्रक्रिया निश्चित […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपतीत किसान जागृती यात्रेत सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कन्याकुमारी ते काश्मीर हि देशव्यापी किसान जागृती यात्रा सोमवार दि १६ फेब्रुवारी २०२६ रांजणगावात दाखल होताच हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन त्याचे जोरदार स्वागत केले. ढोल-ताशा, घोषणाबाजी आणि भगव्या-हिरव्या पताकांनी परिसर भरुन गेला होता. या यात्रेचे नेतृत्व वरिष्ठ शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल करत असून ७ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान देशभर शेतकरी […]

अधिक वाचा..

‘लव्ह जिहाद’ व सक्तीच्या धर्मांतराविरोधात कठोर कायद्याची मागणी; शिरूर तहसीलदारांना निवेदन

(शिरूर अरुणकुमार मोटे): राज्यात कथित ‘लव्ह जिहाद’ तसेच बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांबाबत कठोर कायदा करण्याची मागणी करत सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि. १३ फेब्रुवारी २०२६) शिरूर येथे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र शासन यांनी ‘लव्ह जिहाद’ व सक्तीच्या धर्मांतराच्या […]

अधिक वाचा..

शिरूर शहराजवळील ग्रामपंचायत हद्दीतील बाबुरावनगरमधील ओपन प्लॉट झाले कचराकुंड्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरालगत शिरूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विकसित झालेल्या बाबुरावनगर या उपनगरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वर्गीय बाबुरावजी पाचर्णे यांच्या दूरदृष्टीतून मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत आणि शिरूर शहराला पर्याय म्हणून बाबुरावनगरची उभारणी करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात सुमारे अडीच कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, शाळा, रस्ते […]

अधिक वाचा..
nirmala-navale

Video: कारेगावच्या सरपंच मॅडमला पुन्हा डिवचलं…

शिरूर: कारेगावमध्ये (ता. शिरूर) पंचायत समिती निवडणुकीनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांच्या पराभवानंतर भाजपच्या विजयी उमेदवाराकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर नोटांची उधळण केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) पंचायत समिती कारेगाव गणातून भाजपच्या मनीषा पाचंगे […]

अधिक वाचा..

रांजणगाव एमआयडीसीत केबल चोरट्यांचा पर्दाफाश; ४ जणांना अटक, तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके): औद्योगिक वसाहतीत कंपन्यांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या केबल चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना मोठे यश आले आहे. स्पर्श इलेक्ट्रॉनिक कंपनीतील केबल वायर बंडल चोरी प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल १८,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दोन गुन्हे उघडकीस आले असून आणखी […]

अधिक वाचा..

शब्द पाळणारा नेता राजेंद्र जगदाळे (RB) अनोसेवाडीच्या वाडी-वस्त्यांवर उजळला प्रकाश…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील अनोसेवाडी येथील वाडी-वस्त्यांवर अनेक वर्षांपासून अंधाराचे साम्राज्य होते. रात्रीच्या वेळी महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र दिलेला शब्द पाळत करडे गावचे सुपुत्र आर बी पाटील (राजेंद्र) जगदाळे यांनी या समस्येवर ठोस उपाय करत वाडी-वस्त्यांवर पथदिवे बसवून प्रकाशाचा मार्ग खुला केला. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भीषण अपघात! निमोणे येथील काळे कुटुंबावर मध्यरात्री काळाचा घाला

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमोणे गावावर मध्यरात्री दुःखाचा डोंगर कोसळला असुन न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती दरम्यान झालेल्या भीषण अपघातात काळे कुटुंबातील दोघांचा तर त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला असुन एक जण गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. या दुर्घटनेमुळे निमोणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास […]

अधिक वाचा..

आमची लग्न व्हायची आहेत; मुठभर चुकीच्या लोकांसाठी शिरुरची बदनामी कशासाठी…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांनी निवडणुकीत दारु आणि ड्रॅगचा मोठया प्रमाणात वापर केल्याचा विरोधकांवर गंभीर आरोप केला. या वक्तव्यांमुळे संपुर्ण तालुक्याच्या तरुणाईवर संशयाची सावली पडली असून, संतप्त युवकांनी सोशल मिडीयावर […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे किसान जागृती यात्रेची १६ फेब्रुवारीला जाहीर सभेची तयारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): देशातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांसाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत देशभर सुरु असलेली किसान जागृती यात्रा सोमवार दि १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे दाखल होणार असुन या यात्रेचे विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना व जनआंदोलनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. देशातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित व […]

अधिक वाचा..