लग्न अवघ्या 11 दिवसांवर असताना तरुणाची गोळी झाडून हत्या…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरतल्या बायजीपुऱ्यामध्ये लग्न अवघ्या ११ दिवसांवर असलेल्या तरुणाचा पैशांच्या किरकोळ वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अल कुतूब हसीब हमद या ३० वर्षीय तरुणाचा खून झालेल्या तरुणाचे नाव तर हल्लेखोराचे नाव फयाज पटेल असल्याचं समजते. बुधवार (दि. 9) रोजी सायंकाळी ७: ३०च्या सुमारास न्यू बायजीपुऱ्यातील इंदिरानगरमध्ये त्याच्यावर गोळीबार […]

अधिक वाचा..

लोकसभा निहाय दौरा आणि मंत्र्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार भरवणार; सुनिल तटकरे

मुंबई: लोकसभा निहाय राज्याचा दौरा आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे व नऊ मंत्र्यांचा जनता दरबार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्‍यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल […]

अधिक वाचा..

निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत सरन्यायाधीशांऐवजी कॅबिनेट मंत्री?

दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. यासंदर्भात दाखल याचिकेवर मार्च महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले होते. या निकालात न्यायालयाने पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा या समितीत समावेश असेल, असेही जाहीर केले होते. आता केंद्रीय निवडणूक आयुक्त ठरवण्यासाठी समितीची रचना जाहीर झाली […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! कांद्याचे दर दुप्पट होण्याची शक्यता…

शिरूर: बाजारत टोमॅटोचे दर हे 150 ते 200 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले असून, आता कांद्याच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दर्जेदार कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कांद्याच्या दरात वाढ झाल्यास कांदा उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या […]

अधिक वाचा..

एम यु एच एस सिनेटसाठी डॉ. पराग संचेतींचे नामांकन वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गौरव

पुणे (प्रतिनिधी): ऑर्थोपेडिक्स आणि पुनर्वसन क्षेत्रात नावलौकिक कमावलेले डॉ.पराग संचेती यांचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयुएचएस) सिनेटसाठी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र आणि कुलगुरू यांच्या तर्फे नामांकन करण्यात आले आहे. डॉ.संचेती यांना वैद्यकीय अध्यापनाचा तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेटसाठी त्यांचे नामांकन ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाची पावतीच म्हणावी लागेल. डॉ.पराग […]

अधिक वाचा..

शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा

मुंबई: मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. त्यानंतर अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा,असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले. माटुंगा येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेमध्ये […]

अधिक वाचा..

राज्यातील पायाभूत सुविधा व सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी करचोरी रोखून महसुल वाढीवर भर द्यावा…

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी महसुलवाढ महत्वाची असून राज्याला महसूल मिळवून देणाऱ्या जीएसटी, व्हॅट, मुद्रांक व नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन विभागांनी नियोजनबद्ध काम करुन करसंकलन वाढवावे. अधिकाऱ्यांनी करचोरी करणाऱ्यांच्या दोन पावले पुढे राहून काम करावे. त्यासाठी महसुलवाढीच्या नवनवीन संकल्पना पुढे आणाव्यात, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत […]

अधिक वाचा..

‘त्या’ बारा लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवून देणार…

मुंबई: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हफ्त्यापासून राज्यातील 12 लाख पात्र शेतकरी भूमी अभिलेख अद्ययावत नसणे, ई – केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी आधार संलग्न नसणे या कारणांनी वंचित राहिले होते. मात्र यापुढे या दोन्ही योजनांपासून राज्यातील पात्र शेतकरी वंचित राहू नयेत याचा विचार करून या तीनही प्रकारच्या नोंदण्या व अटींची पूर्तता एकत्रित व गतिमान […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी; गिरीश महाजन

मुंबई: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पंचायती राज संस्थांना सक्षम करून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत दिशादर्शक समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव श्री एकनाथ डवले, […]

अधिक वाचा..

आदिवासी संस्कृती संपवण्याचे पाप करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा; नाना पटोले

मुंबई: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, त्यातील ५५ वर्ष केंद्रात काँग्रेसची सत्ता राहिली. काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना आदिवासी समाजावर अत्याचार होऊ दिले नाहीत पण भाजपा सरकारच्या काळात मात्र मणिपूर असो वा महाराष्ट्र सर्व भागात अत्याचार वाढले आहेत. आदिवासीच या देशाचा मुळनिवासी आहे, जल, जमीन जंगलवर त्यांच्याच अधिकार आहे परंतु आदिवासींची ही संस्कृतीच संपवण्याचे पाप […]

अधिक वाचा..