मुंबई: निवडणूक आचारसंहितेत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाशी अभद्र वर्तन करणाऱ्या*पोलिसांवर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी तातडीने कारवाई करावी. मुंबई पोलीस आयुक्तांनी या संबंधित पोलिसांवर कार्यवाही करून पुढील काळात अशा घटना घडणार नाही याची शाश्वती द्यावी
शीतल करदेकर -अध्यक्ष मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया
माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांना निवेदन की, निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की करणे हे कोणत्या कायद्यात बसते, हे कोणत्या आचारसंहितेत बसते ? हे कृपया सांगावे आणि घाटकोपर पश्चिम येते वार्तांकन करणाऱ्या लोकशाही वृत्तवाहिनीच्या स्वप्नील जाधव या पत्रकाराबरोबर ज्या प्रकारे पोलिसांनी धक्काबुक्की केलेली आहे त्याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी आणि उचित कारवाई करावी हा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात अर्थात या निवडणुकीत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी आहे आणि म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. पोलीस यंत्रणेने पत्रकारांशी वागताना आदरपूर्वकच वागले पाहिजे समन्वय साधताना पत्रकारांना समाजविघातक प्रवृत्ती समजून वागणूक देणे हे अयोग्य आहे आणि म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी आणि पुढील काळात अशा प्रकारची घटना घडणार नाही याची शाश्वती द्यावी ही विनंती.
शीतल करदेकर,
संस्थापक अध्यक्ष
मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया(माई)