काल ऑफर अन् आज भेट! उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीस यांची अर्धा तास चर्चा

मुंबई: सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादंग होताना देखील दिसत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे.विधान परिषदेचे सभापती राम कदम यांच्या दालनामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. अर्धा तास झालेल्या या भेटीमुळे […]

अधिक वाचा..

भाजपला काँग्रेसच्या नेत्यांची गरज का?

पुणे: छप्पन इंचांची छाती असलेले राष्ट्रीय नेतृत्व आणि सुपरमॅन मुख्यमंत्री असल्याचा दावा भाजपचे नेते करतात. तरीदेखील धाक दाखवून काँग्रेसचे कार्यकर्ते-नेते यांना घेण्याची गरज पडते आहे. भाजप हा चेटकिणीचा पक्ष आहे,” अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी भाजपवर टीका केली. जाणारा माणूस ठरवून जातो. त्याला थांबविता येत नाही. अन्याय झाला म्हणून कोणी जात नाही, […]

अधिक वाचा..

भर सभागृहात शिंदेंना तोंडावर गद्दार म्हटले, आदित्य ठाकरेंच्या निलंबनाची मागणी

मुंबई: विधीमंडळात गुरुवारी दोन्ही शिवसेनांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसले. केंद्रस्थानी होते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे. एकनाथ शिंदे यांनी 293 च्या चर्चेला उत्तर दिले. यावरून आपल्याला बोलायचे असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले. मात्र विधानसभा अध्यक्षांनी तुम्हाला तसे करता येणार नाही असं म्हटल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. हा गदारोळ सुरू असतानाच आदित्य ठाकरे सदनात […]

अधिक वाचा..

अधिवेशनादरम्यान मोठा ‘धमाका’, IAS सह २० बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर

मुंबई: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारेही वाहू लागले आहेत. या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका कायम आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या मोठ्या IAS बदल्यांनंतर, राज्य सरकारने पुन्हा एकदा २० महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत, ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली […]

अधिक वाचा..

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार संजय जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश 

पुणे: काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बुधवार, १६ जुलै रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सासवड येथील पालखीतळ मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी संजय जगताप यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश […]

अधिक वाचा..

सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी

मुंबई: राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे धिंडवडे काढले. स्पर्धक कंपनीपेक्षा ३ हजारांहून अधिक कोटींची बोली बोलल्यानंतरही मेघा इंजिनिअरिंग कंपनीला ठाणे बोरिवली बोगद्याचे काम देणे, शालार्थ आयडी घोटाळ्यावर पांघरूण घालणे यावरून सरकारला खडे बोल सुनावतानाच शेतकरी आत्महत्यांसह अनेक […]

अधिक वाचा..

राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची अंतिम आठवडा प्रस्तावात सरकारवर टीका मुंबई: पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले की ते ठोसे देतात. जेवण चांगले मिळाले नाही म्हणून मारहाण केली असेच गळकी एसटी बघून परिवहन मंत्र्यांचे काय करायचं? निकृष्ट बांधकाम करणाऱ्या मंत्र्यांचे, […]

अधिक वाचा..

पत्रकारांच्या एस.टी. प्रवास सवलतीत सुधारणा होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आधीस्वीकृतीधारक पत्रकारांच्या एसटी […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांचा जन्मदिवस ‘जनविश्वास सप्ताह’ म्हणून साजरा करणार 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त दिनांक २२ ते ३० जुलै दरम्यान ‘जनविश्वास सप्ताह’ म्हणून राज्यभर साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या ‘जनविश्वास सप्ताहा’ मध्ये तालुका,जिल्हा, गाव पातळीवर रक्तदान शिबिरे, ज्येष्ठ नागरिक व महिलांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे, […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उद्यापासून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर

‘निर्धार नवपर्वाचा’, ‘पदाधिकाऱ्यांशी संवाद’ ;चार दिवसात आठ जिल्हे पिंजून काढणार… मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे उद्यापासून (१८ जुलै) चार दिवसाच्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून ‘निर्धार नवपर्वाचा’ पदाधिकारी संवाद मेळाव्याचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे. आज पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी या दौऱ्याची माहिती दिली. दिनांक १८ […]

अधिक वाचा..