जनगणनेत ओबीसींसाठी वेगळा रकाना द्या; विजय वडेट्टीवार

मुंबई: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी वेगळा रकाना नसल्याने ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्याची मागणी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केली. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाजाची लोकसंख्या सुमारे ५० टक्के असताना महाज्योतीसारख्या संस्थांना […]

अधिक वाचा..

एलपीजी दरवाढ तात्काळ रद्द करा; गॅस धोरणावर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन करावे; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: एलपीजी गॅसच्या दरात ६० रुपयांची वाढ करून केंद्रातील भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटले आहे. युद्धाचे कारण पुढे करून जनतेची लूट करण्याऐवजी ही दरवाढ तात्काळ रद्द करावी, तसेच एलपीजी गॅस संदर्भातील स्पष्ट धोरण पंतप्रधानांनी संसदेत जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. गॅस दरवाढ व गॅस […]

अधिक वाचा..

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील अडचणी दूर करणार; चंद्रकांत पाटील 

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. सदस्य Yogesh Sagar यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत Atul Bhatkhalkar यांनीही सहभाग घेतला. मंत्री […]

अधिक वाचा..

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क कमी; शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभ; मंत्री चंद्रकांत पाटील.

मुंबई: राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून शिक्षण शुल्काचा भार कमी करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुलींना १०० टक्के तर मुलांना ५० टक्के शिक्षण शुल्क माफी दिली जात आहे. या निर्णयाचे पालन न करता विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र […]

अधिक वाचा..

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी सदिच्छा भेट

मुंबई: जिष्णू देव वर्मा यांची काल मुंबई येथील ‘लोकभावन’ येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) ची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी, राज्यातील विद्यापीठांचे […]

अधिक वाचा..

मुंबईसह महाराष्ट्र वाचवा! प्रदूषणाने मुंबईकर गुदमरले; युद्धामुळेही पर्यावरणावर भीषण संकट

मुंबई: मुंबईतील हवेच्या प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असून या गंभीर परिस्थितीवर आता बॉलिवूडमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. गुरुवारी (१२ मार्च) शहराच्या अनेक भागांत धुक्याचा जाड थर दिसून आला. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री Deepika Padukone हिने सोशल मीडियावरून प्रशासनाला जाब विचारत संताप व्यक्त केला आहे. मुंबईत स्मॉगच्या थरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून दृश्यमानता कमी झाल्याने […]

अधिक वाचा..

सुरक्षित शहरांसाठी ‘जेंडर सेन्सिटिव्ह’ नियोजन आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरांचे नियोजन करताना ‘जेंडर सेन्सिटिव्ह’ दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत Neelam Gorhe यांनी व्यक्त केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक गुंतवणूक या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. मुंबईची परंपरा कष्टकरी महिलांची असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, पूर्वी रात्रीच्या वेळी रस्त्यांवर पुरुषांचे वर्चस्व दिसत असे; मात्र आज […]

अधिक वाचा..

ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही आता परमिट बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई: राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली असली तरी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईकसाठी आता मोटार वाहन विभागाकडे रीतसर नोंदणी करून परमिट (परवाना) घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही माहिती परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, आतापर्यंत इलेक्ट्रिक […]

अधिक वाचा..

संविधान बदलण्याचा भाजपा-RSS चा डाव हाणून पाडा; हर्षवर्धन सपकाळ

त्रंबकेश्वर: देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार देणाऱ्या संविधानावर आधारित देश उभारण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. मात्र या विचारधारेच्या विरोधात लोकांना लाचार बनवणारी, शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा विचार भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. संविधानविरोधी मनुवादी विचारसरणीवर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा डाव उधळून […]

अधिक वाचा..

आमटे दांपत्याचा सन्मान केल्यामुळे ‘महाराष्ट्र भूषणचे’ भूषण वाढले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम हेमलकसा परिसरात आयुष्य वाहून आदिवासी समाजाची सेवा करणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या कार्यामुळे हेमलकसा हे सामाजिक कार्याचे तीर्थक्षेत्र बनले आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मटा सन्मान २०२६ सोहळ्यात या दांपत्याला ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले असून हा सन्मान देण्याचे भाग्य मला लाभले, ही माझ्यासाठी […]

अधिक वाचा..