सावकार विरोधी कायदा कडक करा; अंबादास दानवे

मुंबई: कर्जाच्या नावाखाली सावकारकडून लूट केली जाते. त्यामुळे सावकारी फास कमी करण्यासाठी सरकारने सावकार विरोधी कायदा कडक करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. मागच्या सरकारच्या काळात सावकार विरोधी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आमदार विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्याचा अहवाल सरकारला सादर केला. सावकार विरोधी कायद्यात कमतरता असून कायद्याची तीव्रता वाढवण्याची […]

अधिक वाचा..

सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली; अंबदास दानवे 

मुंबई: शेतकऱ्यांनी कोरोना काळात सरकारला, जनतेला तारलं होतं मात्र शिंदे-फडणविस सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. कांद्याला व कापसाला हमी भाव न देता उलट कृषी मंत्री हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच कारण न तपासता त्यावर धक्कादायक वक्तव्य करतात, अशा शब्दात त्यांनी सरकारला धारेवर धरले. भांडवली खर्चामध्ये जास्तीत […]

अधिक वाचा..

ठाणे, नागपूरातील गुन्हेगारीवरुन अंबादास दानवेंनी सरकार, गृहमंत्र्यांना घेतले फैलावर

मुंबई: ठाणे, नागपूर मधील महिला अत्याचार, हिरे व्यापाऱ्यांना धमकी प्रकरण, दिवसा ढवळ्या हत्या आदी गुन्ह्यांत मोठया प्रमाणात वाढ झाली असून या सर्व गुन्ह्यांत ठाणे, नागपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले. ठाण्याचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री व नागपूरचे लोकप्रतिनिधी हे उपमुख्यमंत्री असूनही येथील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा म्हणत […]

अधिक वाचा..

कोणाच्या फायदयासाठी सिडकोने खासगी कंपन्यांची नेमणूक केली

मुंबई: नवी मुंबईत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी सिडको ६७ हजार घरे बांधत आहे. आतापर्यंत लाखो घरे बांधणी आणि विक्रीचा मोठा अनुभव गाठीशी असताना सिडकोने यावेळी ही घरे विकण्यासाठी दोन खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. ऐरवी सिडकोची घर खरेदीसाठी लोकं मोठया प्रमाणात पुढे येत असताना आता ही घरे विकण्यासाठी सिडकोने खासगी कंपनीची नेमणूक का […]

अधिक वाचा..

कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अंबादास दानवेंनी मांडली सभागृहात आक्रमक भूमिका

मुंबई: राज्यातील कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविले गेले पाहिजे, यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत २८९ अनव्ये सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. बार्शीतील कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये चेक दिल्याची बाब दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून […]

अधिक वाचा..

विरोधकांचा उल्लेख देशद्रोही असा केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी वक्तव्याचा खुलासा करावा…

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांचा देशद्रोही असा उल्लेख केला. त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. विरोधकांवर टीका करताना देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे, असे दानवे यांनी म्हटले. विरोधी पक्षाचा कोणता सदस्य देशद्रोही आहे? कोणता देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला […]

अधिक वाचा..

संभाजीनगर व धाराशिव नामांतराबाबत सरकारची भूमिका संशयास्पद…

लातूर: औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतराबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारने काढलेल्या परीपत्रकात तफावत आहे. यावरून संभाजीनगर व धाराशिव नामांतराबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद वाटते, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आज लातूर येथे शिवगर्जना अभियान कार्यक्रमाला सुरुवात झाल्यावर दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला,त्यावेळी ते बोलत होते. केंद्राने नामांतराच्या परिपत्रकात दुरुस्ती […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला स्थगिती दयावी अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…

मुंबई: गेल्या २१ दिवसांपासून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परिक्षांतर्गत होणाऱ्या कृषी सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम (दि. ११) […]

अधिक वाचा..

चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांमुळे तातडीने नवीन मेडिकल इमारतीत या रुग्णालयाचे स्थलांतर करा…

चंद्रपूर: वैद्यकीय सुविधांचा अभाव, रुग्णालयाची अपुरी जागा, औषधांची कमतरता, अस्वच्छतेचा अभाव व अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या आधी चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांवरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील असुविधांमुळे तातडीने नवीन मेडिकल इमारतीत या रुग्णालयाचे स्थलांतर करण्याच्या सूचना दानवे यांनी केल्या. तसेच यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दानवे यांनी चंद्रपूर मेडिकल […]

अधिक वाचा..

धारीवाल वीज प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील धारीवाल वीज प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याची आग्रही भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली. धारीवाल वीज प्रकल्पाने वीज निर्मितीसाठी आवश्यक पाणीसाठयासाठी एकच तळे बांधून साठवणूक केली. त्यामुळे जिल्ह्यातील येरुर व सोनेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पाणी साठा तळ्याची दानवे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी […]

अधिक वाचा..