महाराष्ट्रातील 10 विधानसभेतील EVM तपासणीने आघाडीला धक्का; आयोगाने छातीठोकपणे दिला ‘रिझल्ट’

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीला धक्का देणारा ठरला होता. तर महायुतीला मिळालेला विजय अविश्वसनीय होता. एवढा मोठा विजय मिळेल, असे युतीतील नेत्यांनाही वाटले नसेल. पण या निकालानंतर राज्यासह देशभरात संशयाचे ढग जमा होण्यास सुरूवात झाली. लोकसभा ते विधानसभेदरम्यान वाढलेली मतदारसंख्या, सायंकाळनंतर वाढलेले मतदान आदी मुद्द्यांवर विरोधकांनी आक्षेप घेण्यास सुरूवात केली, आजही ते सुरूच […]

अधिक वाचा..

बोगस लाभार्थ्यांकडून होणार वसुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकारावरून राज्य सरकारची कोट्यवधी रुपयांची लूट झाली आहे. अशा लाभार्थ्यांकडून वसुलीचे फर्मान अन् योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीचे काम सुरू ठेवण्याचे फर्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ४ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा […]

अधिक वाचा..

पुढील 3 दिवसांत संकटांचा कहर! 4 देश होणार उदध्वस्त, बाबा वेंगांचा तो काय इशारा.

जपानमध्ये 5 जुलै रोजी त्सुनामीच्या लाटा येणार असा दावा करणाऱ्या वृत्तांनी खळबळ उडवली होती. त्यावेळी काहीच घडले नाही. पण आता रशियाच्या कामचटका द्वीपसमूहाजवळ 8.8 तीव्रतेचा महाभूकंपाने प्रशांत महासागरात खळबळ उडवली आहे. जपान, रशिया, अमेरिकेतील काही बेटांसह जगातील इतर समुद्रीय देशांना धोक्याचा इशारा अजूनही कायम आहे. जपानची बाबा वेंगा रिओ तात्सुकी हिची ती भविष्यवाणी खरी ठरणार […]

अधिक वाचा..

गोपीचंद पडळकरांच्या मोर्चानंतर यवत पेटलं, दोन गटात राडा

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाला असून दोन प्रचंड मोठे गट आमनेसामने आले आहेत. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यवतमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी दोन […]

अधिक वाचा..

आता कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ, दीर्घ लढ्याला मोठं यश

कोल्हापूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून येत्या 18 ऑगस्टपासून खंडपीठाचं काम सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून 1 ऑगस्ट रोजी याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनीही त्याची माहिती सर्वप्रथम माजी खासदार संभाजीराजेंना दिल्याचंही […]

अधिक वाचा..

वाल्मिक कराडने आतापर्यंत २५ खून केले, एका १४ वर्षांच्या मुलालाही संपवल

बीड: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा किती निर्दयी खुनी होता, हे आता पुढे येत आहे. एका माजी पोलिस अधिकाऱ्याने आणखी एक दावा केला असून वाल्मिकने आतापर्यंत २५ तरी खून केले असतील आणि त्यात एका १४ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे, असं ते म्हणाले आहेत. सेवेतून बडतर्फ केलेले पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपती निवडणुकीचे बिगुल वाजले; ‘या’ दिवशी मतदान

नवी दिल्ली: देशाच्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रतिष्ठेच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला असून, या घोषणेसोबतच राजधानी दिल्लीतील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. जगदीप धनखर यांनी आरोग्याच्या कारणावरून उपराष्ट्रपतीपदाचा 21 जुलै 2025 रोजी राजीनामा दिला. त्यांच्या अचानक राजीनाम्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले […]

अधिक वाचा..

अखेर मुंडे-कराड यांना नको असलेल्या डॅशिंग अधिकाऱ्याची बीडमध्ये एन्ट्री

बीड: बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे कुटुंबाची मागणी मान्य केली आहे. फडणवीसांच्या आदेशानंतर आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुरूवारी (ता.31) मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी […]

अधिक वाचा..

देशातील सर्व संस्था हाती घेऊ पहाणाऱ्या अदानी व अंबानींच्याच कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्याची गरज; हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीयकृत बँकांत परदेशी गुंतवणूक देशासाठी धोक्याची घंटा, बँकांचे दरवाजे सामान्य लोकांसाठी बंद होण्याच्या मार्गावर: विश्वास उटगी मुंबई: इंदिराजी गांधी यांनी १९६९ साली बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामागे एक महत्वाचे कारण होते. देशातील आर्थिक स्रोतांचा ताबा त्यावेळी मुठभर लोकांच्या हातात होता व ही शक्ती लोकशाहीवरही ताबा मिळवू पहात होती, यातून हा महत्वपूर्ण निर्णय झाला. आता […]

अधिक वाचा..

१ ऑगस्ट पासून एसटीच्या डिझेल खरेदीवर सवलत सुरू; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करीत असलेल्या मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी दिनांक ०१.०८.२०२५ पासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत (discount) देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १ ऑगस्ट पासून या कंपन्यांनी ₹3.00 प्रति किलो लिटर (बेंचमार्क दरापेक्षा) सवलतीचा दर देण्यास सुरु केले आहे. त्यामुळे महामंडळास […]

अधिक वाचा..