1) दुधापासून दही बनण्याच्या जैवरासायनिक प्रक्रियेमध्ये दुधातील कोणत्याच घटकांचा नाश होत नाही. त्यातील अनेक महत्त्वाचे घटकांचे पोषणमूल्य वाढते.
2) दुधातील नत्रज पदार्थ हे वाढलेल्या आम्लतेमुळे सहज विघटित होण्याच्या अवस्थेत येत असल्याने त्यांचे जठरात लवकर शोषण होऊ शकते.
3) दुधातील कॅल्शिअम व फॉस्फरस हे सामान्यतः प्रथिनांसोबत जोडलेले असतात, ते दही बनताना वाढलेल्या आम्लतेमुळे द्रव स्वरूपात रूपांतरित होऊन आतड्यांत लवकर शोषले जातात.
4) अविघटित राहिलेली दुग्ध शर्करा मोठ्या आतड्यातील लॅक्टिक आम्ल उत्पन्न करणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीस मदत करते. अनावश्यक वायू व विषारी पदार्थ उत्पन्न करणाऱ्या अन्य सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीत अडथळा निर्माण करतात.
5) मुख्यतः दुधातील लॅक्टोज या दुग्ध शर्करेची ॲलर्जी असल्यामुळे दूध न पचण्याची तक्रार असलेल्या लोकांना दह्यातून दुधाची बहुतांश ७ सर्व पोषणतत्त्वे मिळू शकतात.
6) लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक आम्लात झाल्यामुळे दही पचण्यास सोपे असते, पोटदुखी, अतिसार, बद्धकोष्ठता या सारख्या पचनासंबंधी समस्या दूर होतात.
7) दह्यातील मुबलक कॅल्शिअम आणि पोटॅशिअममुळे हाडे, दात मजबूत राहतात. हाडे ठिसूळ न होता ऑस्टिओफोरासिसचा धोका कमी होतो.
8) दह्यात विविध जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन बी) व खनिजे भरपूर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
9) रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते. रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.
१०) दह्यात प्रथिने भरपूर असून, त्यामुळे भूक नियंत्रित राहते. पर्यायाने वजन आटोक्यात राहते.
(सोशल मीडियावरून साभार)