हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात

बीड: बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, बीडमध्ये मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. सुदैवानं या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील यांच्यासह सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. बीडमधील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. […]

अधिक वाचा..

ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू…

मेरठ: एका ३० वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला, अपघातानंतर लगेचच त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्यक्तीला आपत्कालीन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जीव गेल्याचे म्हटले जात आहे. ही घटना मेरठमध्ये घडली आहे. मेरठच्या लाला लजपत […]

अधिक वाचा..
apeksha-thorat-waghale

ऍड. अपेक्षा अशोक थोरात यांचे अपघाती निधन

शिरूर : वाघाळे येथील ऍड. अपेक्षा अशोक थोरात (वय २६) यांचे शुक्रवारी (ता. २५) दापोडी येथे अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडिल, भाऊ, बहिण, चुलते असा परिवार आहे. वाघाळे येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ऐन तारुण्यात अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऍड. […]

अधिक वाचा..

मालवणी शौचालय सेप्टीक टँक दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबीयांना ₹ ९० लाखांची मदत

मुंबई: मागील वर्षी मालवणी, अंबोजवाडी येथील मनपा शौचालयाच्या सेप्टीक टँक मध्ये पडून खाजगी कामगार असलेल्या रामलगन केवट व त्यांचे दोन मुलगे विकास केवट, सुरज केवट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमदार अस्लम शेख यांनी राज्यसरकार व महानगरपालिका यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मृतकांच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेकडून आधी ₹ ३० लाख व शुक्रवारी ₹ ६० लाख असे एकूण ९० […]

अधिक वाचा..

पुण्यात मर्सडीज आणि स्विफ्ट कारचा अपघात, भरपाईसाठी महिलांना मारहाण अन्…

पुणे: पुण्यातील वाघोली परिसरात एक धक्कादायक रस्ते अपघात आणि त्यानंतरचा वाद समोर आला आहे. नगर रोडकडे जात असताना मर्सडीज आणि स्विफ्ट कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतरचा प्रकार अधिकच गंभीर झाला. कारण स्विफ्ट गाडीतील चालकांनी मर्सडीज गाडीवर हल्ला चढवला. त्यानंतर लहान मुलासोबत धक्कादायक कृत्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर स्विफ्टमधील लोकांनी मर्सडीज गाडीची तोडफोड केली […]

अधिक वाचा..

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

मुंबई: मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. इंद्रायणी पुल […]

अधिक वाचा..

मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी

निष्क्रीय व अत्यंत बेजबाबदार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची हकालपट्टी करा मुंबई: ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी आहेत, याची […]

अधिक वाचा..

करडे-न्हावरे रस्त्यावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, चालक फरार

शिंदोडी (तेजस फडके) करडे-न्हावरे रस्त्यावर दि ८ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बाळासाहेब रंगनाथ थोरात (वय५३, रा. निमोणे, ता. शिरुर, जि.पुणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन अपघातानंतर संबंधित वाहनाचा चालक घटनास्थळावरुन वाहनासह फरार झाला असुन या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाळासाहेब थोरात यांचा मुलगा शुभम […]

अधिक वाचा..

शिरूर येथे भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

शिरूर (अरुणकुमार मोटे): मांडवगण फराटा ( ता. शिरूर) येथे दिनांक १७ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात मांडवगण फराटा ते वडगाव रासाई जाणाऱ्या रस्त्यावर रोहीदास थोरात यांच्या घराजवळ घडला. या अपघातात मृत झालेले व्यक्ती म्हणजे सागर संभाजी कोळपे (वय 28), […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात दुचाकी-चारचाकी अपघातात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

श्रीगोंदा येथील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांदळी गावच्या हद्दीत कळसकरवाडी येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 1 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला असून, श्रीगोंदा येथील आरोपी चालकाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्ती दिलीप दगडू शिंदे […]

अधिक वाचा..