राहुल गांधींचे आंदोलन बेजबाबदार; पंतप्रधान निवासस्थानी घातपाताचा कट होता का? एकनाथ शिंदेंचा सवाल

नीट पेपरफुटीनंतर केंद्राने कठोर पावले उचलली; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर राजकारण केल्याचा विरोधकांवर आरोप मुंबई: काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र टीका केली. आंदोलनास परवानगी नसलेल्या ठिकाणी लोकांना जमण्याचे आवाहन करून राहुल गांधींना नेमके काय साध्य करायचे होते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधानांच्या […]

अधिक वाचा..

एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू…; अजितदादांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेंची भावनिक आदरांजली

दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली”; फडणवीसांच्या वाढदिवशी शिंदेंच्या भावना अनावर मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक शब्दांत त्यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि अजितदादा पवार यांच्या आठवणींचे दुःख अशा संमिश्र भावनांनी आजचा दिवस भरून गेल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले. “आजचा दिवस एका डोळ्यात […]

अधिक वाचा..

देवेंद्र! बस नाम ही काफी है; मुख्यमंत्री फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘महाराष्ट्राच्या राजकारणातील बिग डी’ म्हणत फडणवीसांच्या नेतृत्व, बुद्धिमत्ता आणि विकासदृष्टीचे शिंदेंकडून भरभरून कौतुक मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरभरून शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले. “देवेंद्र! बस नाम ही काफी है,” असे म्हणत शिंदे यांनी फडणवीस यांना “बुद्धिमान, अभ्यासू, अष्टपैलू नेतृत्व, राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ आणि विकासाची आधुनिक दृष्टी असलेले लोकनेते” […]

अधिक वाचा..

शिक्षकांच्या सूचनांवरच घडणार शिक्षणातील बदल; ‘शिक्षण संवाद २०२६’मध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना व सूचनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण विभागातर्फे चर्नी रोड येथील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनमध्ये आयोजित ‘शिक्षण संवाद २०२६’ या विचारमंथन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण आयुक्त सच्छिंद्रप्रताप सिंह, जवाहर बालभवनच्या […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरोधात काँग्रेसचा भाजपावर मोर्चा; राहुल गांधींना दिलेल्या वागणुकीचा निषेध

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी; परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्याची मागणी मुंबई: नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, परीक्षांतील कथित अनियमितता आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस लाठीचार्जाच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी मुंबईत गांधी भवन ते भाजप कार्यालय असा मोर्चा काढला. मात्र, रिगल सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात […]

अधिक वाचा..

झुरळ विचारांची पुरळ नव्हे, विकासाचा मार्ग निवडूया

मुंबई: भारतभूमी ही केवळ भौगोलिक सीमा नसून हजारो वर्षांची संस्कृती, ज्ञान, परंपरा, संघर्ष आणि सामर्थ्याची ओळख आहे. या भूमीने अनेक संकटांवर मात करत प्रत्येक काळात नव्या आत्मविश्वासाने जगासमोर आपले स्थान निर्माण केले आहे. आज भारत एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा वेळी देशाला सर्वाधिक गरज आहे ती विकासाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या सकारात्मक विचारांची. आज माहितीच्या […]

अधिक वाचा..

जन्मदिवस जयंती म्हणून साजरा करावा लागतोय’ या भावनेने कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू

मुंबई: माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच आमदार […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, ड्रग पेरण्याची धमकी; सरकारवर विजय वडेट्टीवारांचा घणाघात

पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि शेतकरी कर्जमाफीवर सरकारला धारेवर धरले; लोकशाही दडपण्याचा आरोप नागपूर: आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत असून त्यांना ड्रग पेरण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी सरकार त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून आणि देशभर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे राजकीय अजेंडा असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, “अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या आडून भाजप-आरएसएसनेच २०१४ मध्ये आपला […]

अधिक वाचा..

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर शासन सकारात्मक मुंबई: राज्यातील ग्रामीण, आदिवासी, डोंगरी, दुष्काळग्रस्त आणि नक्षलग्रस्त भागांतील विनाअनुदानित महाविद्यालयांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी स्पष्ट केले. शासनाच्या अधिकारक्षेत्रातील सर्व विषयांवर आवश्यक ती कार्यवाही करून […]

अधिक वाचा..