तिरंगा देशाची आन, बान आणि शान; महाराष्ट्रात सर्वदूर तिरंगा पोहचवण्याचा संकल्प करा

मुंबई: तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व संविधानवादी लोकांनी मात्र भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश […]

अधिक वाचा..

पुणे हादरलं! सोन्याच्या दागिन्यांच्या वादातून पतीकडून पत्नीचा चाकूने खून

पुणे: पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई (ता. हवेली) परिसरात कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले असून, सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून संतप्त झालेल्या पतीने पत्नीचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, खुनात वापरलेला लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे. काय […]

अधिक वाचा..

भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण जाहीर! संजय राऊतांचा संताप, मोदी सरकारवर जोरदार टीका

मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026 सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मभूषण पुरस्कारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची निवड करण्यात आली आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिका महापौरपदावरून राजकीय घडामोडींना वेग; संजय राऊतांचा शिंदे सेनेवर मोठा दावा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजप आणि शिंदे गटात हालचाली सुरू असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत मोठा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदेंकडून लवकरच धनुष्यबाण चिन्ह जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. इतकंच नाही तर, “माझ्या हातात सत्ता आली तर भारतीय जनता पार्टीचे १५ […]

अधिक वाचा..

महापौरपदासाठी घोडेबाजार! ठाकरे गटाचे नगरसेवक ‘बेपत्ता’ प्रकरण थेट पोलिसांत

कल्याण: राज्यातील महानगरपालिका निवडणुका संपल्या असल्या तरी महापौरपदासाठी सुरू असलेला राजकीय घोडेबाजार अजूनही थांबलेला नाही. आपल्याच पक्षाचा महापौर बसावा यासाठी प्रत्येक महापालिकेत सर्वात मोठा पक्ष पूर्ण ताकदीने हालचाली करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) राजकारण सध्या प्रचंड तापले आहे. कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात खळबळ! साताऱ्यात 6 हजार कोटींच्या एमडी ड्रग कारखान्यावर गुजरात डीआरआयची गुप्त कारवाई

सातारा: गुजरात राज्यातून आलेल्या नार्को ड्रग पथकाने सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात केलेल्या धक्कादायक कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी येथे असलेल्या एका मोठ्या शेडवर छापा टाकत पथकाने सुमारे 6 हजार कोटी रुपये किमतीचा एमडी (मेफेड्रोन) ड्रग तयार करण्याचा संपूर्ण साहित्यसाठा जप्त केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या अत्यंत गोपनीय कारवाईचे विशेष […]

अधिक वाचा..

लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा! ‘सजग पालक – सुरक्षित बालक’ मोहिम गाव ते शहर पातळीवर राबवायलाच हवी

बदलापूर: बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर शाळाबसमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण बदलापूर–कल्याण परिसर हादरून गेला आहे. या धक्कादायक घटनेमुळे शाळा व्यवस्थापन, शाळा बस व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अशा घटना रोखण्यासाठी गाव ते शहर पातळीवर ‘सजग पालक – सुरक्षित बालक’ जनजागृती मोहिम राबवण्याची जोरदार मागणी होत आहे. प्राप्त माहितीनुसार, संबंधित चिमुकली […]

अधिक वाचा..

मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा; प्रताप सरनाईक

मुंबई: कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आज मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या, तसेच काही […]

अधिक वाचा..

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी

मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी मुंबई: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर केवळ टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) झाले असतील, तर ही राज्यासाठी आनंदाची बाब आहे. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यकच आहे. मात्र, मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य व सेवापदक विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई: भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या शौर्य व सेवा पदकांमध्ये महाराष्ट्रातील ८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश झाला आहे. या सर्व पुरस्कार विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रातील ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’, उत्कृष्ट व विशिष्ट सेवेसाठी ६ अधिकाऱ्यांना […]

अधिक वाचा..