परिणय फुके यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रतिउत्तर

मुंबई: भाजपचे आमदार परिणय फुके यांनी राज ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे “चोराच्या उलट्या बोंबा” असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. ज्यांच्या पक्षावर सातत्याने पक्षफोडीचे आरोप झाले, त्यांनी इतरांना फोडाफोडीचे धडे देणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या बुद्धिमत्तेचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले. ॲड. मातेले म्हणाले की, राज ठाकरे […]

अधिक वाचा..

राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करा; आयुष्मान योजनेचा विस्तार करा; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि खासगी रुग्णालयांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची मागणी विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत अर्धा तास चर्चेदरम्यान केली. तांबे यांनी सांगितले की, शासकीय रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता, औषधांचा […]

अधिक वाचा..

शेतकरी आत्महत्यांवरील चर्चा नाकारल्याने विरोधकांचा विधानसभेत सभात्याग.

मुंबई: राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांचा अत्यंत गंभीर मुद्दा आज विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला. मात्र, या विषयावर चर्चा घेण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने काँग्रेससह विरोधी पक्षांच्या आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला. विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच लातूरमध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत, राज्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, वाढते आर्थिक […]

अधिक वाचा..

राम कदमांचा नैतिकतेचा आव; ‘दुसऱ्याला सांगे ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’; अमोल मातेले

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर हक्कभंगाची भाषा करून नैतिकतेचा आव आणला असून, “दुसऱ्याला सांगे ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण” ही म्हण त्यांच्यावर तंतोतंत लागू पडते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी केली आहे. मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे […]

अधिक वाचा..

जालिंदर कामठे यांच्या निधनाने राष्ट्रवादीचा निष्ठावान सहकारी हरपला; सुनेत्रा पवार

पुणे: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान, विश्वासू आणि समर्पित सहकारी हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शोकसंदेशात सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे की, जालिंदर कामठे यांनी सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, कार्यनिष्ठा आणि जनसेवेची मूल्ये जपत […]

अधिक वाचा..

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यावर महायुती सरकार ठाम; एकनाथ शिंदे

माळशिरस येथे जाहीर पक्षप्रवेश; विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश मुंबई: महायुती सरकारच्या विकासाभिमुख आणि लोकहिताच्या कामांवर विश्वास व्यक्त करत अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांच्या न्याय मागण्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून उर्वरित प्रश्नांवरही लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन अहिरांच्या हाती विधान परिषदेच्या उपसभापती पदाची धुरा

‘पक्षापेक्षा नियम मोठे, भावनेपेक्षा परंपरा मोठी’; उपसभापती म्हणून सर्वांना समान न्याय देण्याचा विश्वास मुंबई: राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत त्यांचे अभिनंदन करत त्यांना “राजकारणातील मास्टर ब्लास्टर” अशी उपमा दिली. नियम, संयम आणि न्यायाच्या बळावर सचिन अहिर उपसभापतीपदाला नवी उंची देतील, […]

अधिक वाचा..

धार्मिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप अयोग्य; हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करा; अस्लम शेख

मुंबई: नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करावी आणि धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनात सरकारने अनावश्यक हस्तक्षेप करू नये, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. आमदार शेख म्हणाले की, कोणत्याही धार्मिक स्थळाचे संचालन आणि व्यवस्थापन त्या धर्माच्या अनुयायांकडेच असावे. संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या तत्त्वांनुसार हीच […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत एल्गार थांबणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ 

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आयोजित ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारने फसवी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, सातबारा कोरा होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

संगमनेर अॅसिड हल्ला प्रकरणात आरोपीला तातडीने अटक करून पीडितेला न्याय द्या; आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: संगमनेर येथे १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात ९० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपीचा शोध लागलेला नसल्याने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तांबे यांनी निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर […]

अधिक वाचा..