महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या विचारातून बाबाजानी दुर्राणींचा काँग्रेस प्रवेश, मराठवाड्यात काँग्रेसला अधिक बळ मिळेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणींचा हजारो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षाचे परभणी जिल्ह्यातील तीन वेळचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरे दिल्लीत जाताच त्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे मोठ्याप्रमाणात महाविकास आघाडीतील नेतेमंडळी महायुतीमध्ये प्रवेश करीत आहेत. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेले हे राजीनामासत्र थांबण्याचे नाव घेत नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यासाठी गेले असतानाच बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील बड्या नेत्याने […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप? एकनाथ शिंदे दिल्लीत अन्…

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाढलेलं अंडरस्टँडिंग आणि दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेसोबतची धुसफूस. अलिकडेच फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एका हॉटेलच्या बंद खोलीत भेटही झाली असल्याचं समोर आलं होतं. या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे […]

अधिक वाचा..

निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे सक्षम, तिसऱ्याची गरज नाही; उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेना-मनसेची युती होत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अशातच दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत मोठं विधान केले. ‘आम्ही दोघे भाऊ समर्थ आहोत. आम्हाला जे काही करायचे आहे ते आम्ही करू. त्यामध्ये तिसऱ्याची काहीच गरज नाही.’, […]

अधिक वाचा..

त्यांनी धनंजय मुंडेंसाठी पर्याय शोधला पण बाबरी मुंडेंना काय मिळणार? एका दगडात तीन पक्षी….

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या त्यांच्या दौऱ्याचं विशेष आकर्षण म्हणजे युवा नेते बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. हा प्रवेश इतर राजकीय प्रवेशांएवढा साधा-सरळ नाही. अनेक धागेदोरे आहेत जे समजून घेणं आवश्यक आहे. कोण आहेत बाबरी मुंडे युवा नेते बाबरी […]

अधिक वाचा..

मनसेचा नेता थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेला अन् म्हणाला…

पुणे: राज्यभर चाललेल्या मराठी अमराठीचा वाद आता पुणे महापालिकेमध्ये देखील रंगल्याचे पाहायला मिळाल. महापालिका आयुक्तांची बैठक सुरू असतानाच मनसेचे काही पदाधिकारी थेट बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. त्या ठिकाणी बैठक सुरू असल्याचं सांगत या पदाधिकाऱ्यांना हटकलं असता आयुक्त आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की मनसेच्या नेत्याने थेट आयुक्तांच्या अंगावर धाव […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशामुळे सेना-मनसे युती होण्याआधीच तुटली?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. खास करुन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होईल असा दावा केला जात असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळेच आदेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय […]

अधिक वाचा..

प्रभाग रचना, गट व गण निश्चित करताना राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका

मुंबई: राज्यात लवकरच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकात शहरी भागात प्रभाव रचना व ग्रामीण भागात गट व गण निश्चित केले जातात. प्रभाग, गट व गण निश्चित करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात

VVPAT मशीनवर मतदान करायला वेळ लागणार असेल तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात मुंबई: राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT मशीन नसणार अस राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी कारण दिले जात आहे की एक प्रभागात जास्त उमेदवार असणार, मतदारांना एकावेळी चार मते द्यावी लागणार त्यामुळे प्रक्रियेला वेळ लागेल आणि मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी हाती बांधले घड्याळ; अजितदादा पवारांनी केले स्वागत…

लोकांचे प्रश्न त्यांच्यात मिसळून सोडवले गेले पाहिजे; अजित पवार मुंबई: स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला बेरजेचे राजकारण शिकवले आणि ते आपण करतोय. जातीभेद, धर्म, पंथ न बाळगता एकत्र नांदण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे जातीय सलोखा राखण्याची जबाबदारी आपली असली पाहिजे. लोकांचे प्रश्न त्यांच्यात मिसळून सोडवले […]

अधिक वाचा..