धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी हा लढा अद्याप संपलेला नसल्याचे स्पष्ट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचाराविरोधातील काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहणार असून, या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सपकाळ म्हणाले की, […]

अधिक वाचा..

नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा तरुणाईच्या संघर्षाचा विजय; सचिन सावंत

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे प्रभारी सचिन सावंत यांनी हा “लोकशाही, तरुणाई आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय” असल्याचे म्हटले. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांवरून जोरदार टीका केली. सावंत म्हणाले की, काँग्रेस नेते […]

अधिक वाचा..

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका नागपूर: पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, विद्यमान कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानेच ही परिस्थिती […]

अधिक वाचा..

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (E-KYC), आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रिस्टॅक (Agristack) नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS […]

अधिक वाचा..

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेतले जाणार नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसावर तात्काळ कारवाई करून त्याला सेवेतून बडतर्फ व अटक करण्याचीही त्यांनी मागणी केली. या पार्श्वभूमीवर सपकाळ, काँग्रेस […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या एकूण निधीपैकी राज्याला केवळ ३.०६ टक्के निधी मिळत असल्याची बाब शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्राच्या निदर्शनास आणून दिली. राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेत त्यांनी महाराष्ट्रासाठी ‘समग्र शिक्षा’च्या निधीत भरीव वाढ करण्याची मागणी केली. भुसे यांनी आकडेवारीसह […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विधानमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, “हे सरकार शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेले निष्ठूर सरकार आहे. लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्यांना लाठ्यांनी उत्तर देणे ही लोकशाहीची गळचेपी […]

अधिक वाचा..

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा, यासाठी वेतन संहिता (Code on Wages), 2019 अंतर्गत महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. या नियमांनुसार, महिन्याचा पगार पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देणे अपेक्षित असून, नोकरी सोडल्यानंतर Full & Final (F&F) सेटलमेंट दोन कामकाजाच्या दिवसांत पूर्ण करण्याची तरतूद आहे. पगारासंदर्भातील नियमांनुसार, […]

अधिक वाचा..

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘खिडकी’ या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित अभिवाचनाचा विशेष प्रयोग गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘खिडकी’ या पुस्तकामध्ये प्रदीप कबरे यांच्या जीवनप्रवासातील विविध अनुभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. या अनुभवांपैकी काही निवडक प्रसंगांचे प्रभावी कथन […]

अधिक वाचा..

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणीला तात्काळ मदतीचा हात दिला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी आपला ताफा थांबवून जखमी तरुणीची विचारपूस केली आणि तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..