शिंदे मुख्यमंत्री होणार? चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पूर्णविराम; म्हणाले…

मुंबई: राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्रीपदाबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असतानाच मुख्यमंत्री यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करून यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्तासमीकरणांबाबत चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले, “ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागांची आवश्यकता असते आणि […]

अधिक वाचा..

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित चित्रपट; रुपाली चाकणकरांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या यांच्या भूमिकेत अभिनेत्री दिसणार आहेत. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना […]

अधिक वाचा..

अहिल्यानगरात भरदिवसा गँगवॉर; तरुणावर कोयता-रॉडने जीवघेणा हल्ला, गोळीबाराचीही चर्चा

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा झालेल्या गँगवॉरमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रे आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. स्थानिकांकडून गोळीबार झाल्याचाही दावा करण्यात येत असून, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णवाद नगर परिसरातील चौकात शुभम यादव (वय १९) हा जात असताना दोन ते तीन […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील राजकारण तापले; आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा, नव्या पक्षफुटीच्या चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेगआला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून हे शेवटचे पावसाळी अधिवेशन असेल, असा खळबळजनक दावा शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात जातील, असा […]

अधिक वाचा..

आषाढी वारीतील 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान

मुंबई: मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या दहा पालख्यांसोबत सहभागी होणाऱ्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी एकूण 2 कोटी 80 लाख रुपये निधी वितरित करण्याचा शासन आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केला आहे. हा आदेश कक्ष अधिकारी नागेश बामणे यांनी काढला आहे. महाराष्ट्रातील […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्यांची मुदत

मुंबई: राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत राज्य शासनाने जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेदरम्यान सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) तसेच इतर मागास प्रवर्ग (OBC) […]

अधिक वाचा..

पॉलीटेक्निक प्रवेशासाठी अर्जाची मुदत ६ जुलैपर्यंत वाढली.

मुंबई: राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ६ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत २ जुलै होती. मात्र विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची सातत्याने होत असलेली मागणी आणि प्रवेश […]

अधिक वाचा..

महापुरुषांच्या साहित्याच्या पुनर्मुद्रणाला गती; संशोधनाधिष्ठित साहित्यनिर्मितीवर भर; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याचे सखोल संशोधन होणे गरजेचे असून, चरित्र-साधने प्रकाशन समित्यांनी समाजोपयोगी व संशोधनाधिष्ठित साहित्यनिर्मितीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महात्मा जोतिराव फुले चरित्र-साधने प्रकाशन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उच्च […]

अधिक वाचा..

हरित इंधन की महागडा प्रयोग? नागरिकांच्या खिशाची जबाबदारी कोणाची?

मुंबई: देशाला हरित ऊर्जा हवी, पर्यावरणाचे संरक्षण झाले पाहिजे आणि परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी झाले पाहिजे, याबद्दल दुमत नाही. मात्र, खरा प्रश्न असा आहे की हा विकास जनतेच्या हिताचा आहे की जनतेच्या खिशावरचा? अनेक वाहनचालकांचा दावा आहे की इथेनॉल-मिश्रित पेट्रोल वापरल्यानंतर फ्यूल पंप, इंजेक्टर, रबर सील आणि इंधन यंत्रणेतील काही भाग अपेक्षेपेक्षा लवकर खराब होत […]

अधिक वाचा..

डॉ. श्रीकांत शिंदे! विकासाभिमुख नेतृत्वाची ओळख अधिक दृढ

मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पायाभूत सुविधा, आरोग्य, वाहतूक आणि नागरी विकासाच्या विविध प्रकल्पांचा सातत्याने पाठपुरावा करत विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातून सार्वजनिक जीवनात प्रवेश केलेल्या डॉ. शिंदे यांनी लोकसेवा हेच ध्येय ठेवून राजकारणात सक्रिय भूमिका स्वीकारली. कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या नागरी गरजा लक्षात […]

अधिक वाचा..