जाणून घ्या दहावी, बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर…

पुणे: राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या वेबसाइटवरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा […]

अधिक वाचा..

नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे; देवेंद्र फडणवीस

मुंबई: येत्या काही वर्षात तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार असून पीक विमा क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार आहे. नवीन स्टार्टअप्सनी या क्षेत्रात आपले योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2022’ मध्ये फडणवीस बोलत होते. ‘क्रेड’ कंपनीचे संस्थापक कुणाल शाह यांनी […]

अधिक वाचा..

दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी सक्षम बनवणार; दीपक केसरकर

मुंबई: राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना रोजगार व शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यापूर्वी एचसीएल कंपनीसोबत करार झालेल्या ‘मिलाप’ या कार्यक्रमाअंतर्गत 25 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने या दोन करारांद्वारे 40 हजार विद्यार्थ्यांना […]

अधिक वाचा..
ST

स्मार्ट बसने घेतला पेट अन…

जालना: औरंगाबाद-जालना महामार्गावरील वरुड काजी फाट्याजवळ स्मार्ट बसने पेट घेतल्याची घटना उघडीस आली असून बस मधील लहान मुलासह 7 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की, स्मार्ट बसच्या पुढील डाव्या टायरमध्ये आवाज येत असल्यामुळे चालकाने बस डाव्या बाजूला उभी करुन बसमध्ये आवाज कशाचा येतोय हे पाहण्यासाठी खाली उतरले असता त्यांना इंजिनच्या खालून […]

अधिक वाचा..

धक्कादायक! पुराच्या पाण्यात स्कुटीसह तरुणी गेली वाहून अन पुढे…

नाशिक: निफाड तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. याच पुराच्या एक महाविद्यालयीन तरुणी वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली. अकरावीत शिकणाऱ्या तन्वी विजय गायकवाड या तरुणीचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. निफाड येथील मुळ रहिवासी असणारी तन्वी विजय गायकवाड (वय […]

अधिक वाचा..

महिला पोलिसाचा मृत्यू; दहा दिवसांपूर्वी दिला होता बाळाला जन्म…

बारामती: बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. शीतल जगताप गलांडे, असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर पुणे शहरातील केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानं अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ पोरकं झाले आहे. शीतल या प्रसूती रजेवर गेल्या होत्या. प्रसूतीनंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना केईएम […]

अधिक वाचा..

जिंदगी और कुछ भी नहीं हे प्रेम कळालं, तर तुम्ही आयुष्य जिंकलच…

वर्धा: सोशल मीडियावर सध्या एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांच्या उड्या पाहायला मिळत आहे. हा फोटो आहे प्रेमाचा…प्रेमाच्या ओलाव्याचा.. आणि एकमेकांच्या काळजीचा. प्रेम कधी मरत नाही असं म्हणतात,आणि हेच वाक्य या फोटोतून अधोरेखित होताना दिसतं. या फोटोत एक वृद्ध दाम्पत्य जे काही करत आहे, त्यातून प्रेम या शब्दाला आणखी वजन येतं. एका […]

अधिक वाचा..

मराठ्यांच्या सुप्त क्रांतीची दखल घ्या अन्यथा राज्यात एल्गार अटळ…

सोलापुर: मराठा आरक्षण परिषदच्या माध्यमातून होणाऱ्या सुप्त क्रांतीची दखल राज्य शासनाने घ्यावी. मराठा समाजाला ५० टक्के आरक्षण हे घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे मराठा समाजातील चळवळीची दखल घेऊन आरक्षण द्यावे, अन्यथा राज्यात पुन्हा एल्गार अटळ आहे, असा इशारा जेष्ठ अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी राज्य शासनाला दिला सकल मराठा, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा ठोक मोर्चा यांच्या […]

अधिक वाचा..

एकच मुलगी! शरद पवारांना लोक विचारायचे मग तुम्हाला अग्नी कोण देणार?

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा देशाच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. पवार यांना एकच आपत्य असून त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राष्ट्रीय राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र अनेकदा खेड्यापाड्यात गेल्यावर पूर्वी शरद पवार यांना एकच मुलगी का? असे प्रश्न विचारण्यात येत होते. यावर पवार यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. सकाळ […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यातील बेकायदा शाळा चालवणाऱ्या संचालकांवर कारवाई करा…

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांच्या संचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच या संस्थेने पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर, पालिकेकडून अनाधिकृत शाळा घोषित केल्या जातात. मात्र, या शाळांना नोटीस बजावणे, दंडात्मक कारवाई करणे, या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश […]

अधिक वाचा..