मराठी भाषा दिनी राज्यपाल हिंदीत भाषण करतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे…

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभेच्या संयुक्त सभागृहात राज्यपाल आपले पहिले भाषण हिंदीत करतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणावर आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र आणि मुंबईच्या मातीला भाषेचा सुगंध आहे. त्या प्रांतात येऊन ती भाषा न बोलता उत्तरभारतातील हिंदी इथल्या माणसांच्या […]

अधिक वाचा..

आपल्या माय मराठीने अभिजात भाषेचे चारही निकष पूर्ण केले तरीही…

मुंबई: मराठी भाषेने अभिजात दर्जाचे चारही निकष पूर्ण केले असून गेल्या चौदा वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लावावा अशी मागणी […]

अधिक वाचा..

विधीमंडळ सभागृहाच्या नियम, प्रथा-परंपरांचे पालन योग्य प्रकारे होत नाही

मुंबई: विधीमंडळ सभागृहांचे कामकाज भारतीय संविधान, नियम, प्रथा आणि परंपरेनुसार चालते. अलीकडच्या काळात बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना आपण बगल देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘पॉईंट ऑफ प्रोसिजर’व्दारे सभागृहात केला. विविध आयुधांचा वापर करुन सदस्यांनी सादर केलेल्या सूचना मान्य किंवा अमान्य याची माहिती सदस्यांना मिळत नाही, कपात सूचनांची यादी सर्व […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढणार…

नगरविकास मंत्रालयाचा आणखी एक भूखंड घोटाळा? मुंबई: नागपूर येथील भूखंड घोटाळ्यामुळे हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या तडाख्यात सापडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. शिंदे हे नगरविकास मंत्री असताना वांद्रेतील अनाथालयाच्या ट्रस्टची मालमत्ता अनारक्षित केली गेली व ती विश्वस्तांनी धर्मदाय आयुक्तांची परवानगी नसताना के.बी.के. रिअल्टरला वाणिज्य विकासकामांसाठी विकली, असा आरोप करीत मुंबईतील रहिवासी किरण […]

अधिक वाचा..

श्री कृष्ण नगर पूल, श्रेयासाठी प्रकाश सुर्वे यांची पांगळी धडपड…

मुंबई: मला आठवतंय अगदी बरोबर एका वर्षांपूर्वी मी पर्यायी रस्ता उपलब्ध न करून देता अचानक बंद करण्यात आलेला श्री कृष्ण नगर चा पूल यावर लिखाण केले होते, यामुळे स्थानिक रहिवाश्यांचे आर्थिक आणि वेळेचे कसे नुकसान होत आहे यावर लिहले होते. यात स्थानिक नेते भास्कर खुरसंगे यांचे नियोजन कसे चुकले? आहे यावर लिहले होते, मीच नाही […]

अधिक वाचा..

देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले…

नक्षलवादी, दहशतवादी, आंदोलजीवी संबोधून भाजापाकडून शेतकऱ्यांचा अपमान रायपूर: केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य, खते महाग झाली आहेत तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शेती करणे परवडत नसल्याने शेतकरी आतमहत्या वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे शेतीची अवस्था दयनीय झाली असून देशातील अन्नदात्याला […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरात ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी

जी-20 च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय.. औरंगाबाद: उद्या म्हणजेच 26 फेब्रुवारीपासून जी-20 परिषेदचं महिला शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. 25 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून 02 मार्चपर्यंत जी-20 परिषदेच्या अनुषंगाने ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रणाकरिता वापर करण्यास मनाई आदेश पोलिसांनी काढला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात, 27 ते 28 […]

अधिक वाचा..

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!

इंग्रजी विषयाच्या ‘त्या’ प्रश्नाला सरसकट मिळणार ६ गुण… औरंगाबाद: इयत्ता बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नांऐवजी पर्यवेक्षकांना दिलेल्या पेपर तपासण्याच्या सूचना छापण्यात आल्या होत्या. अखेर बोर्डाला चूक लक्षात आली असून, सर्वच विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे सरसकट सहा गुण देण्याची भूमिका पुणे बोर्डाने घेतली आहे. बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपरमधील तीन प्रश्न चुकीचे होते. त्यामुळे पहिलाच पेपर देताना विद्यार्थी […]

अधिक वाचा..

झेडपीच्या शाळा भरण्याच्या वेळा बदलणार

औरंगाबाद: जिल्हा परिषदेच्या शाळा ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत. उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढू लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत भरणार असून दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेतला जातो. उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असतो आणि उन्हामुळे अध्यापनाला देखील अडचणी […]

अधिक वाचा..

हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे, कुठे आहे कायदा व सुव्यवस्था…

महाविकास आघाडीचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार… मुंबई: पत्रकारांच्या अंगावर गाडी घालून हत्या होणार असेल, माजी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिली जात असेल, खासदारांनाही मारण्याची सुपारी दिली जात असेल, एक ठाण्यातील अधिकारी अंडरवर्ल्डची धमकी देऊनही त्याला पाठीशी घातले जाते मग हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे. कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे, असा संतप्त सवाल करतानाच […]

अधिक वाचा..