‘बिग बॉस मराठी: ‘काटा गँग’मध्ये फूट? तन्वी-प्रभूच्या नात्यात दुरावा; राखीच्या वक्तव्याने घरात खळबळ

मुंबई: ‘बिग बॉस’ हा असा खेळ आहे, ज्यात क्षणाक्षणाला समीकरणे बदलतात. मैत्रीचे रूपांतर शत्रुत्वात होते, तर शत्रूही कधी मित्र बनतात. त्यामुळेच या खेळात अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतात. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातही असाच एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. घरात सध्या तीन गट स्पष्टपणे दिसत असून त्यातील ‘काटा गँग’मध्ये राकेश बापट, तन्वी कोलते, दीपाली […]

अधिक वाचा..

टी. ई. टी. करा अन्यथा निवृत्ती घ्या..! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

बारामती: देशभरातील शिक्षकांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दोन वर्षात उत्तीर्ण करावी अन्यथा सक्तीची सेवा निवृत्ती घ्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिल्यामुळे शिक्षकांमध्ये नोकरी सोडावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब […]

अधिक वाचा..

बेस्टच्या निवडणुकीत पराभव का झाला? ठाकरे गटाच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मुंबई: मुंबईतील बहुचर्चित बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. त्यानंतर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील 7 जागांवर विजय मिळवला. पण या निवडणुकीत मनसे-शिवसेना उत्कर्ष पॅनेल यांना […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या चालीमुळे एनडीएच्या मित्रपक्षासमोर पेच, उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपला चेकमेट

मुंबई: उपराष्ट्रपती निवडणुकीच्या हालचाली वाढल्या आहेत. प्रादेशिक आणि राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक खूपच रंजक बनली आहे. त्याचं कारण, असं उपराष्ट्रपती पदासाठी काँग्रेस आणि एनडीएनं दक्षिणेतील उमेदवार निवडलेले आहेत. एनडीएने राजकीय समीकरण साधत तामिळनाडूमधील नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवार घोषित केलं. आता काँग्रेसनेही आंध्र प्रदेशातील सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना […]

अधिक वाचा..

मोठा गेम होणार, भाजप प्रदेशाध्यक्षाच्या विधानाने खळबळ

मुंबई: पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण […]

अधिक वाचा..

ठाकरे बंधूंच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ

शिंदे गटाला भरली धडकी, उचललं मोठं पाऊल मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा रविवारी २७ जुलै रोजी ६५ वा दणक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लाल रंगाच्या गुलाबाचा पुष्पगुच्छ दिला. त्यासोबतच वाढदिवसानिमित्त […]

अधिक वाचा..

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे एकही शब्द न बोलता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद हे जणू समिकरणच बनलंय की काय? अशी चर्चा आता सुरू झाली. कारण जेव्हा जेव्हा माणिकराव कोकाटे बोलतात तेव्हा तेव्हा वाद निर्माण झाला असं समजाच. दरम्यान आता कोकाटे बोलले देखील नाहीत, तरीही मोठा वाद निर्माण झालाय. माणिकराव कोकाटेंच्या एका कृतीमुळे राज्यात चांगलंच राजकारण पेटलंय माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळात रमी खेळतानाचा […]

अधिक वाचा..

शेतकरीपुत्राने तयार केल ऊसभरणी यंत्र; अवघ्या ४५ मिनिटांत उसाचा एक ट्रेलर भरणार

सातारा: दरवर्षीच गाळप हंगामात उसाच्या वाहतुकीची मोठी समस्या असते. कारण, कामगार टंचाईमुळे ऊस वाहतूक वेळेत होत नाही. परिणामी साखर कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन सातारा तालुक्यातील रामकृष्णनगरच्या सनी दिलीप काळभोर या शेतकरीपुत्रानेऊस भरणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राद्वारे दिवसात ७० ते ७५ टन ऊस भरला जात आहे. सातारा जिल्ह्यात १५ […]

अधिक वाचा..

महापरिनिर्वाण दिनी ‘कामगार आयुक्तालयातर्फे’ कामगारांकरीताच्या विविध योजना जनजागृती

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे कामगार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांच्यातर्फे कामगारांकरीता विविध योजनांबाबत जनजागृती मोहिम अंतर्गत माहीती उपलब्ध करुन देणाऱ्या माहिती पत्रकांचे वाटप व कामगार विभागातील विविध योजनांविषयी […]

अधिक वाचा..

महिलांना विविध संधी निर्माण करणारे सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार

मुंबई: “महाराष्ट्रात महिलांना मानाचे स्थान आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील महिलांना विविध क्षेत्रात अधिकाधिक संधी निर्माण करून देणारे सर्वसमावेशक महिला धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व महिलांना सर्व क्षेत्रात समान तसेच सन्मानाचे […]

अधिक वाचा..