राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उद्यापासून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर

‘निर्धार नवपर्वाचा’, ‘पदाधिकाऱ्यांशी संवाद’ ;चार दिवसात आठ जिल्हे पिंजून काढणार… मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे उद्यापासून (१८ जुलै) चार दिवसाच्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून ‘निर्धार नवपर्वाचा’ पदाधिकारी संवाद मेळाव्याचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे. आज पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी या दौऱ्याची माहिती दिली. दिनांक १८ […]

अधिक वाचा..

फडणवीस सरकारचे जनतेला मोठे गिफ्ट, 100 युनिटच्या आतील ग्राहकांना काय दिलासा

मुंबई: एकीकडे महावितरणने वीज दर बिलात वाढ केल्याची ओरड होत असतानाच राज्य सरकारने पावसाळी अधिवेशात मोठी घोषणा केली. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. वीज दर कपातीचा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. महायुती सरकारने जनतेला मोठे गिफ्ट दिले. 100 युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होईल. पुढील कित्येक वर्षे आता वीज दरात […]

अधिक वाचा..

दिंडोरी रस्त्यावर भीषण अपघात, अल्टो कारमधील 7 जणांचा जागीच मृत्य

नाशिक: नाशिकच्या दिंडोरीत कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात तीन महिला, तीन पुरुष आणि एका बालकाचा मृत्यू झाला आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करुन कुटुंबीय आपल्या घरी निघाले होती. त्यावेळी धक्कादायक प्रकार घडला. नाशिकच्या दिंडोरी-वणी रोडवर मध्यरात्री अल्टो कार आणि मोटर सायकलचा भीषण अपघात झाला आहे. […]

अधिक वाचा..

शाळा अन् महाविद्यालयांना दणका! मनमानी शुल्कवाढीला लागणार ब्रेक

मुंबई: राज्यात शिक्षण घेणं दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. शाळा आणि महाविद्यालयांकडून मनमानी पद्धतीने फी आकारली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या गोष्टी बंद करून कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नावाखाली सामायिक शिकवणीतून विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारांवर कायदेशीर कारवाई होण्याची चिन्हे […]

अधिक वाचा..

खाजगी कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत इंटिग्रेटेड कोर्सेसवर बंदी येणार

मुंबई: मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी थेट संबंधित असलेल्या अनधिकृत इंटिग्रेटेड कोर्सेस विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षने घेतलेली भूमिका आता यशस्वी ठरताना दिसत आहे. मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी गुरुवार, (दि. 3) जुलै 2025 रोजी शालेय शिक्षण मंत्री मा. दादा भुसे यांची मंत्रालयात भेट घेऊन विस्तृत निवेदन सादर केले होते. यामध्ये त्यांनी खाजगी कोचिंग […]

अधिक वाचा..

संभाजीनगर मधील कोणते रस्ते होणार रुंद, तुमचं घर/दुकान अतिक्रमणात येतंय का

संभाजीनगर: छ. संभाजीनगर महानगरपालिकेने शहरात मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे निश्चित केले आहेत. या रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई निश्चित आहे! तुम्ही सुद्धा जाणून घेऊ शकता की शहरात कोणते रस्ते किती रुंद होणार आहेत कोणत्या मालमत्ता अतिक्रमणात येणार आहेत त्यासाठी सर्वप्रथम ही लिंक उघडा https://drive.google.com/drive/folders/1KN8OJQ1HGUm9JVFNxyvrsY2Fm6x50PJT या लिंकमध्ये काय आहे शहराचे 8 वेगवेगळे सेक्टरवाइज नकाशे प्रत्येक […]

अधिक वाचा..

माय-लेकाची घरात घुसून हत्या

पंढरपुर: पंढरपुरातून एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पंढरपूरच्या कुंभार गल्लीत मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आई आणि मुलाची निर्घृण हत्या राहत्या घरात करण्यात आली आहे. एकाच वेळी झालेल्या डबल हत्येने खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरपूरच्या कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार […]

अधिक वाचा..

ठाकरे गटाचं हत्यार सभागृहाबाहेर; राजकीय गणितं बदलणार का

मुंबई: ठाकरे गटाचे आक्रमक नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून विधान परिषदेत त्यांच्या निरोप समारंभाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. २०१९ मध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेले दानवे, २०२२ मध्ये शिंदे बंडानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाले. त्या काळात त्यांनी ठाकरे गटाचे जहाल वकिलीत्व केले. […]

अधिक वाचा..

महादेव मुंडेंची फक्त १२ गुंठ्यासाठी हत्या

मुंबई: फक्त १२ गुंठ्यासाठी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर महादेव मुंडे यांचे चमडे, हाड आणि रक्त काढून वाल्मिक कराडच्या आणलं होते, असं बाळा बांगर नावाच्या व्यक्तीनं सांगितलं आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येत गोट्या गित्ते, राजू फड आणि वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा आहे, असेही बाळा बांगरने सांगितलं आहे, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटलं […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील ‘या’ गावात धावली बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

गडचिरोली: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील मारकनार गावात सरकारी बस सेवा सुरू झाली, जे एकेकाळी नक्षलवादी हिंसाचाराचे केंद्र म्हणून ओळखळे जात होते. गावात पहिल्यांदा बस पोहोचल्यानंतर गावलकऱ्यांनी राष्ट्रध्वज फडकावून आनंद साजरा केला.या सेवेचा फायदा आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांसह सुमारे १२०० हून अधिक रहिवाशांना होईल.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दुर्गम मारकनार गावातून अहेरीपर्यंत बस सेवा सुरू झाली, याचे श्रेय गडचिरोली पोलिसांना […]

अधिक वाचा..