msn

शिरुरकरांनी भेसळ सरकार विरुद्ध केला संताप व्यक्त…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या राजकिय घडामोडीवर शिरूर शहरामध्ये मनसेच्या वतीने संतापाची एक सही व लोकांचे मत यासाठी आज दि.८ जुलै रोजी सकाळी ११ वा. हुतात्मा स्मारक शिरुर येथे सहीची मोहीम हा कार्यक्रम चालू केला आहे.

या मोहीमेला शिरूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी होत असताना दिसून येत होते. आपली एक संतापाची सही करुन आपले मत सुज्ञ नागरिकांनी सहीद्वारे मांडले आहे. एक सही संतापाची या मनसेच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती रविंद्र ऊर्फ बापू सानप, राजेंद्र क्षीरसागर, गणेश खोले, अनिल बांडे, दिलीप मैड यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

या एक सही संतापाची या मोहिमेचे नियोजन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे, जनहितचे शहराध्यक्ष रवी लेंडे, विधी तालुकाध्यक्ष आदित्य मैड यांनी केले. या वेळी संदिप कडेकर, मनसे महिला आघाडीच्या डॉ. वैशाली साखरे, शारदा भुजबळ, स्वप्निल माळवे, तारुआक्का पठारे, रमणलालजी भंडारी, बंडू दुधाणे, चंद्रकांत जाधव, सुमेध डोंगरे, संदीप ओव्हळ, मंगेश कांबळे व मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मनसैनिक उपस्थित होते.