मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही, सत्ताधाऱ्यांचे मराठवाड्यावर अन्यायकारक धोरण

मुंबई: राज्याच्या २०२५ – २६ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी काहीच तरतूद करण्यात आली नाही. सत्ताधाऱ्यांचे मराठवाड्यावर हे अन्यायकारक धोरण असल्याची टीका राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. विरोधी पक्षनेत्याच्या २६० अन्वये प्रस्तावावर ते आपली भूमिका मांडत होते. सत्ताधारी पक्षाने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेची घोषणा फक्त कागदावरच ठेवली असून तिच्या पूर्ततेसाठी […]

अधिक वाचा..

कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष पदी मनोज जालनावाला यांची नियुक्ती

नवी मुंबई: राज्य अधिस्वीकृती समितीच्या दि.०९ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार मनोज जालनावाला यांची निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील विशेष समिती कक्षात ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांच्या अध्यक्षतेखाली माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कोकण विभागाच्या वतीने या बैठकीचे आयोजन […]

अधिक वाचा..

महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर दाखवायचं आणि तोंडाला पाने पुसायची

मुंबई: महायुती सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा स्वप्न विकणारा, पण जमिनीवर कोणताही आधार नसलेला आहे. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देऊन जनतेला फसवणाऱ्या सरकारने आता अर्थसंकल्पाच्या नावाने लोकांची दिशाभूल केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे “नुसताच तोंडाचा पट्टा आणि काम शून्य” आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी थाप. कर्जमाफीचा फसवा ढोल निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ म्हणणारे आता गप्प का?”हातातोंडाशी आलेला […]

अधिक वाचा..

पंतप्रधान यांचा विकसित भारताचा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी राज्याचा अर्थसंकल्प मैलाचा दगड ठरेल

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये विकसित भारताचा संकल्प सोडला आहे. हा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प मैलाचा दगड ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज मांडलेला ऐतिहासिक असा अकरावा अर्थसंकल्प म्हणजे, शाश्वत विकासाचा शिस्तबद्ध संकल्प आहे. अशा शब्दात सुनिल […]

अधिक वाचा..

महायुतीने जनतेला फसवल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले; नाना पटोले

सरकारने शेतकरी, लाडक्या बहिणी, बेरोजगारांना फसवले मुंबई: महायुती सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी कोणताही दिलासा नाही. महायुतीने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे महायुतीने जनतेला फसवल्याचे स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. अर्थसंकल्पावर बोलताना पटोले म्हणाले की, महायुतीने राज्याची अधोगती केल्याचे आर्थिक […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही…

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ […]

अधिक वाचा..

सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: केंद्र सरकारने जसा मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी आणि महिलांना मदतीची संजीवनी दिली, तसाच दिलासा राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातही वृद्धिंगत करण्यात आला आहे. महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण, पर्यटन धोरण, नवे आयटी धोरण, लॉजिस्टिक्स धोरण, आरोग्य पर्यटन धोरण, २०२५ हे सहकार वर्ष म्हणून घोषित करणे आणि अभिजात मराठी भाषा मोहीम दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला […]

अधिक वाचा..

समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल, प्रगतीचा ध्यास विकासाचा अर्थसंकल्प

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी विद्यार्थी हित आणि शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे.समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल, प्रगतीचा,विकासाचा ध्यास आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठीचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागास 3 हजार 98 […]

अधिक वाचा..

ठाकरेंनी ‘तो’ फोन घेतला असता तर दोन पक्ष फुटले नसते, पण आता…

मुंबई: मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील दुरावा वाढत असतानाच, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय अंतर कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. फडणवीसांचे सूचक विधान एका मुलाखतीत फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा युती होण्याची शक्यता आहे का? […]

अधिक वाचा..

औरंगजेबाचा कारभार आणि फडणवीसांचा कारभार सारखाच, राजीनामा फडणविसांनीच दिला पाहिजे

मुंबई: औरंगजेबाने वडिलाला कैद करून, भावाचा खून करून राज्य मिळवले. देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाला आणि कायदा सुव्यवस्थेला कैद करून ठेवले आहे. औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार सारखाच आहे. असा ह्ल्लाबोल करत संतोष देशमुख भाजपाचा कार्यकर्ता होता, त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली पण भाजपाचे प्रांताध्यक्ष देशमुख यांच्या घरी गेले नाहीत. पण विरोधी पक्षाचा प्रांताध्यक्ष […]

अधिक वाचा..