झेपत नसेल तर गृहमंत्रीपद सोडा! महाराष्ट्राची अब्रू वेशीवर; जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका

मुंबई: बदलापूरमध्ये एका चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली असल्याची तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सरकार गुन्हेगारांसमोर हतबल झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले […]

अधिक वाचा..

बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजना; २३ जानेवारीपासून राज्यभर अंमलबजावणी

मुंबई: सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धेला सुरक्षितता आणि परवडणाऱ्या खर्चाची जोड देणारी एक महत्त्वाकांक्षी लोकाभिमुख योजना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साकारली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे — एसटी संगे तीर्थाटन’ या विशेष योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना म्हणजे श्रद्धा, सुविधा आणि […]

अधिक वाचा..

निवडून आलात म्हणजे हवेतील भाषा चालणार नाही; सहर शेख यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा थेट इशारा

मुंब्रा पालिकेतील एआयएमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातील वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सहर शेख यांनी “अहंकारी लोकांना जनतेने कसे हरवले ते पाहिले ना?” अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर […]

अधिक वाचा..

हायकोर्टाचा दणका! हायकोर्टाचा दणका अन् मंत्र्याचा मुलगा अखेर सरेंडर

महाड: रायगड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी घडामोड समोर आली आहे. राज्याचे मंत्री व शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी अखेर महाड शहर पोलीस ठाण्यात सरेंडर केले आहे. नगर पालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल होता. नेमकं प्रकरण काय? मागील महिन्यात २ डिसेंबर २०२५ रोजी राज्यात नगर पालिका निवडणुकीसाठी मतदान […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताकदिनी राज्यातील सर्व शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन अनिवार्य

१०० टक्के विद्यार्थी उपस्थितीचे उद्दिष्ट; सुट्टी देऊ नये; शिक्षण आयुक्तांचे आदेश मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये येत्या प्रजासत्ताकदिनी (ता. २६) देशभक्तिपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम आयोजित करणे अनिवार्य असल्याचे आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती राहील याची दक्षता शाळांनी घ्यावी, […]

अधिक वाचा..

२३ जानेवारी! नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुंबई: आज, २३ जानेवारी रोजी भारताच्या इतिहासातील दोन तेजस्वी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांची जयंती साजरी होत आहे. स्वातंत्र्यलढ्याचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्मतारीख आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिशातील कटक येथे झाला. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ्याचा मार्ग स्वीकारत […]

अधिक वाचा..

१ एप्रिल पासून देशात पहिली डिजिटल जनगणना; ३३ प्रश्नांची माहिती देणे नागरिकांना बंधनकारक

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आगामी जनगणनेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली असून, १ एप्रिल पासून भारतात पहिल्यांदाच पूर्णतः डिजिटल जनगणना राबवली जाणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर होणारी ही जनगणना प्रशासनिक व्यवस्थेत मोठा बदल घडवणारी ठरणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी जातीवर आधारित आकडेवारीही डिजिटल पद्धतीने गोळा केली जाणार आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जनगणनेचा पहिला टप्पा १ […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही! मंत्र्याचा मुलगा फरार, तरी अटक नाही; हायकोर्टाचा राज्य सरकारला जाब

मुंबई: महाड नगर परिषदेच्या मतदानाच्या दिवशी झालेल्या तुफान हाणामारी प्रकरणात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि पुतण्या महेश गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल होऊन महिना उलटूनही अटक न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची तीव्र शब्दांत खरडपट्टी काढली आहे. “मंत्र्यांचा मुलगा फरार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच कसे करत नाहीत? महाराष्ट्रात कायद्याचे राज्य […]

अधिक वाचा..

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीची घोषणा

मुंबई: राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने गुरुवारी (दि. २२) एक ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करताना भरणे म्हणाले की, कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी विशेष समितीची […]

अधिक वाचा..

साईचरणी टाटा सिएरा अर्पण; टाटा मोटर्सच्या पुणे रिजन डिलर्सकडून शिर्डी संस्थानला 25.70 लाखांची कार भेट

जागतिक स्तरावर श्रद्धेचे केंद्र असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दरबारात दररोज हजारो भक्त नतमस्तक होतात. सामान्य भाविकांपासून ते उद्योगजगतातील नामांकित व्यक्तींपर्यंत सर्वांचीच साईचरणी अढळ श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील अधिकृत डिलर्सनी एक स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित टाटा सिएरा ही कार बाजारात अधिकृत विक्रीसाठी उपलब्ध होण्यापूर्वीच तिचे पहिले युनिट […]

अधिक वाचा..