जिल्हा स्तरापासून ग्राम स्तरापर्यंत संघटना बांधणी करण्यासाठी राज्यात काँग्रेसचे संघटन सृजन अभियान

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी संघटन सृजन अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानातून राष्ट्रीय पातळीवरील नेते जिल्ह्यात जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे, यासोबतच तालुका, मंडल स्तर तसेच ग्राम स्तरापर्यंतच्या नियुक्त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करणार आहे. संघटना मजबूत […]

अधिक वाचा..

जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो

मुंबई: जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान महावीरांचा अहिंसा, सत्य आणि करुणेचा संदेश आज अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.भारत जैन महामंडळ आयोजित 2625 वा श्री श्रमण भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव दादर, मुंबई येथे उत्साहात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जैन […]

अधिक वाचा..

महसूल अधिकाऱ्यांचे ‘महा’वसुल अभियान थांबवा!

मुंबई: जुन्नर-आंबेगाव उपविभागातील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महसूल खात्यातील भ्रष्टाचाराचा कुरूप चेहरा उघड केला आहे. एका इमारतीच्या अंशतः पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी पाच लाखांची मागणी करून अखेरीस दोन लाखांवर सौदा ठरविण्यात आला. आणि २८ मार्च २०२६ रोजी […]

अधिक वाचा..

दादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे; सुनिल तटकरे

मुंबई: दादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. दादांनी ज्या कठोर परिश्रमातून एनडीएसोबत जाण्याची क्षमता प्रखरतेने दाखवली होती…आत्मविश्वासाने दाखवली होती. मात्र लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा ज्या आत्मविश्वासाने दादांनी पक्षाचे संघटन आम्हा सर्व सहकार्‍यांना विश्वासात घेऊन […]

अधिक वाचा..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शिवशाही पुनर्वसन’ प्रकल्पाला बळकटी: एकनाथ शिंदे

मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा पुढे नेत झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. पारदर्शकता आणि वेग ह्याला आमची प्राथमिकता असून प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आता खाजगी विकासक आणि शिवशाही पुनर्वसन प्रकल्प यांच्यात ‘विशेष संयुक्त उपक्रम’ (एसपीव्ही) तयार करण्यास मान्यता देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]

अधिक वाचा..

आंदोलनातून विधान परिषदेत; बच्चू कडूंची शिवसेनेत एंट्री, शिंदेंचा नवा राजकीय प्रयोग

नीलम गोऱ्हे यांनाही उमेदवारी; “कार्यकर्ता ते निर्णयकर्ता” मॉडेलची चाचणी मुंबई: आंदोलन करणाऱ्यांना सत्तेबाहेर ठेवण्याची पारंपरिक पद्धत मोडीत काढत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. प्रहार संघटनेचे नेते Bacchu Kadu यांना शिवसेनेत घेत थेट विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यासोबतच माजी उपसभापती Neelam Gorhe यांनाही उमेदवारी देत पक्षाने अनुभव आणि आंदोलनातून आलेले […]

अधिक वाचा..

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा; जयकुमार रावल

मुंबई: बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर शेतीमालाच्या उत्पादनासोबतच त्याचे मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि विक्री या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी उत्पादक […]

अधिक वाचा..

बळीराजा कायद्यांसाठी नाही; कायदे बळीराजासाठीच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड: “कायदे शेतकऱ्यांसाठी असतात; शेतकरी कायद्यांसाठी नसतो. काहींनी बळीराजाचा वापर करून त्याचाच बळी घेतला, पण आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ठोस निर्णय घेतले,” अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर तोफ डागली.नांदेड-लोहा येथे पार पडलेल्या भव्य शेतकरी अधिवेशन व पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी हित, विकासकामे आणि विरोधकांवर जोरदार टीका करत दमदार राजकीय संदेश दिला. शिंदे […]

अधिक वाचा..

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात शालेय शिक्षण विभागाचा गौरव

मुंबई: शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञानाधिष्ठित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून २४x७ तत्पर, बहुभाषिक आणि सुलभ माहिती उपलब्ध करून देण्यात यश मिळवले आहे. या अभिनव आणि लोकाभिमुख कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागाचा गौरव करण्यात आला. डिजिटल प्रशासन, पारदर्शकता […]

अधिक वाचा..

वाचन चळवळ समृद्धीसाठी कटिबद्ध; मनपा ग्रंथालय शाखांच्या अनुदानवाढीसाठी सहकार्य करणार; महापौर रितू तावडे

मुंबई: मुंबईच्या महापौर Ritu Tawde यांनी शनिवारी Mumbai Marathi Granth Sangrahalaya येथे आयोजित ‘मुंबई शहर ग्रंथोत्सवा’ला भेट देत वाचन चळवळीच्या बळकटीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. तसेच मनपाच्या ग्रंथालय शाखांच्या अनुदानवाढीसाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या प्रसंगी त्यांच्या हस्ते मुंबईतील सार्वजनिक ग्रंथालयांमधील उत्कृष्ट अबालवृद्ध सभासदांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. उपस्थित वाचकांशी संवाद साधताना […]

अधिक वाचा..