त्या रेशन कार्ड धारकांचे रेशनवरील धान्य कायमचे बंद होणार 

कोणाला बसणार सरकारच्या नव्या निर्णयाचा फटका मुंबई: रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कारण की काही रेशन कार्ड धारकांचा रेशनवरील धान्याचा लाभ कायमचा बंद करण्यात आला आहे. यामुळे जर तुम्हीही शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या धान्याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी अधिक खास राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की जे […]

अधिक वाचा..

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या

पुणे: महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींनी जोर धरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनर्वसनाबाबत आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मोठी विधानं केली. तसेच, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाईचे निर्देश आणि छावाचे नेते विजय घाडगे यांच्याशी झालेल्या […]

अधिक वाचा..

दारू महागली म्हणून तरुण ब्रॅड बदलत लागले हातभट्टी दारूच्या नादी

सोलापूर जिल्ह्यात दिवस-रात्र हातभट्ट्या सुरू; बनावट दारूचीही निर्मिती  सोलापूर: गावात गेला की हातभट्टी कोठे मिळते, याची माहिती गावातील लोकच देतात. हातभट्टी पिऊन काहीजण गावाच्या वेशीत पडलेले नेहमीच दिसतात. तरुणांच्या भविष्यासाठी गावागावांतील महिलांनी पोलिसांना दारूबंदीसाठी निवेदने दिली, तरीपण गावांमध्ये खुलेआम हातभट्टी विक्री सुरू आहे. आता देशी-विदेशी दारू महागल्याने सोलापूर जिल्ह्यात रात्रंदिवस हातभट्टीची निर्मिती सुरू असून ती […]

अधिक वाचा..

शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्ग २६ ते ३१ जुलै पर्यंत बंद! ‘हे’ आहे पर्यायी मार्ग

संभाजीनगर: शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गावर लोखंडी संरक्षक पाट्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे संपूर्ण मार्ग बंद राहणार आहे. नागरिकांनी प्रवासाच्या आधी पर्यायी मार्गांचा वापर करावा. दररोज २ लाख नागरिकांना फटका या मार्गाचा दररोज सुमारे १.५ ते २ लाख नागरिक वापर करतात. मार्ग बंद असल्याने आता प्रवाशांना ५ किमीचा अधिकचा फेरा मारावा लागणार आहे. […]

अधिक वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्मानित

“हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे; डॉ. नीलम गोऱ्हे” जेजुरी: समाजासाठी आणि राज्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. होळकर संस्थान, इंदोरचे राजे भूषणसिंह होळकर महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी राजे भूषणसिंह होळकर महाराज म्हणाले, उपसभापती […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र हादरला! HIV बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भपातामुळे खळबळजनक घटना उघड

संभाजीनगर: धाराशिवमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. तसेच बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या मुलीचा केला गर्भपात देखील करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. औसा तालुक्यातील एका नामवंत एचआयव्ही बाधित संगोपन संस्था आहे. या संस्थेत एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. तसेच बलात्कारनंतर सदर […]

अधिक वाचा..

निवडणुकीतील कथित घोळाचे राहुल गांधींकडे ठोस पुरावे

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील कथित घोळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आक्रमकता कायम आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातही मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर फडणवीसांनीही विविध मतदारसंघाची आकडेवारी देत प्रत्युत्तर दिले होते. तसेच निवडणूक आयोगाकडूनही मतदारयाद्यांवर आक्षेप-हरकतींची माहिती दिली होती. पण त्यानंतर हे आरोप थांबलेले नाहीत. राहुल गांधी […]

अधिक वाचा..

डॉक्टरांची कमाल! 1 हजार किलोमीटर दूरच्या 2 रुग्णांवर केली रोबोटिक टेलीसर्जरी

मुंबई: भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अभूतपूर्व यश मिळवत, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि ख्यातनाम शल्यचिकित्सक डॉ. राज गजभीये यांनी देशात पहिल्यांदाच “टेलीसर्जरी” करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही शस्त्रक्रिया गुरुग्रामहून सुमारे १००० किलोमीटर दूर असलेल्या नागपूरमधील GMCH मध्ये त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. ही अद्वितीय शस्त्रक्रिया भारतात बनवलेल्या ‘SSI मंत्रा सर्जिकल रोबोटिक सिस्टीम’ […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा निर्णय! ३४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी गारपीटसाठी अनुदान मंजूर

मुंबई: राज्यात फेब्रुवारी ते मे २०२५ च्या दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचं नुकसान झालं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांचे अनुदानास वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने एकूण ३४ जिल्ह्यातील ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांना अनुदान […]

अधिक वाचा..

मला पोलीस अजून घेऊन का जात नाहीत

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील हतुर गावातून भयंकर घटना समोर आली आहे. वृद्ध पतीने वृद्ध पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. तू शेतात न येणारी आज कशी काय आलीस? असा जाब विचारत पत्नीबरोबर पतीने वाद घातला. दोघांच्या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. पतीने रागाच्या भरात डोक्यात फरशी घालून पत्नीची निर्घृण हत्या केली. पतीने पत्नीचा जीव गेला तरी फरशीचे […]

अधिक वाचा..