बजरंग चौकातून १७ वर्षीय तरुणाच अपहरण

क्राईम महाराष्ट्र

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास अपहरणाचा थरारक प्रकार घडला. स्पोर्ट्स बाइकच्या खरेदी-विक्रीवरून झालेल्या शुल्लक वादातून तिघांनी एका १७ वर्षीय तरुणाचं अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नेमकं काय घडल

शुक्रवारी रात्री ११ वाजता पीडित मुलगा त्याच्या मित्रासोबत बाहेर गेला.

मध्यरात्री चिश्तीय चौकातून बजरंग चौकाकडे दुचाकीवरून जात होते.

बजरंग चौकात अचानक कारमधून काही जणांनी कारमधून उतरून दुचाकी पाडली.

दुचाकी पडल्यावर पीडित मुलाला खाली ओढून जबरदस्ती कारमध्ये टाकले.

अपहरण कसं केल

एकूण ७ जण अपहरणात सहभागी होते

चौघे कारमधून पसार

तिघे दुचाकीवरून फरार

हा सगळा प्रकार भररस्त्यावर घडल्याने परिसरात खळबळ

आईने दाखवली तत्परता

पीडित मुलाला मित्राने तात्काळ पीडित मुलाच्या आईला घटनेची माहिती दिली.

आईने क्षणाचाही विलंब न करता सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली.

पोलिसांचा वेगवान तपास

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अपहरणकर्त्यांचा माग काढला

वाळूज शिवारात कारचा वेग कमी होताच पोलिसांनी सापळा रचला

कार अडवून तिघांना ताब्यात घेतल.

अटक केलेले आरोपी

विवेक गणेश सोनवणे (वय १९)

पांडुरंग माधव सोनवणे (वय २१)

रोहन सुनील डव्हळे (वय १९)

इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे

सिडको पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या ७ तासांत रोहनची सुखरूप सुटका झाली.