महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली: जगप्रसिद्ध शिल्पकार महाराष्ट्रभूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर आज नोएडा येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आदरांजली वाहिली. जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘चे शिल्पकार राम वंजी […]

अधिक वाचा..

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी राज्याची पणन व्यवस्था अत्याधुनिक व सर्व सोयी-सुविधायुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील मुंबई: महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती […]

अधिक वाचा..

प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी

काँग्रेसच्या सुनिल केदार यांना एक न्याय व माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का मुंबई: प्रज्ञा सातव यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना नेमके कोणते प्रलोभन दिले हे माहित नाही मात्र भाजप कडून सातत्याने दुसऱ्या पक्षातील लोकांना फोडण्यासाठी पैशांचे व पदांचे प्रलोभन दिले जाते, हे लपून राहिलेले नाही. भाजपला सत्तेचा प्रचंड माज […]

अधिक वाचा..

काँग्रेस नेते सचिन पोटे शिवसेनेत दाखल

‘कल्याण डोंबिवली महापालिकेवर आता भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाम विश्वास कल्याण: राज्यात पूर्वी स्थगितीचे सरकार होते, त्यामुळे विकास रखडला होता. मात्र आता राज्यात प्रगतीचे सरकार काम करत असून सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. काँग्रेसचे नेते सचिन पोटे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट झाला असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय […]

अधिक वाचा..

राज्यातील २९ महानगरपालिकेतील समन्वयक, शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांची आढावा बैठक पार

राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री यांची बैठक आज अपेक्षित;महायुती म्हणून सामोरे जायचे यावर धोरण ठरवले जाण्याची शक्यता… मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकेंच्या निवडणूका जाहीर झाल्या असून दिनांक २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशावेळी त्या – त्या जिल्ह्यासाठी नेमलेले समन्वयक, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत आढावा बैठक घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे […]

अधिक वाचा..

धुळे जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या रूपाने कलाक्षेत्रातील भीष्माचार्य हरपला

मुंबई: धुळे जिल्ह्याचे सुपुत्र जगप्रसिद्ध शिल्पकार, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने देशाच्या कलाक्षेत्रात मोठी हानी झाली असून त्याच्या रूपाने कलाक्षेत्रातील भीष्माचार्य हरपला, अशा शब्दांत राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. राम सुतार […]

अधिक वाचा..

‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार यांच्या निधनाने ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड-

मुंबई: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या राम सुतार यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले. त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना […]

अधिक वाचा..

मोदींची कबर खोदण्याची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसची कबर जनता खोदेल

पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जोरदार प्रहार मुंबई: देशावर दहशतवादी हल्ले होत असताना, भारतीय लष्कर दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत असताना आणि संपूर्ण देश एकजुटीने उभा असताना काँग्रेसचे नेते मात्र पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कबर खोदण्याची भाषा करणाऱ्यांची कबर देशाची जनता खोदेल,” असा थेट, प्रहार […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींनो आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन करणार केवायसी

मुंबई: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता महिलांना केवायसीसाठी कार्यालयात किंवा ऑनलाईन अडचणींचा सामना करावा लागणार नाही. कारण अंगणवाडी सेविका स्वतः घरोघरी जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. केवायसीसाठी शेवटची तारीख लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी करण्यासाठी फक्त १३ दिवस शिल्लक. केवायसीची अंतिम तारीख […]

अधिक वाचा..

सातारा जिल्ह्यातील एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

मंत्री माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा फडणवीस सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही? मुंबई: सातारा जिल्ह्यातील सावळी गावात एमडी ड्रग्जचा मोठा कारखाना मुंबई क्राईम ब्रँचने उघड केला पण फडणवीस सरकार हे प्रकरण गांभिर्याने घेत नाही. एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना असल्याचे उघड झाले असताना अद्याप यामागील खऱ्या सुत्रधारावर कारवाई केलेली नाही. या सावळी गावाजवळच उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..