ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील दाेन परीक्षा केंद्रांवर मनाई आदेश जारी

ठाणे: महसूल विभागातील गट “क” संवर्गातील तलाठी भरती परीक्षा- 2023 दि. 17 ऑगस्ट ते 14 स्प्टेंबर 2023 पर्यंत 19 दिवस ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण ०२ परीक्षा केंद्रांवर तीन सत्रात आयोजित करण्यात आली असून परीक्षा केंद्राच्या परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त डॉ.श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे. […]

अधिक वाचा..
ded teacher

डी.एड कॉलेजच्या माजी अध्यापक-अध्यापिकांचा स्नेहमेळावा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कांताबाई पानसरे डी.एड कॉलेज (इंग्लिश माध्यम) पुणे (बॅच सन 2010-12) येथील माजी अध्यापक व अध्यापिका यांचा स्नेहमेळावा तब्बल 11 वर्षांनी विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथील डेक्कन जिमखाना येथील नामांकित हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आला होता. बालपण देगा देवा असे आपण म्हणतो, पण गेलेला दिवस पुन्हा येत नाही, […]

अधिक वाचा..
bahurupi-somnath-shinde

चला साहेब लोक आलेत बिन पगारी अन् फुल अधिकारी; लग्नाला चला…

शिरूर : अंगात खाकी वर्दी चढवून गावोगावी आपल्या चपखल शब्द आणि वाक्य रचनेतून लोकांना हसायला लावणारा बहुरूपी समाज आजही आपली परंपरा जोपासताना दिसत आहे. पण, काळाच्या ओघात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून बहुरूपी समाज अस्तित्वात आहे. शिवरायांच्या काळात गुप्त पद्धतीने माहिती मिळवण्याचे काम हा समाज करायचा. शिवरायांच्या काळात […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदींचे अहंकारी सरकार देशातील लोकशाहीला घातक; नाना पटोले

मुंबई: २०१४ पासून देशातील राजकीय चित्र बदलले असून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद केला जातो. देशात जुलमी ब्रिटीशांप्रमाणे राज्यकारभार सुरु असून आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलण्याची गरज आहे. मोदींचा अहंकार लोकशाहीला घातक आहे, हे अहंकारी सरकार घालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्यासाठी स्वातंत्र्य चळवळीप्रमाणे जात- धर्म […]

अधिक वाचा..

अधिवेशन काळात सत्ताधारी व विरोधीपक्षात सांगड घालण्याचा प्रयत्न केला; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये काही विकासासाठी पूरक विधेयकही मंजूर झाली. पूर्ण काळ चाललेल्या अधिवेशनात राजकीय मुद्यांवर काही चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये विसंवाद होवू नये म्हणून उपसभापती या नात्याने दोन्ही बाजूशी संवादाच्या माध्यमातून सांगड घालत सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडल्याची भावना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम […]

अधिक वाचा..

सुप्रीम कोर्टाला धन्यवाद; न्यायदेवतेवरील आमचा विश्वास आणखी दृढ झाला

मुंबई: आमचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देत न्यायदेवतेवरील आमचा विश्वास आणखी दृढ झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे यांनी दिली आहे. नवाब मलिक यांचा पक्षाच्या ध्येय धोरणांमध्ये आणि पक्षाच्या वाटचालीत सिंहाचा वाटा राहिला आहे. […]

अधिक वाचा..

माजी मंत्री नवाब मलिक यांना न्यायव्यवस्थेने दिलासा दिला त्याचा आनंद आम्हाला आहे…

मुंबई: दिर्घ प्रतिक्षेनंतर माजी मंत्री नवाब मलिक यांना आज न्यायव्यवस्थेने दिलासा दिला त्याचा आनंद आम्हाला आहे, अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना समाधान व्यक्त केले. न्यायव्यवस्थेचा आम्ही नेहमीच आदर करत आलो आहोत. त्यामुळे दिलेल्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत असेही सुनिल तटकरे म्हणाले. गेली ३० वर्षे मुंबई शहरात आपल्या कार्यप्रणालीने एक वेगळा ठसा नवाब […]

अधिक वाचा..

माजी मंत्री नवाबभाई मलिक यांना जामीन; राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री नवाबभाई मलिक यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मत सरकार; नाना पटोले 

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ३६ जिल्ह्याला १९ पालकमंत्री नियुक्त केले असून १७ जिल्ह्याला अजून पालकमंत्रीच नाहीत. १५ ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार यावरून सरकार संभ्रमात आहे. पालकमंत्री नसताना जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल असे सरकारने जाहीर केले होते पण […]

अधिक वाचा..

हर घर तिरंगा; यंदाही स्वातंत्र्यदिनी घरावर फडकवता येणार तिरंगा…

‘या’ नियमांचे पालन करावे लागणार संभाजीनगर: मागील वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता यंदाही स्वातंत्र्य दिनी हे अभियान राबविण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व सरपंच, ग्रामसेवकांना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्य सरकारने १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांनी […]

अधिक वाचा..