उज्ज्वल निकम यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन् 

मुंबई: ज्येष्ठ विधीतज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवड झाली आहे. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर उज्ज्वल निकम पहिल्यांदाच जळगाव मध्ये आले होते. आज सकाळी रेल्वेस्थानकावर निकम यांचे जंगी स्वागत करण्यात आले, शहरातून रॅलीही काढण्यात आली. यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात मंत्री गुराबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी निकम यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. गुलाबराव […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या त्या शिलेदाराची मंत्रिमंडळात होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री 

कोकाटे यांची रिप्लेसमेंट म्हणून अहिल्यानगरला आणखी एक मंत्रीपद अहिल्यानगर: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. खरेतर, वादग्रस्त विधानांमुळे कोकाटे नेहमीच बातम्यांमध्ये राहतात. पण, यावेळी चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे. कामापेक्षा वादग्रस्त विधानांमुळे मंत्रीपद गाजवणारे कोकाटे यांचे ‘जंगली रमी पे आओ ना महाराज’ हे प्रकरण सध्या जोरदार गाजत आहे. त्याच झालं अस […]

अधिक वाचा..

आमदार शरद सोनवणेंना पक्षांतर बंदीची नोटीस; नक्की कारण काय

पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आमदार शरद सोनवणे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणे चांगलेच अंगलट आले आहे. आमदार सोनवणे यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी तक्रार ॲड विजय भिका कुऱ्हाडे यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्याकडे केला आहे. […]

अधिक वाचा..

राजकारणात खळबळ! राष्ट्रवादीचे 2 नाही तर 3 गट?

मुंबई: राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा रंगली असताना रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीसंदर्भात एक मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे 3 गट सक्रिय असल्याची चर्चा रोहित पवार यांच्या दाव्यामुळे रंगली आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आणि राष्ट्रावादीचे दोन गट झाले. शरद […]

अधिक वाचा..

मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय! ‘राष्ट्रवादी’ने मराठ्यांचा फक्त वापर केला

मुंबई: मागच्या पाच टर्मपासून आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी थेट स्वपक्षावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला, मंत्रिपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली, असा घणाघात आमदार सोळंकेंनी केला. शुक्रवारी पुण्यामध्ये बोलताना अजित पवारांनी धनंजय […]

अधिक वाचा..

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या

पुणे: महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींनी जोर धरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनर्वसनाबाबत आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मोठी विधानं केली. तसेच, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाईचे निर्देश आणि छावाचे नेते विजय घाडगे यांच्याशी झालेल्या […]

अधिक वाचा..

निवडणुकीतील कथित घोळाचे राहुल गांधींकडे ठोस पुरावे

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील कथित घोळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आक्रमकता कायम आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातही मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर फडणवीसांनीही विविध मतदारसंघाची आकडेवारी देत प्रत्युत्तर दिले होते. तसेच निवडणूक आयोगाकडूनही मतदारयाद्यांवर आक्षेप-हरकतींची माहिती दिली होती. पण त्यानंतर हे आरोप थांबलेले नाहीत. राहुल गांधी […]

अधिक वाचा..

जगदीप धनखड बेधडकपणे बोलले अन् तिथंच घात झाला

मुंबई: संसदेच्या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जय्यत तयारी केली होती. विरोधकांकडे अनेक मुद्देही होते. पण त्याआधी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा तडकाफडकी राजीनामा देत सरकारची कोंडी केली. विरोधकांना आयते कोलित मिळाले. आता धनखड यांनी अचानक राजीनामा का दिले, यावरून अनेक तर्क मांडले जात आहेत. त्यांनी आरोग्याचे कारण दिले असले तरी कुणालाच […]

अधिक वाचा..

हायकोर्टाच्या निकालानंतर 48 तासांतच दमानियांचं मोठं विधान; काय म्हणाल्या…

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयानं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धडाडती तोफ धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यात मोठा दिलासा दिला होता. पण या निकालानंतर 48 तासांच्या आतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा मुंडेंविरोधात तलवार उपसली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंना कोणतीही क्लिन चीट मिळाली नसल्याचं ठणकावलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई […]

अधिक वाचा..

पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंचा अखेर राजीनामा 

मुंबई: गेल्या आठवड्यात विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यापासून राज्यात विविध राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कथितपणे सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरांतून टीका होत आहे. तसेच अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार […]

अधिक वाचा..