१)मुलांची स्वच्छता:- नियमित वजन वाढणारे मूल हे नेहमी सशक्त असते.
अंगावरील दुध दयावे. ६ महिन्यानंतर त्याच बरोबर पूरक अन्नसुद्धा दयावे. पाणी उकळून पाजावे, लहान बाळाचे पोट लहान असते त्यामुळे त्याला ६ ते ९ महिन्यांपर्यंत पाच ते सहा वेळा तरी घट्ट खायला शिकवावे.
२)लसीकरण:- ० ते ५ वर्षापर्यंत मुलांना सर्व लसी टोचून घ्याव्या.
३)मुलांची स्वच्छता:- स्वतः मुले, त्यांची घरे, आसपासचा परिसर गाव या गोष्टी जर स्वच्छ असतील तर मुलांचे आरोग्य आपोआपच वाढेल.
मुलांना नेहमी आंघोळ घालावी व त्यांचे कपडे वारंवार बदलावे.
सकाळी उठल्यावर शौचविधी नंतर व जेवणा आधी व नंतर, खेळल्यानंतर मुलांनी आपले हात स्वच्छ धुवावेत.
घराबाहेर उघडयावर शौचास न बसता संडास वापरावा.
दात स्वच्छ घासण्याची सवय लावावी, गोळ्या चॉकलेट देवू नये.
पायात चप्पल किंवा बूट घालण्याची सवय लावावी.
नखे वाढवु नये.
खरुज, फोड, उवा झालेल्या व आजरी मुलांचे कपडे वेगळे ठेवावेत .
तोंडात कुठलीही अस्वच्छ वस्तू घालू नये. कुत्रा, मांजराना चाटू देवू नये.
पिण्यासाठी स्वच्छ किंवा उकळलेले पाणी वापरावे.
नियमित वजन वाढणारे मूल हे नेहमी सशक्त असते.
जर एखादया मुलाचे वजन कमी होत असेल, एकाच जागी बरेच स्थिर असेल तर ते मुल निरोगी नाही असे समजावे. एकतर त्याला पुरेसा आहार मिळत नसेल किंवा एखादा गंभीर आजार झाला असेल.
मुल सशक्त आहे व त्याची वाढ योग्य आहे हे कसे समजावे ? त्याचे वजन व उंची योग्यप्रकारे वाढते का ते बघावे. आरोग्यमार्ग कार्डावर वजन योग्य दिशेने आहे किंवा नाही ते पाहावे.सो
(सोशल मीडियावरुन साभार)