जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी महत्वाची माहिती…

बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मळमळ, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त, नाहीतर सर्वात बेस्ट green tea, Lemon tea, अद्रक , tea १ नं. गुळाचा चहा ( १०० वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार […]

अधिक वाचा..

पॅन कार्ड आधारशी लिंक नाही मग या 12 महत्त्वपूर्ण कामांना लागणार ब्रेक

संभाजीनगर: सरकारने ३० जून २०२३ पूर्वी पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकरणे केले होते. परंतु, बहुतेक लोकांनी अजूनही पॅनला आधार कार्डशी लिंक केले नाही त्यामुळे १ जुलै २०२३ पासून पॅनकार्ड इनॲक्टिव्ह झाले आहे. या पुढे त्यांना ही १२ महत्त्वपूर्ण कामे करता येणार नाही. अशा परिस्थितीत, पॅन कार्ड इनॲक्टिव्ह झाल्यास तुम्हाला हे १२ व्यवहार करण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी करुन लाखों रुपयांचा ऐवज लंपास 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस घरफोडी करुन रोख रकमेसह लाखों रुपयांचे सोन्याचे ऐवज चोरीला जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना नक्की “कायद्याचा धाक” उरला आहे की नाही हा संशोधनाचा विषय असुन सध्या शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरटे रात्री ऐवजी दिवसाढवळ्या घरफोडी करु लागले असुन गेल्या काही दिवसांपासुन शिरुर पोलिसांचे वेगवेगळे कारनामे पुढे येत असल्याने […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅक ची काही लक्षणे…

तुम्हाला हार्ट अटॅकची काही लक्षणे हीमाहित असायला हवीत, जेणेकरून तुम्ही खूप जास्त सतर्क राहू शकता. थकवा येणे, झोप कमी लागणे, आंबट ढेकर येणे, सतत चिंता सतावणे, ह्रदयाची धडधड वाढत जाणे, हातांमध्ये कमजोरी जाणवणे किंवा जडपणा जाणवणे,अंगदुखी,पाठ दुखी, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, कमी भूक लागणे, हात पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास घेताना समस्या निर्माण […]

अधिक वाचा..

भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा; नाना पटोले

मुंबई: भारत हा तरुणांचा देश आहे, ही युवाशक्ती देशाच्या प्रगतीत महत्वाचे अंग आहे. युवाशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील ज्वलंत प्रश्नासह तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्ष सत्तेचा दुरुपयोग करत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते. […]

अधिक वाचा..

राज्यातील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार; खासदार सुप्रियाताई सुळे

मुंबई: केंद्र व राज्यसरकार महिलांच्याबाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलीसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्यापध्दतीच्या घटना वाढत चालल्या त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकार परिषदेत केला.दरम्यान मरीन ड्राईव्ह येथील त्या मुलीच्या नातेवाईकांनी आजच भेट घेतली असून […]

अधिक वाचा..

मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यावर मुलांना जाण्यास रोखण्यासाठी पालिका कर्मचारी नियुक्ती करावेत…

मुंबई: मुंबईतील जुहू कोळीवाडा येथील समुद्रात सायकांळच्या सुमारास पोहायला गेलेली 5 मुले समुद्रात आलेल्या भरतीच्या लाटेत खोल पाण्यात ओढली जावून बुडून त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यादिवशी समुद्रात भरती असल्याने मुलाना खोल पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते समुद्रात अर्ध्या किमी आतमध्ये ओढले गेल्याने त्या चार मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका […]

अधिक वाचा..

मराठी मनोरंजन सृष्टीच्या विकासासाठी शासनाचे ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल लवकरच सुरु होणार

मुंबई: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या संकल्पनेअंतर्गत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ यांना एकत्र आणून सुलभ चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांशी संबंधित व्यक्ती, संस्था यांना एकत्र आणत चित्रपट निर्मितीपासून ते वितरणापर्यंतच्या सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करुन देणारे शासकीय पोर्टल लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी दादासाहेब फाळके […]

अधिक वाचा..

नवी मुंबई, नाशिक जिल्ह्यातील अवैध उत्खननावर तात्काळ बैठकीचे आयोजन करा

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत, सह्याद्री पर्वत आणि मुंबईत सुरू असलेल्या अवैध उत्खनन रोखण्यासाठीच्या उपाय योजनांसंदर्भात तात्काळ बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना आज विधान परिषदेमध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत आहे. नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत आणि सह्याद्री पर्वतात अवैध उत्खनन रोखण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत आ. सुनील शिंदे, आ. विलास […]

अधिक वाचा..

केसातील कोंडा घालवण्यासाठी सोपे उपाय

केसांची योग्य प्रकारे निगा न ठेवल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. सगळ्यात जास्त केसात कोंडा थंडीच्या दिवसांमध्ये होतो कारण थंडीमुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. केसांना पर्याप्त मात्रेत पोषण न मिळाल्यामुळे देखील कोंडा होतो. त्याचबरोबर जास्त तेलकट पदार्थ, तिखट व कमी पाणी प्यायल्यामुळे देखील कोंडा होतो. तसेच आपण केसांना झटपट सुंदर करण्यासाठी केमिकल युक्त कॉस्मेटीक […]

अधिक वाचा..