पत्नीशी संबंधाच्या संशयातून वेटरची हत्या; पती अटकेत

ठाणे: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका वेटरची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिळ-डायघर पोलिसांनी संशयित पतीला अटक केली असून अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा उलगडा केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिळ-डायघर परिसरातील पिंपरी गाव येथील भातशेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. […]

अधिक वाचा..

सोशल मीडियावर ओळख, लॉजमध्ये बोलावून लूट; फॅशन डिझायनरचा हनीट्रॅप रॅकेट उघड

बेळगाव: सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री करून श्रीमंत व्यक्तींना जाळ्यात ओढत लुटणाऱ्या हनीट्रॅप प्रकरणाचा बेळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात फॅशन डिझायनर असलेल्या दीपा अवतगी (वय ३३, रा. महालिंगपूर, जि. बागलकोट) हिला अटक करण्यात आली असून तिचा साथीदार शिवानंद मठपती (रा. हुक्केरी, जि. बेळगाव) हा सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवानंद मठपती […]

अधिक वाचा..

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान; बदललेली जिल्ह्यांची व बेटांची नावे

औरंगाबाद: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान (GK) हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. MPSC, पोलीस भरती, तलाठी तसेच इतर सरकारी परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे काही महत्त्वाचे बदल आणि माहिती जाणून घेणे आवश्यक असते. अलीकडच्या काळात देशात आणि राज्यात काही जिल्ह्यांची तसेच ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. ही माहिती स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. […]

अधिक वाचा..

औरंगाबादात ‘हायड्रो गांजा’चे जाळे उघड; दोन तरुण अटकेत

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात विदेशी ‘हायड्रो गांजा’ची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गुन्हे शाखेने दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने एन-४ परिसरातील राजवीर चरणसिंग बिरग (२०) आणि ओम रवींद्र शिंदे (२३) यांना मंगळवारी रात्री छावणीतील लोखंडी पुलावर सापळा रचून रंगेहाथ पकडले. राजवीरच्या बॅगेत […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा समावेश करणार; मंत्री दादा भुसे मुंबई: महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत विधान परिषदेत लक्षवेधी क्र. ३ अंतर्गत चर्चा करण्यात आली. या विषयावर सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेदरम्यान पिठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

अधिक वाचा..

पंचायत समित्यांत भाजपला मित्रपक्षांकडूनच धक्का; जुन्नर-मिरज-हवेलीत वेगवेगळी समीकरणे

महायुतीत अंतर्गत तणाव उघड; स्थानिक राजकारणामुळे भाजप सत्तेबाहेर मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीने अनेक ठिकाणी सत्ता स्थापन केली असली तरी काही पंचायत समित्यांमध्ये मित्रपक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने भाजपला धक्के बसले आहेत. गेल्या २४ तासांत तीन पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत महायुतीतीलच पक्षांनी वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र […]

अधिक वाचा..

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारतात गॅस तुटवडा? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

इराण: हॉरमुझ स्ट्राईट परिसरात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना भारतातील इंधन स्थितीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. इराण कडून होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केल्याने अनेक कच्च्या तेलाची जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत असल्याची चर्चा […]

अधिक वाचा..

शिवसेना नाव-धनुष्यबाण वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; पुढील तारीख अद्याप निश्चित नाही

मुंबई शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ यावरून सुरू असलेल्या वादावर Supreme Court of India मध्ये गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली. मात्र या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नसून पुढील सुनावणीची तारीख नंतर निश्चित करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात Uddhav Thackeray गट आणि Eknath Shinde गट यांच्यातील वादावर दोन्ही बाजूंनी अंतिम युक्तिवाद […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात, सरकार फक्त लाडक्या कंत्राटदारांचे हित जपण्यात व्यस्त

मुंबई: महायुती सरकारने अर्थसंकल्प मध्ये जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक असून, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी शेती, सिंचन आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारवर कडक ताशेरे ओढले. शेतकरी प्रश्नांवर बोलताना वडेट्टीवार यांनी कर्जमाफीच्या निकषांवर […]

अधिक वाचा..

२०१४ पासून ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखवणारा व्यक्ती १२ वर्षापासून सत्तेवर, केंद्र सरकारचा हुकूमशाही कारभार

मुंबई: काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या कार्यशाळेतून वर्षभरातील पक्ष संघटनेचे कामाकाजाची रुपरेषा ठवरून त्यामार्गाने मार्गक्रमण करण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारविरोधात लढणे, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच काँग्रेसचा विचार अधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी या कार्यशाळेत मंथन केले जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश […]

अधिक वाचा..