संकटकाळात सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी; अजित पवार

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी; अंबादास दानवे 

मुंबई: फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास, बेरोजगारांना रोजगार देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. २६० अनव्ये प्रस्तावावर भाषण करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांप्रती हे सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या पाहता सरकारच डोक ठिकाणावर येण्याची आवश्यकता असल्याचे दानवे यांनी म्हटले. मोठया […]

अधिक वाचा..

हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर…!

संभाजीनगर: माजी आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या प्रकारानंतर हर्षवर्धन जाधव यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीतल्या आर एम एल रुग्णालयामध्ये जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

शिवसेनेच्या शिव चित्रपट सेनेची इर्शाळवाडीला मायेची पाखर…

मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोलळून नैसर्गिक आपत्ती ओढवली गेली व ४८ कुटुंबावर अस्मानी संकटाचा घाला आला. त्यात ठाकर वाडीतील २२ निष्पाप जीवांचे बळी गेले, ५७ जण अद्याप बेपत्ता असून अनेक जखमींवर उपचार केले गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार तर्फे सर्वोतपरी मदत उपलब्ध करून दिलीय व महाराष्ट्र सरकार त्यांचे पुनर्वसन देखील करून […]

अधिक वाचा..

बारामती परिमंडलात ५१ टक्के वीजग्राहक ऑनलाईन तर ४९ टक्के अजूनही रांगेतच

बारामती: चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्यात भारताचे चांद्रयान-३ लवकरच यशस्वी होईल. डिजीटल इंडियासाठी हा गौरवाचा क्षण असेल. पण याच डिजीटल इंडियात व महाराष्ट्रात तब्बल ४९ टक्के वीजग्राहक आजही पारंपरिक पद्धतीने स्वत:चा वेळ व पैसा वाया घालत रांगेत उभे राहून वीजबिल भरत असल्याचे वास्तव आहे. बारामती परिमंडलात शेतीचे ग्राहक वगळता २० लाख ३४ हजार ग्राहक आहेत. ज्यापैकी […]

अधिक वाचा..

कृषीमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्यात येताच जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

परळी वैद्यनाथ: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी कृषी विभागाचे मंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात येत असून आल्याबरोबर ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गोगलगायींनी नुकसान केलेल्या क्षेत्राची पाहणी करणार आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 11 वाजल्यापासून परळी वैद्यनाथ तालुक्यातील वाघबेट, बेलंबा आदी गावांना भेटी देऊन गोगलगायींनी बाधित क्षेत्राची पाहणी करतील व प्रशासनास आवश्यक […]

अधिक वाचा..

उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी महिला आघाडी सक्षम करा; ज्योती ठाकरे

मुंबई: जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना महिला आघाडीच्या जिल्हा संपर्कप्रमुख ज्योती ठाकरे यांनी वरील उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर उपतालुकाप्रमुख सखाराम गिराम, विष्णुपंत गिराम, जनार्दन गिराम, माजी नगरसेविका गंगुताई वानखेडे मंजुषा घायाळ, मंगल मेटकर, श्रीमती अंजली बनसोडे, संगीता सानप यांच्यासह भागवत गिराम यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना महिला […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात तोडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा; आमदार अस्लम शेख

मुंबई: मुंबईसह ७ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे. राज्यात इर्शारवाडीसारखी दुर्देवी घटना घडलेली असताना मालवणी, अंबोजवाडीमध्ये भर पावसात २५० पेक्षा जास्त बांधकामं तोडली गेली. काल विधानसभा सभागृहात या मुद्द्यावरुन आक्रमक भूमीका घेत भर पावसात लोकांची घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मालाड-पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी घेतली आहे. अस्लम शेख म्हणाले, पावसाळ्यात […]

अधिक वाचा..

इरसालवाडी भागातील सर्व धोकादायक गावांचे पुनर्वसन करावे; नाना पटोले

मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इरसाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदत कार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मदत वाढवून दिली पाहिजे. पुनर्वसन करताना एकट्या इरसालवाडीचे पुनर्वसन करुन चालणार नाही तर त्या भागातील धोकादायक […]

अधिक वाचा..

मणिपूरचे अमानवी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा

मुंबई: मणिपूरमध्ये महिला अत्याचाराच्या अत्यंत घृणास्पद घटना उघड झाल्या असून या घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने या घटनांकडे बघ्याची भूमिका घेतली असून अशा निष्क्रिय केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाचा ठराव सभागृहात मांडला जावा आणि मणिपूर घटनेवर चर्चा घडून आणली जावी अशी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे चर्चा मागितली होती. विधानसभा अध्यक्षांनी […]

अधिक वाचा..