महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थी हितासाठी अहंकार बाजूला ठेवावा…

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा देऊन प्रशासनात अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पहात असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी आयोगाच्या परिक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतात. आयोगाने परिक्षा पद्धतीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर बदल करुन तो २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाचे आकलन करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी ही नवीन पद्धत दोन वर्षांनी […]

अधिक वाचा..

शासणाच्या आडमुठ्या व जाचक अटींमुळे विहीरीच्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित

शिरुर (अरुणकुमार मोटे): पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या विहीर, गाई गोठा, शेळी शेड या योजना मोठया प्रमाणात राबवल्या जात आहे.परंतू काही जाचक अटींमुळे ही योजना तालुक्यासह जिल्हयात पुर्णत्वाला जाऊ शकली नाही. विहीरीच्या लाभाची योजना राबवण्यासाठी तलाठी दाखला लागतो. तलाठी दाखला देत नसल्यामुळे ही योजना मंजूर होत नाही. […]

अधिक वाचा..

सत्ता अंतिम कोणाचीच नाही, प्रत्येकाचा दिवस येत असतो; धनंजय मुंडे

नागपुर: आज देशात सत्तेत असलेल्या भाजपला एकेकाळी संपूर्ण बहुमताने सत्तेत यायला २०१४ पर्यंत प्रतिक्षा करावी लागली होती, आज जरी सत्तेत असले, काही काळ राहिले तरी एक ना एक दिवस सत्ता जात असते, प्रत्येकाचा दिवस येत असतो त्यामुळे आज सत्तेत असलेल्यांनी सत्तेचा दुरुपयोग करू नये. सत्तेच्या बळावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा व विरोधकांवर अडीच वर्ष सत्तेबाहेर ठेवल्याचा […]

अधिक वाचा..

विदर्भ मजबूत तर, राज्य मजबूत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी मांडला विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा नागपूर: विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही हे सांगतांना धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. कृषी, जलसंपदा, उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात विदर्भासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. विधानसभेत २९३ […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत, पीक विमा, मंत्र्यांचा भ्रष्टाचार प्रकरणी सरकारला धरले धारेवर…

नागपूर: अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत, पीक विम्या कंपन्यांची दादागिरी, राज्यातून गेलेले उद्योग, मंत्र्यांचे समोर आलेले भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात पेरणी केली मात्र पाऊसच झाला नाही, नंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने उभी पिकं […]

अधिक वाचा..

गेट वे ऑफ इंडिया येथून आज क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ

मुंबई शहरात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा मुंबई: महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारी २०२३ पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून प्रारंभ होणार आहे. आज ३० डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली. ३९ क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या […]

अधिक वाचा..

गायरान जमीन वाटप प्रकरणी विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा; अजित पवार

नागपूर: तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीने वाटप केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली. तत्कालिन महसूल राज्यमंत्री यांनी २९ जुलै २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र सरकारनेही राज्यात जातनिहाय जनगणना करावी; नाना पटोले

नागपूर: ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे पण केंद्र सरकार मात्र तशी जनगणना करत नाही. काही राज्य सरकारांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्य सरकारप्रमाणे आपल्या राज्यातही जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली. प्रसार माध्यमांना माहिती देताना नाना पटोले […]

अधिक वाचा..

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी..

नागपूर: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. गृहनिर्माण सोसायट्यातील रहिवाश्यांचेही अनेक प्रश्न आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील सोयीसुविधांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. हिंजवडीसारख्या परिसरातील उद्योग राज्याबाहेर हैदराबादकडे स्थलांतरीत होत आहेत. युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महत्वाची शहरे असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व […]

अधिक वाचा..

‘या’ शहरात होणार जिओ ची 5G सर्विस सुरु…

औरंगाबाद: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio ने काही दिवसांपूर्वीच 5G सेवा लाँच केली आहे. कंपनी आपल्या सेवेचा हळूहळू विस्तार करत असून आता कंपनीने देशभरातील आणखी 11 शहरात 5G सर्व्हिस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या 11 शहरामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना आता हाय-स्पीड […]

अधिक वाचा..