जर्मनीची कुशल मनुष्यबळाची मागणी महाराष्ट्र पूर्ण करणार

मुंबई: “युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य शिक्षण देऊन परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासन सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे. जर्मनीने सुद्धा याबाबत उत्सुकता दर्शविली असून त्यांची कुशल मनुष्यबळाची गरज महाराष्ट्र पूर्ण करू शकेल”, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. युरोपियन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या अनुषंगाने करावयाच्या […]

अधिक वाचा..

वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा…

मुंबई: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारकरी स्वतः पोलिसांनी केलेला अत्याचार सांगत आहेत परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र ते दिसत नाही. लाठीचार्जचे व्हीडीओ डिलीट करण्यासाठी आता सरकारकडून मीडियावर दबाव आणला जात आहे आणि दुसरीकडे लाठीहल्ला झालाच नाही, असे फडणवीस निर्लज्जपणे सांगत आहेत, असा घणाघाती हल्ला […]

अधिक वाचा..

पुण्याच्या पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; पहा कारण…

मुंबई: आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज म्हणजे महाराष्ट्राच्या ३०० वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी तीव्र नाराजी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान जे सरकार स्वतः ला हिंदूत्ववादी सरकार बोलते त्या सरकारकडून वारकर्‍यांवर लाठीचार्ज होतो हे कितपत योग्य आहे याचे उत्तर […]

अधिक वाचा..

क्लस्टर डेव्हलमेंटच्या सवलतींचा फायदा सरसकट सर्व इमारतींच्या पुनर्विकासासाठी व्हावा…

मुंबई: शिंदे फडणवीस सरकारने मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेसाठी रिअल इस्टेट डेव्हलपर्सना देय असलेल्या प्रीमियमवर एक वर्षाच्या कालावधीसाठी ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ३० मे २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत झालेला हा निर्णय मुंबईतील चार पाच बिल्डरांच्या फायद्यासाठीच घेतलेला आहे. या निर्णयात शिंदे सरकारने बदल करून ही सवलत सर्व इमारतींच्या पुनर्विकासासाठी द्यावी अन्यथा काँग्रेस न्यायालयात […]

अधिक वाचा..

…तर सर्व खुळचट नामर्दांना पळता भुई थोडी होईल; शीतल करदेकर 

मुंबई: घोर कलियुग आणि कलियुगाची अतिउच्च परिसीमा काय असते. हे सध्या वर्तमानात आपण अनुभवतोय. देखल्या देवा दंडवत, बोलबच्चनगिरी, इव्हेंट यात सच्चाई लपून जात आहे आणि हम करे सो कायदा म्हणणारे, पुढे पुढे मिरवणारे यांचीच चलती होताना दिसत आहे. मात्र या सगळ्यात ‘सच्चाई’ ला आणि आपल्या ‘जन्मसिद्ध जगण्याच्या अधिकाराना, आपल्या सन्मानाला जागा उरलेली दिसत नाही. हे […]

अधिक वाचा..

पुण्यात महसूलच्या अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचे ‘घबाड’ ! पैसे मोजताना CBI च्या अधिकाऱ्यांची दमछाक

पुणे (प्रतिनिधी) पुण्यात अनेक अधिकारी लाच घेताना रंगेहाथ सापडले आहेत. नुकतेच वाघोली येथे तलाठी कार्यालयातील दोन मदतनीस यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील महसूलचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना 8 लाखांची लाच घेताना शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर अनिल रामोड यांच्या पुण्यातील आणि नांदेड येथील घराची […]

अधिक वाचा..

…तर निलेश राणेसह भाजपने महाराष्ट्राची व राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर माफी मागावी

मुंबई: निलेश राणेने केलेल्या ट्वीटला नारायण राणे तुम्ही सहमत आहात का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हे ट्वीट मान्य आहे का? या ट्वीटशी भाजप सहमत आहे का? राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ट्वीटबाबत काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे. जर हे ट्वीट मान्य नसेल तर निलेश राणेसह भाजपने महाराष्ट्राची व राष्ट्रवादी काँग्रेसची […]

अधिक वाचा..

राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी

मुंबई: भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध कार्यालय कामकाज आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित […]

अधिक वाचा..

मुंबईसारख्या शहरात मुलींवर अत्याचार होत असेल तर मग ग्रामीण महाराष्ट्रात काय अवस्था असेल

मुंबई: मुंबईच्या चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय महिला वसतीगृहात एका मुलीवर अतिप्रसंग झाला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात घडत असेल म्हणजे जिथे पोलिसांची सतत गस्त असते तर मग ग्रामीण महाराष्ट्रात काय अवस्था असेल असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश […]

अधिक वाचा..

रात्री ११ नंतर छत्रपती संभाजीनगर शहर बंद म्हणजे बंदच…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन रात्री ११ वाजेनंतर शहर बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला आहे. त्यासाठी गुन्हेशाखा कामाला लागली असून त्यासाठी ६ विशेष पथके स्थापन करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात मागील दोन आठवड्यांपासून चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ भांडण झाले तरी लोक थेट चाकूने भोसकू लागले […]

अधिक वाचा..