आरोग्यासाठी करा सेवन…
दररोज आवश्यकतेनुसार पाणी पिणे वाढवा. आपल्या शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.
प्रत्येकाच्या गरजेनुसार दिवसभरात सरासरी ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे फायद्याचे आहे. (फ्रिज मधील नको)
सकाळी अनोशापोटी आवश्यक तेवढे पाणी पिणे अमृतासमान आहे.
पाणी उकिडवे बसून प्यावे. पाणी घोट-घोट प्यावे आणि तोंड लावून प्यावे.
प्लास्टिक मध्ये साठवलेले पाणी अथवा प्लास्टिक बॉटल मधील विकतचे पाणी टाळावे. प्लास्टिक बॉटल मध्ये पुन्हा पुन्हा पाणी भरून वापरू नये.
झऱ्याचे अथवा वाहत्या नदीचे पाणी हे स्वच्छ असते, त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करावा.
महत्वाचे: पाणी कधीही गार-गरम एकत्र करून पिऊ नये.
फायदे
रक्ताभिसरण चांगले होते. रक्त पातळ होते.
बद्धकोष्ठता नष्ट होते.
आळसपणा कमी होतो. डोक्यावरील केस गळती कमी होते.
स्किनचे प्राँब्लम्स कमी होतात. तारूण्य टिकून राहण्यासाठी मदत होते.
शरीर आतून स्वच्छ होते. किडनी स्टोन होत नाहीत.
अन्नपचन चांगले होते
मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.
(सोशल मीडियावरून साभार)