नागपूर मध्ये सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा, विदर्भातील ओबीसी समाज लाखोंच्या संख्येने नागपुरात एकवटणार

नागपूर: प्रत्येक समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे पण ओबीसीमधून आरक्षण द्यायला मात्र सकल ओबीसी संघटनांचा विरोध आहे. याच भूमिकेतून विदर्भातील सकल ओबीसी संघटनांनी १० ऑक्टोबर रोजी नागपूर इथे महामोर्चाचे आयोजन केले आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला. या […]

अधिक वाचा..

पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत तर त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांसाठी अपूर्ण राहिलेल्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते होत आहे,वडेट्टीवार यांची टीका नागपूर: देशाचे पंतप्रधान हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नवी मुंबई विमानतळ, मेट्रो प्रकल्प असे विविध प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन सोहळे पार पाडले जात आहेत. पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असताना शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची […]

अधिक वाचा..

एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; प्रताप सरनाईक

मुंबई: एस टी महामंडळ कामगारांच्या विविध मागण्या आहेत.त्या रास्त असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी कामगार संघटना सोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले. बैठकीस एस. टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव […]

अधिक वाचा..

मुंबई येथे बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ…

मुंबई: राज्यातील बालकलावंतांसह दिव्यांग बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ रविवारी दि.५ – १० – २०२५ )रोजी श्री सत्यनारायण महापुजेने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात झालेल्या या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. महापुजेनंतर अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्यासह मध्यवर्ती कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष राजू […]

अधिक वाचा..

३१ हजार कोटींचं पॅकेज नव्हे, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची थट्टा

पूरग्रस्त शेतकऱ्यांची अवहेलना करणारे सरकार; ॲड. अमोल मातेले यांचा सरकारवर तुफान हल्ला  मुंबई: राज्यातील पूरग्रस्त भागासाठी सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये “खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार रुपये” आणि “नरेगा योजनेतून हेक्टरी ३ लाख रुपये” देण्याची तरतूद सांगण्यात आली आहे. मात्र ही आकड्यांची खेळपट्टी असून, शेतकऱ्यांच्या […]

अधिक वाचा..

उद्धवस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत

शेतकरी कर्जमाफी कधी देणार, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल नागपूर: महायुती सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर मध्ये ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमध्ये गेल्या १५ दिवसात ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना आज फक्त सरकारने मदतीचे आकडे फुगवून सांगत ही तर सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका काँग्रेस विजय […]

अधिक वाचा..

प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी व्यवसाय करावा 

मुंबई: ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी साठी ॲग्रिगेटर धोरण नियमावली येत्या २ दिवसात जाहीर होत असुन त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना ” प्रवासी व चालकांना ” केंद्रस्थानी ठेवावे, भरमसाठ नफा कमविण्याच्या प्रयत्नात त्यांची आर्थिक लुबाडणूक करून […]

अधिक वाचा..

सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, महायुती सरकारने शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले

मुंबई: अतिवृष्टी व पुराने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेलाच आहे पण रब्बीचा हंगामही हाती लागणार नाही अशी अवस्था आहे. शेतीच्या नुकसानासोबत शेतकऱ्यांचे घर दार संसार उघड्यावर पडले आहेत परंतु भाजपा महायुती सरकारने मात्र नुकसानभरपाईच्या नावाने फसवणूक केली आहे. लाखोंचे नुकसान झाले असताना सरकारने जाहीर केलेली मदत ही […]

अधिक वाचा..

TET विरोधात शिक्षक संघटना आक्रमक

न्यायालयाचा आधार आणि शासनाचे सहकार्य घेऊन शिक्षकांना नक्कीच न्याय मिळवून देऊ; डॉ. विशाल कडणे सिंधुदुर्ग: सर्वोच्च न्यायालयाच्या सप्टेंबर २०२५ मधील निर्णयानुसार इयत्ता १ ते ८ साठी शिक्षक पात्रता परीक्षा(TET) अनिवार्य करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षक नेते आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षक […]

अधिक वाचा..

विरोधकांचे आरोप निराधार; शेतकरीहितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकाशी असलेले नाते हे पोटच्या लेकरासारखे असते. मात्र या आपत्तीमुळे जमीन खरडून गेली, पुन्हा पेरणी करण्याची स्थितीच उरली नाही आणि शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या उध्वस्त झाले. या गंभीर परिस्थितीची दखल घेत […]

अधिक वाचा..