माजी मंत्री नवाबभाई मलिक यांना जामीन; राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री नवाबभाई मलिक यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मत सरकार; नाना पटोले 

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ३६ जिल्ह्याला १९ पालकमंत्री नियुक्त केले असून १७ जिल्ह्याला अजून पालकमंत्रीच नाहीत. १५ ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार यावरून सरकार संभ्रमात आहे. पालकमंत्री नसताना जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल असे सरकारने जाहीर केले होते पण […]

अधिक वाचा..

हर घर तिरंगा; यंदाही स्वातंत्र्यदिनी घरावर फडकवता येणार तिरंगा…

‘या’ नियमांचे पालन करावे लागणार संभाजीनगर: मागील वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता यंदाही स्वातंत्र्य दिनी हे अभियान राबविण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व सरपंच, ग्रामसेवकांना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्य सरकारने १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांनी […]

अधिक वाचा..

लग्न अवघ्या 11 दिवसांवर असताना तरुणाची गोळी झाडून हत्या…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरतल्या बायजीपुऱ्यामध्ये लग्न अवघ्या ११ दिवसांवर असलेल्या तरुणाचा पैशांच्या किरकोळ वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अल कुतूब हसीब हमद या ३० वर्षीय तरुणाचा खून झालेल्या तरुणाचे नाव तर हल्लेखोराचे नाव फयाज पटेल असल्याचं समजते. बुधवार (दि. 9) रोजी सायंकाळी ७: ३०च्या सुमारास न्यू बायजीपुऱ्यातील इंदिरानगरमध्ये त्याच्यावर गोळीबार […]

अधिक वाचा..

लोकसभा निहाय दौरा आणि मंत्र्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार भरवणार; सुनिल तटकरे

मुंबई: लोकसभा निहाय राज्याचा दौरा आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे व नऊ मंत्र्यांचा जनता दरबार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्‍यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल […]

अधिक वाचा..

निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत सरन्यायाधीशांऐवजी कॅबिनेट मंत्री?

दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. यासंदर्भात दाखल याचिकेवर मार्च महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले होते. या निकालात न्यायालयाने पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा या समितीत समावेश असेल, असेही जाहीर केले होते. आता केंद्रीय निवडणूक आयुक्त ठरवण्यासाठी समितीची रचना जाहीर झाली […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! कांद्याचे दर दुप्पट होण्याची शक्यता…

शिरूर: बाजारत टोमॅटोचे दर हे 150 ते 200 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले असून, आता कांद्याच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दर्जेदार कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कांद्याच्या दरात वाढ झाल्यास कांदा उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या […]

अधिक वाचा..

एम यु एच एस सिनेटसाठी डॉ. पराग संचेतींचे नामांकन वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गौरव

पुणे (प्रतिनिधी): ऑर्थोपेडिक्स आणि पुनर्वसन क्षेत्रात नावलौकिक कमावलेले डॉ.पराग संचेती यांचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयुएचएस) सिनेटसाठी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र आणि कुलगुरू यांच्या तर्फे नामांकन करण्यात आले आहे. डॉ.संचेती यांना वैद्यकीय अध्यापनाचा तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेटसाठी त्यांचे नामांकन ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाची पावतीच म्हणावी लागेल. डॉ.पराग […]

अधिक वाचा..

शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा

मुंबई: मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. त्यानंतर अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा,असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले. माटुंगा येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेमध्ये […]

अधिक वाचा..

राज्यातील पायाभूत सुविधा व सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी करचोरी रोखून महसुल वाढीवर भर द्यावा…

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी महसुलवाढ महत्वाची असून राज्याला महसूल मिळवून देणाऱ्या जीएसटी, व्हॅट, मुद्रांक व नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन विभागांनी नियोजनबद्ध काम करुन करसंकलन वाढवावे. अधिकाऱ्यांनी करचोरी करणाऱ्यांच्या दोन पावले पुढे राहून काम करावे. त्यासाठी महसुलवाढीच्या नवनवीन संकल्पना पुढे आणाव्यात, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत […]

अधिक वाचा..