राज्यातील 24 जिल्ह्यात आतापर्यंत 2216 कोटी अग्रीम पीकविमा मंजूर; धनंजय मुंडे

नागपूर: राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना सुमारे 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25% प्रमाणे मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी आज सकाळ पर्यंत 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून सुमारव 634 कोटी […]

अधिक वाचा..

बळीराजाला कर्जमुक्त करा, वीज बील माफ करा; विजय वडेट्टीवार

नागपूर: दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका, बोगस बियाणे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजा मोठ्या संकटाचा सामना करत आहे. या संकटातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी सरकारने बळीराजाला कर्जमुक्त करावे, चाळीस दुष्काळी तालुक्यांप्रमाणे 1 हजार 21 महसूली मंडळांना लाभ द्यावेत, पिकाच्या वर्गवारीनुसार मदत करावी, बिनव्याजी पिक कर्ज द्यावे, वीज […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील बोलींना प्राधान्य देणारी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा जाहीर

५ ते ७ जानेवारीला प्राथमिक फेरी मुंबई: मराठी नाट्यवर्तुळातल्या महत्वाच्या आणि विशेष एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या सुप्रिया प्रॉडक्शन्स आणि व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धे’च्या प्राथमिक फेरीचा बिगुल वाजला असून ५ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत या स्पर्धेची प्राथमिक फेरी तर अंतिम फेरी १२ जानेवारीला दादरमध्ये होणार आहे. प्रसिध्द नाटककार गंगाराम गवाणकर […]

अधिक वाचा..

गॅस सिलिंडरमुळे दुर्घटना झाल्यास मिळते लाखो रुपयांची भरपाई

भारतात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, काही दुर्दैवी परिस्थितींमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरमुळे दुर्घटना घडू शकतात. अशा परिस्थितीत होणारे नुकसान भरून काढण्यासाठी तेल विपणन कंपन्या (OMCs) विमा कव्हर प्रदान करतात. कोणाला मिळते विमा कव्हर? तेल विपणन कंपन्यांसोबत रजिस्टर्ड असलेल्या सर्वच एलपीजी ग्राहकांना विमा कव्हरचा लाभ मिळतो. यामध्ये कोणताही भेदभाव केला जात […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा सोमवारी ११ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा…

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार नागपूर: राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार […]

अधिक वाचा..

हे शासन केवळ घोषणा करणारे नसून थेट काम करणारे शासन; पालकमंत्री शंभूराज देसाई

ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन हे सर्वसामान्यांकरिता काम करणारे शासन आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. प्रत्येक गरजू लाभार्थ्याचा शोध घेतला जात आहे. त्याला योजना समजावून सांगितली जात आहे आणि त्याचा प्रत्यक्ष लाभही दिला जात आहे. यामुळे लाभार्थ्यांना […]

अधिक वाचा..

शिक्षणनगरी ब्रम्हपूरीत आजपासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

मुंबई: ब्रम्हपूरी शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार […]

अधिक वाचा..

जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवन व शासकीय कार्यालयात इमारतीत पत्रकार कक्ष सुरू करावा

महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र आरामकक्ष व स्वच्छतागृह असावे मुंबई: जिल्ह्यात व तालुक्याचे ठिकाणी कामासाठी येणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना विश्रांतीसाठी शासकीय कार्यालय इमारतीत पत्रकार कक्ष सुरू करावेत व जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवन उभारावे अशी मागणी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या सूचनेनुसार मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई)कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील स्थगन प्रस्ताव नाकारणारे सरकार शेतकरी विरोधी; नाना पटोले

नागपूर: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची मदत अजून मिळालेली नाही आणि आता पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाने स्थगन प्रस्ताव दिला होता पण भाजपा सरकारने चर्चेपासून पळ काढला. केवळ भरपूर मदत दिली आहे असे म्हणून चर्चा टाळणे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा […]

अधिक वाचा..

मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणास वेग द्यावा; चंद्रकांत पाटील

द्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाबाबत आढावा बैठक संपन्न नागपूर: अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे उभारण्यात येणार्‍या मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी येथे काल (दि. 7) रोजी दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक शासकीय कला व समाज […]

अधिक वाचा..